शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांची उन्हाळ्याची सुट्टी रद्द

By admin | Updated: March 31, 2017 11:11 IST

67 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टातील जवळपास 15 न्यायाधीशांची उन्हाळ्यातील सुट्टीच रद्द करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - 67 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा सुप्रीम कोर्टातील जवळपास 15 न्यायाधीशांची उन्हाळ्यातील सुट्टीच रद्द  करण्यात आली आहे. घटनात्मक दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या प्रकरणांवर सुनावणी व्हावी, याकरिता सरन्यायाधीश जे. एस. केहर यांनी हा निर्णय घेतला आहे.
 
मुस्लिमांमधील ट्रिपल तलाक, बहुपत्नीत्व आणि निकाह हलाला या प्रकरणांचा यात समावेश आहे. यावरील सुनावणी घटनापीठाकडे  होईल. या वेळी सर्व पक्षकारांची बाजू ऐकण्यात येईल, असे न्या. केहर यांनी स्पष्ट केले. 
 
यंदा उन्हाळ्याच्या सुट्टीत न्यायाधीश या खटल्यांवर नियमित स्वरुपात काम करणार आणि महत्त्वाच्या राष्ट्रीय मुद्यांशी संबंधित असलेले प्रकरणं मिटवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. 
आता 11 मेपासून या प्रकरणांची सुनावणी होईल. सरन्यायाधीश जे. एस. खेहर व न्या. डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने दोन आठवड्यांत सरकारला उत्तर देण्याचे निर्देश गुरुवारी दिले. परंपरेच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका भावनांशी जोडलेल्या असून पाच न्यायाधीशांचं खंडपीठ या मुद्यावर विचार करणार, यासाठी विस्तृत सुनावणी आवश्यक आहे. 
दरम्यान, सुप्रीम कोर्टाचे 28 पैकी 15 न्यायाधीश आपली उन्हाळ्याची सुट्टी सुनावणी व निर्णय घेण्यात घालवणार असल्याची ही पहिलीच वेळ आहे. तसंच शनिवारी आणि रविवारीदेखील काम करण्याची तयारी न्यायाधीशांनी दर्शवली आहे.  तर दुसरीकडे, अॅटर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनी उन्हाळ्याच्या सुट्टीदरम्यान खंडपीठ स्थापन करण्यावर आक्षेप नोंदवला आहे.
 
यावर, "एकत्र काम करावं असं तुम्हाला वाटत नसेल तर सुट्टी मिळणार यासाठी मी खूप खूश होईन. पण नंतर खूप वर्ष गेले आणि खटल्यांवर सुनावणीही झाली नाही, असं  सांगू नका. उन्हाळ्याच्या सुट्टीदरम्यान काम करायचं नाही तर यानंतर आम्हाला जबाबदार ठरवू नका", असे खडेबोल सरन्यायधीश केहर यांनी निर्णयाला विरोध करणा-यांना सुनावले आहे.