शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानाच्या पत्राची गरज नाही, सुषमा स्वराजांनी दिला "ओसामा"ला व्हिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 15:07 IST

पाकिस्तानव्याप्त काश्मीर भारताचा एक अविभाज्य घटक असून, पाकिस्तानने बेकायदेशीरपणे तिथे कब्जा केला आहे असंही सुषमा स्वराज यांनी सांगितलं

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 18 - केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील 24 वर्षीय तरुणाला व्हिसा देत असल्याचं जाहीर केलं आहे. सुषमा स्वराज यांनी सांगितलं आहे की, यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सल्लागार सरताज अझीझ यांच्या पत्राची काहीही गरज नाही. पाकिस्तानव्याप्त काश्मीर भारताचा एक अविभाज्य घटक असून, पाकिस्तानने बेकायदेशीरपणे तिथे कब्जा केला आहे असंही सुषमा स्वराज यांनी सांगितलं. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील नागरिकाला व्हिसा देत सुषमा स्वराज यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं असून, त्याचवेळी पाकिस्तानला आरसा दाखवण्याचं काम केलं असल्याचं बोललं जात आहे. 
 
संबंधित बातम्या
आधी स्वत:कडे पहा, सुषमा स्वराजांनी पाकिस्तानचा खोटारडेपणा केला उघड
सीमा ओलांडल्या पण व्हिसा मिळेना, पाकिस्तानातील वधूची सुषमा स्वराजांकडे धाव
"मंगळावर असलात तरी आम्ही परत आणू", सुषमा स्वराजांचं मिश्कील उत्तर
मुलाच्या उपचारासाठी सुषमा स्वराजांनी पाकिस्तानी नागरिकाला मिळवून दिला व्हिसा
 
पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये राहणारा 24 वर्षीय ओसामा अली याला उपचारासाठी भारतात यायचं आहे. मात्र त्याला पाकिस्तानकडून कोणतीही परवानगी दिली जात नव्ही. ओसामाच्या यकृतामध्ये गाठ असून उपचारासाठी त्याला दिल्लीला यायचं आहे. यासाठी नियमांचं पालन करत प्रक्रियेप्रमाणे त्याला सरताज अजीज यांना पत्र लिहायचं होतं, आणि ते पत्र भारतीय दुतावासामध्ये द्यायचं होतं. पण त्याने असं काही केलं नाही, त्यामुळे व्हिसा मिळण्यात अडचण निर्माण होत होती. अशावेळी सुषमा स्वराज यांनी पुढाकार घेत ओसामाला मदत केली. त्यांनी ओसामाला कोणत्याही पत्राविना उपचारासाठी मेडिकल व्हिसा देणार असल्याचं जाहीर केलं आहे.    
 
विशेष म्हणजे, काही दिवसांपुर्वी सुषमा स्वराज यांनी पाकिसतानी नागरिकांना भारतात उपचारासाठी यायचं असले तर सरताज अझीझ यांचं पत्र आणणं अनिवार्य असल्याचं सांगितलं होतं. पत्र आणल्यास तात्काळ व्हिसा देण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. मात्र या प्रकरणात सुषमा स्वराज यांनी कोणत्याही पत्राविना व्हिसा देण्याचा निर्णय घेतला आहे. 
 
तसंच सुषमा स्वराज यांनी चुकीच्या बातम्या प्रसारित करत असल्याने सरताज अझीझ यांना सुनावलं होतं. भारताकडून पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसा नाकारल्याच्या बातम्या पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये येऊ लागल्यानंतर सुषमा स्वराज यांनी ट्विटरच्या माध्यमातून चुकीचे आरोप लावण्यावरुन पाकिस्तानला सुनावलं होतं. सुषमा स्वराज यांनी ट्विट करत पाकिस्तानला आरसा दाखवला होता. याचवेळी सुषमा स्वराजांनी कुलभूषण जाधव यांचाही मुद्दा उचलच सरताज अझीझ यांना त्यांच्याच भाषेत ऐकवलं होतं. 
 
कुलभूषण जाधव यांच्या आईने व्हिसासाठी अर्ज करुनही साधी त्याची दखलही न घेतल्याबद्दल केंद्रीय परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे सरताज अझीझ यांना चांगलंच धारेवर धरत खडे बोल सुनावले.  
 
पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसा मिळत नसल्याच्या मागे सरताज अझीझ कारणीभूत असल्याचं सुषमा स्वराज बोलल्या होत्या. पाकिस्तानी नागरिकांना मेडिकल व्हिसा देण्यामध्ये भारताला कोणतीही समस्या नसून आनंदच आहे, मात्र यासाठी अझीझ यांनी देशाच्या नागरिकांसाठी मध्यस्थी करण्याची गरज असल्याचं सुषमा स्वराज बोलल्या होत्या.