शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी माझी माय, उत्तर भारत मावशी..; एक वेळ आई मेली तरी चालेल, पण मावशी जगली पाहिजे"
2
चिनी एअरलाइन्समध्ये विवाहित एअर होस्टेस आता 'एअर आंटी' झाली, मोठा वाद सुरू झाला
3
Travel : भारतापासून अवघ्या ४ तासांवर आहे 'हा' देश; शिमला-मनालीच्या बजेटमध्ये करू शकता परदेशवारी!
4
Amol Majumdar : भारतीय महिला संघाच्या यशामागचा हिरो अन् त्याचं ‘सेम टू सेम’ हिटमॅन स्टाईल सेलिब्रेशन
5
"मी म्हणालो हॉटेलवरून उडी मारेन अन् स्वतःला संपवून टाकेन", बालाजी कल्याणकरांच्या डोक्यात काय सुरू होतं?
6
तुम्हालाही 'हा' मेसेज आलाय? ताबडतोब डिलीट करा, अन्यथा रिकामी होऊ शकतं तुमचं बँक अकाऊंट!
7
३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास
8
सहा महिन्यात एक लाखाचे ९ लाख! १० रुपयांचा शेअर आता 'शतका'च्या उंबरठ्यावर; कंपनीचं नावही आहे खास!
9
देशभरात भीषण अपघातांची मालिका; आंध्र प्रदेश, तेलंगणा, राजस्थानात 60 जणांचा बळी, अनेक जखमी
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी न्युक्लिअर टेस्टिंगमध्ये घेतलं चीनचं नाव; आता ड्रॅगनने दिलं थेट उत्तर! म्हणाले...
11
Daya Dongre Death: पडद्यावरील खाष्ट सासू हरपली! ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन
12
भीषण! भरधाव डंपरची बाईकला धडक, लोकांना चिरडलं; १९ जणांचा मृत्यू, धडकी भरवणारा Video
13
मोबाईल फोन रिस्टार्ट करण्याचे भन्नाट फायदे; वर्षानुवर्षे फोन वापरणाऱ्यांनाही नसतील माहीत!
14
Video: "मी कॅमेऱ्यावर कसं सांगू, ते वैयक्तिक..."; ब्ल्यू प्रिंटवर भाजपा उमेदवाराचं उत्तर व्हायरल
15
'त्यांनी अपमानाचे मंत्रालय निर्माण करावे...' प्रियांका गांधी यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
उल्हासनगर महापालिका कलानी मुक्त करणार; भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश वधारियांचा इशारा
17
स्वतःच्याच वडिलांचे नाव घ्यायला लाज वाटते का?, 'जंगलराज'चा उल्लेख करत PM मोदींचा घणाघात
18
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
19
फक्त लग्न करण्यास नकार देणे म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नाही: सर्वोच्च न्यायालय
20
शेरवानी घातली, फेटा बांधला, नवरदेव तयार झाला; तितक्यात एक फोन आला अन् सगळ्यांनाच धक्का बसला!

आश्चर्य ! आठ महिन्यात एकाच कुटुंबातील सात जणांचा गूढ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 16:02 IST

अशाप्रकारे एकामागोमाग एकाचा मृत्यू होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून यामागचं गूढ काय आहे याची उत्सुकताही लागून आहे

ऑनलाइन लोकमत
तिरुवन्नमलाई, दि. 18 - एकाच कुटुंबातील सदस्यांचा लागोपाठ होत असलेले मृत्यू सध्या थंदराई शहरात चर्चेचा विषय बनला आहे. अशाप्रकारे एकामागोमाग एकाचा मृत्यू होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत असून यामागचं गूढ काय आहे याची उत्सुकताही लागून आहे. या सर्वाची सुरुवात झाली ती 13 वर्षीय क्रिस्टफरच्या मृत्यूने. 7 ऑक्टोबर 2016 रोजी क्रिस्टफरचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून या कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी 4 वर्षीय सारनचा मृत्यू झाला आणि गुढ अजून वाढलं. 
 
सारनवर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. तिरुवन्नमलाई वैद्यकीय कॉलेज रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरु होते. "आजारी असल्याने तीन दिवसांपुर्वी त्याला दाखल करण्यात आलं होतं. रविवारी सकाळपर्यंत त्याची तब्बेत स्थिर होती. मात्र अचानक त्याची तब्बेत बिघडली आणि उलट्या होऊ लागल्या. तीन वाजण्याच्या आसपास त्याचा मृत्यू झाला", अशी माहिती जिल्हाधिकारी प्रशांत वडनेरे यांनी दिली आहे. 
 
जरा हटके बातम्या
 
डेंग्यूमुळे मुलाचा मृत्यू झाला असेल ही शक्यता जिल्हाधिका-यांनी फेटाळून लावली आहे. त्याला अन्नातून विषबाधा किंवा दुसरा गंभीर आजार झाला असल्याची शक्यता जिल्हाधिका-यांनी व्यक्त केली आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला असून तो आल्यानंतर मृत्यूचं खरं कारण कळू शकणार आहे. 
 
7 ऑक्टोबर रोजी क्रिस्टफरच्या मृत्यूनंतर एकाच महिन्यात कुटुंबातील अन्य पाच सदस्यांचा मृत्यू झाला होता. निधन झालेल्या कुटुंबियांची नावे विनोद कुमार (23), नेल्सन (11), क्रितिका मेर्लिन (7), नेल्सनचे आजोबा जोसेफ (70) आणि मेर्लिनची आजी ख्रिस्ता (65) अशी आहेत. या सर्वांनाही मृत्यू होण्याआधी उलट्या आणि पोटदुखीचा त्रास जाणवला होता. 
 
ख्रिस्ता (65) यांचा 31 ऑक्टोबर रोजी मृत्यू झाला होता. ख्रिस्ता यांच्या पोस्टमॉर्टममधून विषबाधा झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं अशी माहिती जिल्हाधिकारी वडनेरे यांनी दिली आहे. "ख्रिस्ता यांच्या किडनी, यकृत आणि रक्ताच्या नमुन्यात पिवळा फॉस्फरस आढळला होता", अशी माहिती वडनेरे यांनी दिली आहे. 
 
यानंतर हे प्रकरण तपासासाठी पोलिसांकडे सोपवण्यात आलं. मात्र पोलिसांच्या हाती कोणताच पुरावा लागत नव्हता. पीडितांच्या नातेवाईकांकडून कोणत्याच प्रकारचं सहकार्य मिळत नसल्याने अखेर पोलिसांनी तपास बंद केला होता.