शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे शत्रूविरोधात केलेली प्रतिकारवाई

By admin | Updated: September 29, 2016 19:32 IST

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे शत्रूविरोधात केलेली प्रतिकारवाई होय. शत्रूचा नायनाट करण्यासाठी ही कारवाई केली जाते.

- विजय खरे

सर्जिकल स्ट्राईक म्हणजे शत्रूविरोधात केलेली प्रतिकारवाई होय. शत्रूचा नायनाट करण्यासाठी ही कारवाई केली जाते. भारताने केलली सर्जिकल स्ट्राईक ही पाकिस्तान विरोधातील कृती नाही. ही कारवाई दहशतवादाच्या विरोधातील आहे, हे आपण प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवे. युद्धाची शक्यता नाही  अर्थातच या कारवाईचे दूरगामी परिणामही लक्षात घ्यायला हवेत. हा कमी तीव्रतेचा संघर्ष असून दोन्ही देशांना युद्धाच्या जवळ नेणारा आहे. परंतु आजची भूराजकीय, भूसामरिक तसेच आंतराष्ट्रीय परिस्थीती पाहता दोन्ही देशात युद्ध होणे शक्य नाही. या सारख्या कारवाया भारताने या याधीही केलेल्या आहेत. अमेरिकेनेही दहशदवाद्यांविरोधात पाकिस्तानात या प्रकारच्या कारवाया केल्या आहेत. दहशदवाद्यांवर नियंत्रण हाच अशा कारवायांचा हेतू असतो. त्यामुळे पाकिस्तान जरी बाबत ओरडत असला तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांची नाकेबंदी केलेली आहे.दहशतवादाला वचकगेल्या काही दिवसांपासून सातत्याने भारतात दहशदवादी हल्ले झाले. एका लोकशाही देशावर होणारे हल्ले ही निंदनीय बाब होती. यामुळे या प्रकरच्या कारवाई करण्यात यावी अशी सर्व सामान्यांचीही भावना होती. त्यामुळे याचे स्वागत होईल. पण अशा कारवाईमुळे दहशदवादाचा बिमोड किंवा समुळ उच्चाटन होईल असे नाही. दहशदवादाला विविध पैलु आहेत. त्यांचा समुळ उच्चाटन होणे शक्य नाही. मात्र, या कारवायांमुळे त्यांच्यावर वचक नक्कीच बसेल.

(लेखक संचालक यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय संस्था आंतरराष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षण विश्लेषण विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात कार्यरत आहेत)