शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांना मोठं यश, अमेरिकन सिनेटमध्ये 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; आता नवीन पक्ष स्थापन करणार इलॉन मस्क?
3
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
4
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
5
बारा गावच्या शेतकऱ्यांनी रोखली, 'शक्तीपीठ महामार्गा'ची मोजणी...!
6
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
7
"एका आठवड्याच्या आत इस्लामाबादवर कब्जा"; पाकिस्तानच्या जमीयत नेत्याची शाहबाज शरीफ यांना धमकी
8
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
9
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
10
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
11
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
12
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
13
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
14
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
15
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
16
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
17
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
18
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
19
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
20
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान

आश्चर्य ! मृत्यू झाल्यानंतर 7 वर्षांनी लष्करी जवान घरी परतला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2016 10:35 IST

लष्कराने मृत म्हणून घोषित केलेले जवान धरमवीर सिंग तब्बल 7 वर्षांनी आपल्या घरी परतले तेव्हा कुटुंबाला आश्चर्याचा धक्का बसला

ऑनलाइन लोकमत - 
देहरादून, दि. 16 - अभिनेता अक्षय कुमार आणि अश्विनी भावे यांचा सैनिक चित्रपट तुम्हाला आठवतो का ? त्या चित्रपटात अक्षय कुमार लष्कराचा जवान असतो आणि एक दिवस मोहिमेदरम्यान अचानक गायब होतो. सर्वांना वाटतं त्याचा मृत्यू झाला आहे, पण एक दिवस तो अचानक सर्वांसमोर येतो. चित्रपटातील हुबेहूब अशीच घटना धरमवीर सिंग यांच्या आयुष्यात घडली आहे. 
 
लष्कर जवान धरमवीर सिंग यांचा सात वर्षांपुर्वी अपघात झाला होता ज्यामध्ये त्यांची स्मृती हरवली होती. हरिद्वारमधील रस्त्यांवर ते भटकत होते. लष्करानेदेखील त्यांना मृत घोषित केलं होतं. आणि अचानक एक दिवस कोणीही विचार करु शकत नव्हतं असं काही झालं. दुस-या अपघातामुळे धरमवीर सिंग यांची स्मृती परतली आणि तब्ब्ल 7 वर्षांनी ते आपल्या घरी परतले. घरच्यांसाठी तर हा आश्चर्याचा धक्काच होता. 
 
धरमवीर सिंग 2009 पासून बेपत्ता होते. नियमाप्रमाणे तीन वर्षानंतर लष्कराने त्यांना मृत घोषित केलं. 'माझा भाऊ लष्कराच्या वाहनाने प्रवास करत असताना चकारता येथे त्याचा अपघात झाला होता. त्याच्यासोबत अजून दोन जवानदेखील होते. गाडी डिव्हायडरवर चढून अपघात झाला होता. पण शोधूनदेखील मृतदेह सापडलाच नव्हता', अशी माहिती राम निवास यांनी दिली आहे. 
 
लष्कराने मृत्यूपत्र जारी केलं होतं, तसंच कुटुंबाला पेन्शनदेखील सुरु केली होती. कुटुंबाला धरमवीर सिंग जिवंत असतील याच्या फार कमी आशा होत्या. मात्र त्यांची पत्नी मनोज देवी यांना ते परत येतील असा विश्वास होता, त्यासाठी त्यांनी उपवासदेखील ठेवले होते.
 
अपघातानंतर काय झालं मला काहीच आठवत नसल्याचं धरमीवर सिंग सांगतात. 'हरिद्वारमधील रस्त्यांवर ते भीक मागत होते, त्यावेळी एका दुचाकीने त्यांना धडक दिली. त्या व्यक्तीने त्यांना हॉस्पिटलमध्ये नेलं तेव्हा तिथे त्यांना भूतकाळ आठवला. त्यांची स्मृती परतली', अशी माहिती डॉक्टर राम निवास यांनी दिली आहे. 
 
'अपघातानंतर त्या दुचाकीस्वाराने मला 500 रुपये दिले. त्या पैशांनी मी दिल्लीचं तिकिट काढलं, आणि माझ्या घरी पोहोचलो. मला आश्चर्याचा धक्काच बसला आहे. माझ्या मुलींना ओळखणं मला कठीण जात आहे. त्या किती मोठ्या झाल्या आहेत', असं धरमवीर सिंग सांगतात. त्यांची एक मुलगी दहावीत शिकत असून दुसरी बारावीत आहे. त्यांना कुटुंबियांनी जयपूरला उपचारासाठी आणलं आहे.