शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

सर्वाेच्च न्यायालयाने गोविंदाला सुनावले

By admin | Updated: February 10, 2016 01:01 IST

केलेल्या कृत्याची खरोखरीच मनापासून खंत वाटत असेल, तर तुम्ही ज्याच्या श्रीमुखात लागवली होती, त्याला प्रत्यक्ष भेटून त्याची माफी मागा व त्याबद्दल काही भरपाई द्यायची असेल, तर तीही

नवी दिल्ली: केलेल्या कृत्याची खरोखरीच मनापासून खंत वाटत असेल, तर तुम्ही ज्याच्या श्रीमुखात लागवली होती, त्याला प्रत्यक्ष भेटून त्याची माफी मागा व त्याबद्दल काही भरपाई द्यायची असेल, तर तीही त्याच्याच हाती सोपवा, असे सांगून सर्वोच्च न्यायालयाने अभिनेता गोविंदाला प्रायश्चित्तासाठी मंगळवारी शेवटची संधी दिली.मंगळवारी हे अपील पुढील सुनावणीसाठी न्या. व्ही. गोपाळ गौडा व न्या. उदय लळित यांच्या खंडपीठापुढे आले, तेव्हा गोविंदाच्या वकील संगीता कुमार यांनी तडजोडीचा मसुदा सादर केला. त्यात राय यांची लेखी माफी मागण्याची व त्यांना पाच लाख रुपये भरपाई देण्यास गोविंदा तयार असल्याचे नमूद केले गेले होते. हा मसुदा पाहिल्यावर न्यायाधीश गोविंदाच्या वकिलांना म्हणाले, ‘गेल्या तारखेला आम्ही तुम्हाला काय सांगितले होते? (ज्याच्या श्रीमुखात लगावली) त्याला प्रत्यक्ष भेटून प्रकरण मिटवा. तुम्हाला जे काही सांगायचे व द्यायचे आहे, ते त्यांना प्रत्यक्ष भेटून सांगा. तडजोडीचा प्रस्ताव आमच्याकडे देऊ नका!’ मूळ फिर्यादी राय यांचे वकील जतिन झवेरी यांनी असा आरोप केला की, गोविंदाने राय यांना प्रत्यक्ष भेटण्याचा कधी प्रयत्नही केला नाही. ते आपले वकील किंवा स्वीय सचिवाच्या माध्यमातूनच तडजोडीची भाषा करीत आहेत. ६ फेब्रुवारी रोजी गोविंदा राय यांना भेटेल, असे सांगितले गेले, पण तो आला नाही. मात्र, गोविंदाच्या वर्तनाचे समर्थन करण्याचा प्रयत्न संगीता कुमारनी केला. न्यायाधीशांना त्या म्हणाल्या, ‘तो स्वत: न्यायालयात येऊनही माफी मागायला तयार आहे.’ यावर न्यायाधीशांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, न्यायालयात न येता, फिर्यादीला प्रत्यक्ष भेटून प्रकरण कसे संपवायचे ते पाहावे. यासाठी गोविंदाला दोन आठवड्यांची वेळ दिली व त्यातून काही निष्पन्न झाले नाही, तर राय यांच्या अपिलाचा गुणवत्तेवर निर्णय केला जाईल, असेही स्पष्ट केले.राय यांचे अपील मंजूर झाले, तर गोविंदाविरुद्ध धाकदपटशा करणे व मारहाण करणे, या गुन्ह्यांसाठी खटला चालेल व त्यात दोषी ठरला, तर त्यास दोन वर्षांच्या कारावासाची शिक्षाही होऊ शकेल. (लोकमत न्यूज नेटवर्क)या आधी ३० नोव्हेंबर रोजी न्या. टी. एस. ठाकूर यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली, तेव्हा आम्हीही तुमचे चित्रपट आवडीने पाहतो, असे सांगून न्यायाधीश गोविंदाला म्हणाले होते, ‘तुम्ही मोठे कलावंत आहात. झालेली चूक तुम्ही मोठ्या मनाने कबूल करायाल हवी. फिर्यादीची माफी मागून त्यांच्याकडे तुम्ही क्षमायाचना करायला हवी. हे प्रकरण दीर्घकाळ लांबवत ठेवण्यापेक्षा चूक कबूल करून ते लवकर मिटवा.’२००८ मध्ये मुंबईत चत्रपटाचे चित्रीकरण पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीतील संतोष राय या चाहत्याच्या गोविंदाने श्रीमुखात लगावली होती. त्या वेळी गोविंदा खासदारही होता. यावरून राय यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून गोविंदाविरुद्ध फौजदारी खटला चालविण्याचे समन्स महानगर दंडाधिकाऱ्यांनी काढले होते, परंतु गोविंदाचे अपील मान्य करून मुंबई उच्च न्यायालयाने राय यांची मूळ फिर्यादच रद्द केली. याविरुद्ध राय यांचे अपील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असून, त्यात तडजोडीने प्रकरण मिटविता आल्यास पाहावे, असे न्यायालयाने सूचविले होते व गोविंदाने माफी मागण्याची तयारी दर्शविली.