शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

Sushma Swaraj Death: बांगडीवालीपुढेच गुडघे टेकले होते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 06:46 IST

तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनाही कणखरपणे खडेबोल सुनावणाऱ्या सुषमा स्वराज यांचा खंबीरपणा उभ्या जगाने अनुभवला आहे.

भारतावर उठसूठ तोंडसुख घेत आरोपांची फैरी झाडणारे पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनाही कणखरपणे खडेबोल सुनावणाऱ्या सुषमा स्वराज यांचा खंबीरपणा उभ्या जगाने अनुभवला आहे. सतत आक्रमणाची भाषा वापरुन भारत पाकिस्तानला धमकावत आहे, असा आरोप करीत आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत, असे वक्तव्य मुशर्रफ यांनी केल्यानंतर सुषमा स्वराज यांनी रणरागिणी होत मुशर्रफ यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता.बांगड्या हे दुर्बलपणाचे लक्षण आहे, असे मुशर्रफ यांना वाटत असले तरी बांगड्याची ताकद काय असते, हे पाकिस्तानला चांगलेच ठाऊक असेल. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानने तत्कालीन लष्कर प्रमुख जन. ए. ए. के. नियाझी यांना एका बांगडीवालीपुढेच ( तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी) गुडघे टेकावे लागले होते, अशी आठवण मुशर्रफ यांना करुन दिली. सीमापार दहशतवाद, पाकिस्तानकडून दहशतवादाला मिळणारे पाठबळ, द्विपक्षीय संबंध आणि अफगाणिस्तानमधील स्थितीवर सडेतोड भाष्य करतांना त्या म्हणाल्या होत्या की, पाकिस्तानच्या भारताविरुद्धच्या कुरापती थांबणार नाहीत. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा बीमोड करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे; त्याआधी अफगाणिस्तानमधील दहशतवादाचा नि:पात होणे जरुरी आहे. अफगाणिस्तावमधील युद्ध हे इस्लाम वा अफगाणविरुद्ध नाही. तेथील दहशतवादाविरुद्धचा हा लढा आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधील दहशतवादाविरुद्ध युद्ध जिंकायलाच हवे. अन्यथा दहशतवादाविरुद्ध लढा देणा-या देशांवर दूरगामी परिणाम होतील.वाजपेयी-मुशर्रफ यांच्या भेटीबाबत त्या म्हणाल्या की, जम्मू-काश्मिरमधील दहशतवादाला पाठिंबा देणे पाकिस्तान जोवर थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी फलदायी चर्चा होणे अशक्य आहे. तेव्हा ‘युद्ध हवे की शांतता’ हे मुशर्रफ यांनीच ठरवावे, असे सुषमा स्वराज यांनी ऑक्टोबर २००१ मध्ये केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री असताना ठणकावले होते.>महिला आरक्षणाबाबत हे होते मतमहिला आरक्षणाबद्दल आपल्याला काय वाटते या प्रश्नाला उत्तर देताना स्वराज म्हणाल्या होत्या की, ३३ टक्के आरक्षणाला मी न्यायसंगत आणि तर्कसंगतसुद्धा मानते. लोकशाहीमध्ये वैचारिक मतभेदाला काही अर्थच उरत नाही. हे विधेयक सर्वानुमते पारित होत नसेल, तर बहुमताने पारित करायला हवे. ही संविधानातील सुधारणा असल्याने दोनतृतीयांश बहुमत मिळायला हवे. पोखरणवरसुद्धा सर्वानुमती झाली नव्हती.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज