शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

सुरतेचा खजिना लुटला जाणार?, महाराष्ट्राच्या राजकारणावरही पडणार प्रभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2017 03:15 IST

दक्षिण गुजरातमधील मतदारांचे लक्ष सुरतमधील निवडणुकांकडे लागले आहे. पाटीदार आंदोलन व कपडा व्यापा-यांची नाराजी येथील भाजपाच्या किती जागा खराब करते त्यावर

संदीप प्रधानआणंद : दक्षिण गुजरातमधील मतदारांचे लक्ष सुरतमधील निवडणुकांकडे लागले आहे. पाटीदार आंदोलन व कपडा व्यापा-यांची नाराजी येथील भाजपाच्या किती जागा खराब करते त्यावर भाजपाला काठावरील बहुतम मिळेल की भक्कम, ते ठरणार आहे. दक्षिण गुजरातचे महाराष्ट्राशी जवळचे नाते आहे. सुरत, बडोद्यात बरेच मराठी भाषिक आहेत. त्यामुळे दक्षिण गुजरातचे निकाल महाराष्ट्राच्या राजकारणावरही प्रभाव पाडणारे असतील.सुरतमध्ये चार जागांवर पाटीदार आणि चार जागांवर कपडा व्यापाºयांचा इफेक्ट दिसू शकतो. मागील वेळी सुरतमधील सर्वच्या सर्व १२ जागा भाजपाने जिंकल्या होत्या. या वेळी सुरत, बडोदा परिसरात भाजपाला यदाकदाचित फटका बसला तर महाराष्ट्रात शिवसेना आक्रमकहोईल. भाजपाला रोखण्यासाठी शिवसेनेने याच भागात उमेदवार उभे केले आहेत.डागाळलेले, तरीही लोकप्रियराजकारणाचे गुन्हेगारीकरण हा मुद्दाही दक्षिण गुजरातमध्ये काही प्रमाणात जाणवतो. सर्वच पक्षांनी डागळलेल्या प्रतिमेच्या, दहशत निर्माण करणाºया उमेदवारांना थोड्या-अधिक प्रमाणात संधी दिली आहे. उमेदवार गुंड, भ्रष्ट,दहशत निर्माण करणारा असला तरी लोकांची कामे करीत असल्याने लोकप्रिय आहे हा राजकारणात नव्याने प्रबळ होत असलेला प्रवाह दक्षिण गुजरातमध्ये पाहायला मिळाला.पटेल जवळ आल्यानेओबीसी, दलित दूर ?आदिवासी व ग्रामीण भागात काँग्रेसचा आजही जोर कायम आहे. मात्र पाटीदार समाजाला खूप जवळ करण्यामुळे ओबीसी, दलित, आदिवासी नाराज होऊ शकतात. गुजरातमध्ये ओबीसींची संख्या लक्षणीय असून, पाटीदार व ओबीसी यांच्यात संघर्ष आहे. महाराष्ट्रात मराठाकेंद्रित राजकारण केल्यामुळे ओबीसी नाराज होऊन त्याचा फटका राष्ट्रवादी काँग्रेसला मागील विधानसभा निवडणुकीत बसला होता.बंडोबा भाजपामध्येहीबंडखोरी हेही सर्वच पक्षांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. भाजपासारख्या संघ शिस्तीच्या पक्षातही गल्लोगल्ली बंडोबा उदयाला आले आहेत. भडोचमधील जंबुसर, बडोद्यातील अकोटा, शहरवाडी, वाघोडिया, गोध्रा, कलोल आदी मतदारसंघांत भाजपाला बंडखोरीच्या डोकेदुखीचा सामना करावा लागत आहे.''काँग्रेसचे नेते शेजारील राज्यातील हा ताजा इतिहास दुर्लक्षित करणार नाहीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहेत. दक्षिण गुजरातमधील धरमपूरजवळील चाकमांडवा येथे धरणाला, उंबरगावमध्ये बंदर उभारणीला तर भडोचजवळील बारबुतला समुद्रात रस्ता उभारणीला विरोध आहे.गुजरातमध्ये २२ वर्षे भाजपाचे बहुमतातील सरकार आहे. तरीही प्रकल्पांना विरोध आहे. महाराष्ट्रात आघाडी-युतीचे सरकार असल्याने प्रकल्प पूर्ण होत नाही, अशी तक्रार सत्ताधारी करतात. मात्र पुनर्वसन व प्रकल्पाच्या लाभांबाबत सर्वत्रच लोकांच्या मनात शंका आहे. एकूणच राजकीय नेते हे बेभरवशाचे असल्याचीही भावना येथे दिसून येते.

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017