शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

Sushma Swaraj Death: बांगडीवालीपुढेच गुडघे टेकले होते...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2019 06:46 IST

तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनाही कणखरपणे खडेबोल सुनावणाऱ्या सुषमा स्वराज यांचा खंबीरपणा उभ्या जगाने अनुभवला आहे.

भारतावर उठसूठ तोंडसुख घेत आरोपांची फैरी झाडणारे पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांनाही कणखरपणे खडेबोल सुनावणाऱ्या सुषमा स्वराज यांचा खंबीरपणा उभ्या जगाने अनुभवला आहे. सतत आक्रमणाची भाषा वापरुन भारत पाकिस्तानला धमकावत आहे, असा आरोप करीत आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत, असे वक्तव्य मुशर्रफ यांनी केल्यानंतर सुषमा स्वराज यांनी रणरागिणी होत मुशर्रफ यांच्या या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला होता.बांगड्या हे दुर्बलपणाचे लक्षण आहे, असे मुशर्रफ यांना वाटत असले तरी बांगड्याची ताकद काय असते, हे पाकिस्तानला चांगलेच ठाऊक असेल. १९७१ च्या युद्धात पाकिस्तानने तत्कालीन लष्कर प्रमुख जन. ए. ए. के. नियाझी यांना एका बांगडीवालीपुढेच ( तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी) गुडघे टेकावे लागले होते, अशी आठवण मुशर्रफ यांना करुन दिली. सीमापार दहशतवाद, पाकिस्तानकडून दहशतवादाला मिळणारे पाठबळ, द्विपक्षीय संबंध आणि अफगाणिस्तानमधील स्थितीवर सडेतोड भाष्य करतांना त्या म्हणाल्या होत्या की, पाकिस्तानच्या भारताविरुद्धच्या कुरापती थांबणार नाहीत. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादाचा बीमोड करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे; त्याआधी अफगाणिस्तानमधील दहशतवादाचा नि:पात होणे जरुरी आहे. अफगाणिस्तावमधील युद्ध हे इस्लाम वा अफगाणविरुद्ध नाही. तेथील दहशतवादाविरुद्धचा हा लढा आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानमधील दहशतवादाविरुद्ध युद्ध जिंकायलाच हवे. अन्यथा दहशतवादाविरुद्ध लढा देणा-या देशांवर दूरगामी परिणाम होतील.वाजपेयी-मुशर्रफ यांच्या भेटीबाबत त्या म्हणाल्या की, जम्मू-काश्मिरमधील दहशतवादाला पाठिंबा देणे पाकिस्तान जोवर थांबवत नाही, तोपर्यंत पाकिस्तानशी फलदायी चर्चा होणे अशक्य आहे. तेव्हा ‘युद्ध हवे की शांतता’ हे मुशर्रफ यांनीच ठरवावे, असे सुषमा स्वराज यांनी ऑक्टोबर २००१ मध्ये केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री असताना ठणकावले होते.>महिला आरक्षणाबाबत हे होते मतमहिला आरक्षणाबद्दल आपल्याला काय वाटते या प्रश्नाला उत्तर देताना स्वराज म्हणाल्या होत्या की, ३३ टक्के आरक्षणाला मी न्यायसंगत आणि तर्कसंगतसुद्धा मानते. लोकशाहीमध्ये वैचारिक मतभेदाला काही अर्थच उरत नाही. हे विधेयक सर्वानुमते पारित होत नसेल, तर बहुमताने पारित करायला हवे. ही संविधानातील सुधारणा असल्याने दोनतृतीयांश बहुमत मिळायला हवे. पोखरणवरसुद्धा सर्वानुमती झाली नव्हती.

टॅग्स :Sushma Swarajसुषमा स्वराज