शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्य ! मृत्यू झाल्यानंतर 7 वर्षांनी लष्करी जवान घरी परतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2016 10:35 IST

लष्कराने मृत म्हणून घोषित केलेले जवान धरमवीर सिंग तब्बल 7 वर्षांनी आपल्या घरी परतले तेव्हा कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला

ऑनलाइन लोकमत - 
देहरादून, दि. 16 - अभिनेता अक्षय कुमार आणि अश्विनी भावे यांचा सैनिक चित्रपट तुम्हाला आठवतो का ? त्या चित्रपटात अक्षय कुमार लष्कराचा जवान असतो आणि एक दिवस मोहिमेदरम्यान अचानक गायब होतो. सर्वांना वाटतं त्याचा मृत्यू झाला आहे, पण एक दिवस तो अचानक सर्वांसमोर येतो. चित्रपटातील हुबेहूब अशीच घटना धरमवीर सिंग यांच्या आयुष्यात घडली आहे. 
 
लष्कर जवान धरमवीर सिंग यांचा सात वर्षांपुर्वी अपघात झाला होता ज्यामध्ये त्यांची स्मृती हरवली होती. हरिद्वारमधील रस्त्यांवर ते भटकत होते. लष्करानेदेखील त्यांना मृत घोषित केलं होतं. आणि अचानक एक दिवस कोणीही विचार करु शकत नव्हतं असं काही झालं. दुस-या अपघातामुळे धरमवीर सिंग यांची स्मृती परतली आणि तब्ब्ल 7 वर्षांनी ते आपल्या घरी परतले. घरच्यांसाठी तर हा आश्चर्याचा धक्काच होता. 
 
धरमवीर सिंग 2009 पासून बेपत्ता होते. नियमाप्रमाणे तीन वर्षानंतर लष्कराने त्यांना मृत घोषित केलं. 'माझा भाऊ लष्कराच्या वाहनाने प्रवास करत असताना चकारता येथे त्याचा अपघात झाला होता. त्याच्यासोबत अजून दोन जवानदेखील होते. गाडी डिव्हायडरवर चढून अपघात झाला होता. पण शोधूनदेखील मृतदेह सापडलाच नव्हता', अशी माहिती राम निवास यांनी दिली आहे. 
 
लष्कराने मृत्यूपत्र जारी केलं होतं, तसंच कुटुंबाला पेन्शनदेखील सुरु केली होती. कुटुंबाला धरमवीर सिंग जिवंत असतील याच्या फार कमी आशा होत्या. मात्र त्यांची पत्नी मनोज देवी यांना ते परत येतील असा विश्वास होता, त्यासाठी त्यांनी उपवासदेखील ठेवले होते.
 
अपघातानंतर काय झालं मला काहीच आठवत नसल्याचं धरमीवर सिंग सांगतात. 'हरिद्वारमधील रस्त्यांवर ते भीक मागत होते, त्यावेळी एका दुचाकीने त्यांना धडक दिली. त्या व्यक्तीने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा तिथे त्यांना भूतकाळ आठवला. त्यांची स्मृती परतली', अशी माहिती डॉक्टर राम निवास यांनी दिली आहे. 
 
'अपघातानंतर त्या दुचाकीस्वाराने मला 500 रुपये दिले. त्या पैशांनी मी दिल्लीचं तिकिट काढलं, आणि माझ्या घरी पोहोचलो. मला आश्चर्याचा धक्काच बसला आहे. माझ्या मुलींना ओळखणं मला कठीण जात आहे. त्या किती मोठ्या झाल्या आहेत', असं धरमवीर सिंग सांगतात. त्यांची एक मुलगी दहावीत शिकत असून दुसरी बारावीत आहे. त्यांना कुटुंबियांनी जयपूरला उपचारासाठी आणलं आहे.