शहरं
Join us  
Trending Stories
1
Satyapal Malik Death: माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
“मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंना चांगले यश मिळेल”; महायुतीतील नेत्याचा मोठा दावा
3
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
4
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
5
शर्टचा फोटो, अज्ञात चेहरा...४३४ कोटींच्या एमडी ड्रग्जबाबत खुलासा; कर्नाटकातून मुंबईत कसं यायचे?
6
शांतता अन् निसर्ग सौंदर्याचा अनोखा मिलाफ; बीच लव्हर असाल तर भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यांना नक्की भेट द्या!
7
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
8
ये वर्दी सिर्फ हिंमत नही बलिदान भी मांगती है! फरहान अख्तरच्या '१२० बहादुर'चा टीझर रिलीज
9
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
10
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
11
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
12
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
13
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
14
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
15
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
16
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
17
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
18
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
19
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
20
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?

आश्चर्य ! आठ महिन्यात एकाच कुटुंबातील सात जणांचा गूढ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 16:02 IST

अशाप्रकारे एकामागोमाग एकाचा मृत्यू होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून यामागचं गूढ काय आहे याची उत्सुकताही लागून आहे

ऑनलाइन लोकमत
तिरुवन्नमलाई, दि. 18 - एकाच कुटुंबातील सदस्यांचा लागोपाठ होत असलेले मृत्यू सध्या थंदराई शहरात चर्चेचा विषय बनला आहे. अशाप्रकारे एकामागोमाग एकाचा मृत्यू होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून यामागचं गूढ काय आहे याची उत्सुकताही लागून आहे. या सर्वाची सुरुवात झाली ती 13 वर्षीय क्रिस्टफरच्या मृत्यूने. 7 ऑक्टोबर 2016 रोजी क्रिस्टफरचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून या कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 4 वर्षीय सारनचा मृत्यू झाला आणि गुढ अजून वाढलं. 
 
सारनवर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. तिरुवन्नमलाई वैद्यकीय कॉलेज रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. "आजारी असल्याने तीन दिवसांपुर्वी त्याला दाखल करण्यात आलं होतं. रविवारी सकाळपर्यंत त्याची तब्बेत स्थिर होती. मात्र अचानक त्याची तब्बेत बिघडली आणि उलट्या होऊ लागल्या. तीन वाजण्याच्या आसपास त्याचा मृत्यू झाला", अशी माहिती जिल्हाधिकारी प्रशांत वडनेरे यांनी दिली आहे. 
 
जरा हटके बातम्या
 
डेंग्यूमुळे मुलाचा मृत्यू झाला असेल ही शक्यता जिल्हाधिका-यांनी फेटाळून लावली आहे. त्याला अन्नातून विषबाधा किंवा दुसरा गंभीर आजार झाला असल्याची शक्यता जिल्हाधिका-यांनी व्यक्त केली आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून तो आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण कळू शकणार आहे. 
 
7 ऑक्टोबर रोजी क्रिस्टफरच्या मृत्यूनंतर एकाच महिन्यात कुटुंबातील अन्य पाच सदस्यांचा मृत्यू झाला होता. निधन झालेल्या कुटुंबियांची नावे विनोद कुमार (23), नेल्सन (11), क्रितिका मेर्लिन (7), नेल्सनचे आजोबा जोसेफ (70) आणि मेर्लिनची आजी ख्रिस्ता (65) अशी आहेत. या सर्वांनाही मृत्यू होण्याआधी उलट्या आणि पोटदुखीचा त्रास जाणवला होता. 
 
ख्रिस्ता (65) यांचा 31 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता. ख्रिस्ता यांच्या पोस्टमॉर्टममधून विषबाधा झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं अशी माहिती जिल्हाधिकारी वडनेरे यांनी दिली आहे. "ख्रिस्ता यांच्या किडनी, यकृत आणि रक्ताच्या नमुन्यात पिवळा फॉस्फरस आढळला होता", अशी माहिती वडनेरे यांनी दिली आहे. 
 
यानंतर हे प्रकरण तपासासाठी पोलिसांकडे सोपवण्यात आलं. मात्र पोलिसांच्या हाती कोणताच पुरावा लागत नव्हता. पीडितांच्या नातेवाईकांकडून कोणत्याच प्रकारचं सहकार्य मिळत नसल्याने अखेर पोलिसांनी तपास बंद केला होता.