शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

नीट परीक्षा कायम राहणार- सर्वोच्च न्यायालय

By admin | Updated: May 9, 2016 21:38 IST

नीटची परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्याचे आदेश नीटसंदर्भातल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं दिले

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 9- देशभरातल्या विद्यार्थ्यांचं भवितव्य टांगणीला लागलेल्या नीट परीक्षेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं आज निकाल दिला आहे. नीटची परीक्षा न दिलेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा संधी देण्याचे आदेश नीटसंदर्भातल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं दिले आहेत. विद्यार्थी नीट 2ची परीक्षा देऊ शकतात, देशभरातले मेडिकल प्रवेश नीट परीक्षेनुसारच होणार असून, राज्यांना वेगळी सीईटी घेण्यास कोर्टानं मनाई केली आहे. तसेच नीट परीक्ष देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना 24 जुलैला संधी मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

नीट म्हणजे काय?

केंद्र सरकारकडून एमबीबीएस प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर एकच पात्रता परीक्षा (नीट) घेतली जाते. राज्याच्या पातळीवर आणि देशाच्या पातळीवर वेगवेगळ्या प्रवेशप्रक्रियांतून विद्यार्थ्यांची यातून सुटका झाली आहे. याद्वारे विद्यार्थी देशातील चांगल्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतो.

कधी झाली सीईटीला सुरुवात...

राज्यात १९९७ मध्ये पहिली सीईटी झाली, त्यावेळी ५० टक्के बारावीचे गुण आणि ५० टक्के सीईटीचे गुण मिळून गुणवत्ता यादी प्रसिद्ध व्हायची. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अशा दोन्ही सीईटी एकत्र घेण्यास सुरुवात झाली. अभियांत्रिकी आणि वैद्यकीय अशा दोन्ही सीईटी स्वतंत्र केल्या. राष्ट्रीय पातळीवर वैद्यकीय पूर्वप्रवेश परीक्षा (पीएमटी) सुरू झाली. वैद्यकीय शाखेसाठी पुन्हा 12वी आणि सीईटी यांचे ५०-५० टक्के गुण मिळून प्रवेश देण्यास सुरुवात झाली. एमबीबीएस, बीडीएस आणि बी.एससी. नर्सिंगसाठी २०१५-१६ या वर्षी घेतलेल्या सीईटीमध्ये साडेसात हजार जागांसाठी एक लाख ८९ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. म्हणजे २५ पैकी एक विद्यार्थ्याला प्रवेश मिळेल, अशी परिस्थिती आहे.

विद्यार्थ्यांसमोर नीटचं आव्हान

राज्यात विद्यार्थ्यांसाठी नीट हे मोठे आव्हान आहे. ही परीक्षा राष्ट्रीय पातळीवर होणार असल्यानं गुणवत्तेचे निकष पूर्णपणे बदलतात. राज्यातील वैद्यकीय सामायिक प्रवेश परीक्षेपेक्षा (सीईटी) यात वेगळ्या पद्धतीनं प्रश्न विचारलेले असतात. देशात सर्वाधिक जागा महाराष्ट्रात असल्यानं यापूर्वी परराज्यातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशावरून वाद झालेत. त्यातून ८५ः१५ हा प्रमाण पुढं आलं. ८५ टक्के जागा महाराष्ट्रातल्या मुलांना आणि १५ टक्के परराज्यातील मुलांसाठी ठेवल्या गेल्यात. नीट ही केंद्रीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) घेतली जाते. सीबीएसईचाच अभ्यासक्रम या परीक्षेसाठी आहे. महाराष्ट्रात बहुतांश विद्यार्थी बारावीसाठी हे राज्य परीक्षा मंडळाच्या अभ्यासक्रमाचा अभ्यास करतात. त्यांच्यासाठी नीटमधील प्रश्‍न अभ्यासक्रमाच्या बाहेरील वाटण्याची शक्‍यता आहे. त्यातून विद्यार्थ्यांचं नुकसान होण्याचा धोका आहे. परीक्षेत मराठी मुले मागे राहिलेली होती. गेल्या वर्षीपासून नकारात्मक गुणांची व्यवस्था रद्द केली आहे. त्यामुळं विद्यार्थ्यांना काहीसा दिलासा मिळेल. पण बारावीसाठी राज्य परीक्षा मंडळाचा अभ्यास करावा लागणार आहेच. त्यानंतर काही महिन्यांतच सीईटीसाठी आणि नीटसाठी सीबीएसईच्या अभ्यासावर कष्ट घ्यावे लागतील. राज्यात दोन लाख विद्यार्थी राज्य परीक्षा मंडळाची परीक्षा देतात. या सर्वांना या दुहेरी अभ्यास करावा लागणार आहे, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे राज्य सरकारने मुलांच्या भविष्याचा विचार करून आपल्या अभ्यासक्रमात सीबीएसईप्रमाणे बदल करण्यासाठी तातडीनं पावलं उचलणं आवश्‍यक झालं आहे. तसं केलं नाही तर नीटच्या परीक्षेतील मराठी टक्का घसरण्याची शक्यता आहे.