शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

Sushant Singh Rajput Death Case: महाराष्ट्राने तपासास सहकार्य केलेले नाही; बिहार सरकारचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 06:42 IST

Sushant Singh Rajput Death Case: चक्रवर्ती हिने तिच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा मुंबईला हलवण्यात यावा अशी याचिकेद्वारे मागणी केलेली आहे. त्यानंतर राज्य सरकार व चक्रवर्ती यांचे म्हणणे सादर झाले.

नवी दिल्ली : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येबाबत महाराष्ट्र पोलिसांनी राजकीय दडपणामुळे गुन्हा (एफआयआर) नोंदवला नाही की प्रकरणाचा तपास करण्यासाठी पाटणा पोलिसांना सहकार्य केले नाही, असे बिहार सरकारने सर्वोच्च न्यायालयाला गुरुवारी सांगितले.बिहार सरकार आणि रिहा चक्रवर्ती यांनी या न्यायालयात आपापले म्हणणे लेखी सादर केले. राजपूत याला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल चक्रवर्तीविरुद्ध पाटण्यात गुन्हा नोंद झालेला आहे. चक्रवर्तीने तिच्याविरुद्ध दाखल झालेला गुन्हा मुंबईला हलवण्यात यावा अशी याचिकेद्वारे मागणी केलेली आहे. त्यानंतर राज्य सरकार व चक्रवर्ती यांचे म्हणणे सादर झाले.रिहा चक्रवर्ती म्हणाली, बिहार सरकारच्या वतीने तपास केंद्रीय गुप्तचर विभागाकडे (सीबीआय) पाठवणे हे या प्रकरणात राज्याच्या अधिकार क्षेत्राबाहेरचे आहे. सुशांतसिंह राजपूत हा गेल्या १४ जून रोजी मुंबईत बांद्रा उपनगरमध्ये अपार्टमेंटमध्ये छताला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. तेव्हापासून मुंबई पोलीस या आत्महत्येची चौकशी करत आहेत. बिहार सरकारच्या वतीने वकील केशव मोहन यांनी सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘हे तर स्पष्टच आहे की, महाराष्ट्रातील राजकीय दडपणामुळे मुंबई पोलिसांनी ना गुन्हा दाखल केला ना वेगाने चौकशी करण्याची जबाबदारी पार पाडण्यासाठी बिहार पोलिसांना सहकार्य केले.’’  वरिष्ठ वकील मैंदर सिंह म्हणाले की, या निवेदनात रिहाच्या याचिका स्थलांतरीत करण्याच्या सध्याच्या याचिकेत काहीही म्हटलेले नसल्यामुळे ती फेटाळली जावी किंवा निकाली काढली जावी. प्रकरणाच्या सध्याच्या परिस्थितीत सीबीआयने प्रकरण हाती घ्यावे आणि तपास वेगाने करावा यात कोणताही अडथळा येऊ दिला जाऊ नये, असे बिहार सरकारने म्हटले. रिहा चक्रवर्ती गुन्हा दाखल करावा किंवा तो बदली करून घ्यावा या दोन्ही बाबी बिहार सरकारच्या अधिकारक्षेत्राबाहेरच्या आहेत, असे रिहा चक्रवर्ती हिने म्हटले. 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRhea Chakrabortyरिया चक्रवर्ती