शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

या वेळी निश्चितच जीएसटीवर मोहर

By admin | Updated: June 30, 2016 05:25 IST

दीर्घ काळापासून प्रलंबित असलेले जीएसटी विधेयक राज्यसभेत पारित होण्यासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा सरकारने केला आहे.

नवी दिल्ली : दीर्घ काळापासून प्रलंबित असलेले जीएसटी विधेयक राज्यसभेत पारित होण्यासाठी पुरेसे संख्याबळ असल्याचा दावा सरकारने केला आहे. राज्यांवर प्रभाव पडणार असल्यामुळे सर्व पक्षांमध्ये सहमती व्हावी यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मतैक्य होऊ न शकले तरी विधेयकाला मंजुरी मिळविली जाणारच असे संसदीय कार्यमंत्री वेंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले आहे.१८ जुलैपासून सुरू होणारे संसदेचे पावसाळी अधिवेशन १२ आॅगस्टपर्यंत चालणार असून आवश्यतेनुसार अधिवेशनाचा कालावधी दोन-तीन दिवस वाढविला किंवा कमी केला जाऊ शकतो. या अधिवेशनात कामकाजाचे दिवस २० राहणार असल्याचे नायडू यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या अध्यक्षतेखालील संसदीय कार्य समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले. देशहितासाठी जीएसटी विधेयक पारित करण्यावर सरकारचा भर असेल. आम्हाला व्यापक समर्थन लाभले असून हे विधेयक पारित करण्याजोेगे संख्याबळही आहे. या विधेयकावर मतैक्य झाले नाही तरी ते पारित करण्याचाच सरकारचा प्रयत्न असेल. त्यासाठी मतदान हा अखेरचा पर्याय राहील. सरकारने शक्तिपरीक्षा टाळण्यावर भर देत सर्व पक्षांच्या सहमतीसाठी प्रयत्न चालविले आहेत, असे ते म्हणाले. विधेयकातील काही तरतुदींना काँग्रेसचा विरोध आहे.>एनएसजीच्या मुद्द्यावर चर्चेची तयारीअणुु पुरवठादार गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळविण्यासाठी केलेले प्रयत्न आणि पंतप्रधान मोदींनी अलीकडे केलेल्या विदेश दौऱ्यांबाबत चर्चेला तयार असल्याचे विदेश मंत्री सुषमा स्वराज यांनी या बैठकीत स्पष्ट केल्याचे नायडू यांनी सांगितले. या बैठकीत राजनाथसिंग यांनी लोकपाल आणि लोकायुक्त विधेयक तर पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी नुकसानीसंबंधी प्रलंबित वनीकरण निधी विधेयक त्वरित पारित होण्याची गरज प्रतिपादित केली. वैद्यकीय आणि दंतवैद्यकीय महाविद्यालय प्रवेश परीक्षेसंबंधी (नीट) वटहुकूमाची जागा घेणारे विधेयक संमत करण्यासह शत्रू संपत्ती कायद्यातील दुरुस्तीलाही मंजुरी मिळविण्याचा प्रयत्न राहील.