शहरं
Join us  
Trending Stories
1
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
2
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
3
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
4
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
5
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
6
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
7
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
8
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
9
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
10
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
11
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
12
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
13
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
14
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
15
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
16
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
17
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
18
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
19
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
20
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं

आश्चर्य ! 40 वर्षांपुर्वी अंत्यविधी करुनही 'ती' जिवंतच

By admin | Updated: December 24, 2016 08:59 IST

82 वर्षांच्या या आजींचा 1976 मध्ये साप चावल्याने मृत्यू झाला होता. यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अंत्यविधी करत तिचा मृतदेह गंगा नदीत सोडून दिला होता

ऑनलाइन लोकमत
कानपूर, दि. 24 - एखाद्या बॉलिवूड चित्रपटाची कथा शोभावी अशी घटना कानपूरमध्ये घडली आहे. 40 वर्षापुर्वी मृत पावली म्हणून अंत्यविधी करण्यात आलेली महिला पुन्हा आपल्या घरी परतली आहे. 82 वर्षांच्या या आजींचा 1976 मध्ये साप चावल्याने मृत्यू झाला होता. यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी अंत्यविधी करत तिचा मृतदेह गंगा नदीत सोडून दिला होता. बिधनू गावात ही आश्चर्यकारक घटना घडली आहे.
 
तब्बल 40 वर्षांनंतर ही महिला पुन्हा आपल्या घरी परतली असून नेमकं काय झालं होतं याची माहिती दिली. 'खरं तर साप चावल्याने माझा मृत्यू झाला नव्हता. मी फक्त बेशुद्ध झाली होती. काही मच्छिमारांनी मला वाचवलं आणि त्यांच्या गावातील मंदिरात नेलं', असं त्यांनी सांगितलं आहे.
 
82 वर्षीय विलासा शेतामध्ये लाकडं गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी कोब्रा साप त्यांना चावला होता. जेव्हा त्या घरी परतल्या तेव्हा कुटुंबियांनी त्यांना गावातील वैद्याकडे नेलं. पण त्याने काहीच फायदा झाला नाही, ज्यामुळे विलासा यांचा मृत्यू झाल्याचा समज झाला. यानंतर कुटुंबियांनी त्यांच्यांवर अंत्यविधी करत मृतदेह गंगा नदीत सोडून दिला. पाण्यामध्ये वाहत विलासा जवळच्या कन्नौज गावात पोहोचल्या. तेथील स्थानिकांनी त्यांना मदत करत आश्रय दिला. 
 
विलासा यांच्या मुली राम कुमारी आणि मुन्नी यांना तर आपल्या डोळ्यासमोर आपली आई उभी आहे यावर विश्वासच बसत नव्हता. 'माझ्या आईला काहीच आठवत नव्हतं. काही दिवसांपुर्वी तिने एक घटना एका मुलीशी शेअर केली. तिने आपल्या काकांना याबद्दल सांगितलं. त्यानंतर आईच्या नेमक्या ठिकाणाची माहिती मिळाली, आणि त्यांनी माझ्याशी संपर्क साधला. जन्मखूण पाहताच ही आमचीच आई असल्याची खात्री पटल्याचं', राम कुमारीने सांगितलं आहे.