शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

जुन्या नोटा जमा न केलेल्यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा

By admin | Updated: July 4, 2017 13:54 IST

जर तुम्ही अद्यापपर्यंत चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा केल्या नसतील तर काळजी करण्यात कारण नाही

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 4 - जर तुम्ही अद्यापपर्यंत चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा बँकेत जमा केल्या नसतील तर काळजी करण्यात कारण नाही. तुमच्याकडे जर योग्य कारण असेल तर अजून एक संधी मिळू शकते. नोटाबंदीच्या दरम्यान जे लोक जुन्या नोटा जमा करु शकले नाहीत त्यांचासाठी एखादी खास सुविधा का उभारण्यात आली नाही ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला विचारला आहे. 
 
(१ लाख बोगस कंपन्यांची नोंदणी नोटाबंदीनंतर रद्द)
(नोटाबंदीनंतर आलेल्या ८३% नव्या नोटा चलनात)
 
जे लोक एखाद्या कारणास्तव नोटा बँकेत जमा करु शकले नाहीत, त्यांची संपत्ती काढून घेण्याचा कोणताही अधिकार तुम्हाला नाही असंही न्यायालयाने ठणकावून सांगितलं आहे. सोबतच, ज्या लोकांकडे पैसे जमा न करण्याचा वैध कारण आहे त्यांना एक संधी दिली गेली पाहिजे असंही न्यायालयाने सांगितलं आहे. 
 
एका महिलेने केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितलं आहे की, ज्यांच्याकडे वैध कारण आहे त्यांना अजून एक संधी देण्यात आली नाही तर हा गंभीर मुद्दा ग्राह्य धरला जाईल. नोटाबंदी सुरु असताना एखादी व्यक्ती कारागृहात शिक्षा भोगत असेल, तर तो कसा काय नोटा बँकेत जमा करु शकत होता ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने विचारला. अशा परिस्थितीत सरकारने अशा लोकांसाठी एखादी विशेष सुविधा सुरु करायला हवी असं मत न्यायालयाने व्यक्त केलं आहे.
 
सर्वोच्च न्यायालयाने खडे बोल सुनावल्यानंतर केंद्र सरकारने उत्तर देण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत मागितली आहे. सर्वोच्च न्यायालयात एका महिलेच्या याचिकेवर सुनावणी सुरु आहे. महिलेचं म्हणणं आहे की, "नोटाबंदीच्या वेळी मी गरोदर असल्याने रुग्णालयात होती. त्यामुळेच ठरवून देण्यात आलेल्या मर्यादेपर्यंत मी जुन्या नोटा जमा करु शकले नाही". याआधीही 21 मार्च रोजी न्यायालायने ज्या लोकांना 30 डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा जमा करणं शक्य झालं नाही, त्यांना एखादी सुविधा दिली पाहिजे असं सांगितलं होतं. 
 
केंद्र सरकारने  8 नोव्हेंबर रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करत 500 आणि 1000 रुपयाच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. केंद्र सरकारने 30 डिसेंबपर्यंत जुन्या नोटा बँकेत जमा करण्याची संधी दिली होती. केंद्र सरकारने आता याप्रकरणी प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्याचं आश्वासन दिलं आहे. 18 जुलैला पुढील सुनावणी होणार आहे.