शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

"जिथे करायला हवं तिथे काम करत नाही"; सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींचा राज्यपालांच्या भूमिकेवर सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 14:21 IST

सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश बी.व्ही. नागरत्ना यांनी देशातील राज्यपालांच्या भूमिकेबाबत सवाल विचारला आहे.

Supreme Court judge Justice B V Nagarathna: राज्यपालांच्या कामकाजावरुन सुप्रीम कोर्टाच्या मुख्य न्यायाधिशांनी कठोर असं विधान केलं आहे. अनेक राज्यांमध्ये राज्यपाल आणि सरकार असा वाद नेहमीच पाहायला मिळत आहे. त्यातच सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधिशांनी राज्यपालांच्या कर्तव्याबाबत महत्त्वाचे विधान केलं आहे. काही राज्यपाल हे त्यांना जे नाही करायला पाहिजे तेच करतात आणि जिथे सक्रिय असायला हवं तिथे ते काम करत नाही अशा शब्दात सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीश बी.व्ही. नागरत्ना यांनी सुनावलं आहे.

सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्ती बीवी नागरत्ना यांनी शनिवारी राज्यपालांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. राज्यपाल जिथे सक्रिय असायला नकोत तिथे सक्रिय असतात अशा धारदार शब्दात न्यायमूर्ती नागरत्ना यांनी सुनावले. सुप्रीम कोर्टात राज्यपालांविरुद्धच्या खटल्यांबद्दल चिंता व्यक्त करताना नागरत्ना यांनी हे सगळं दुःखद असल्याचेही म्हटलं. राज्यपालांची भूमिका ही तटस्थ असायला हवी असेही न्यायमूर्ती म्हणाल्या.

केरळ आणि तामिळनाडू या राज्यांनी त्यांच्या राज्यपालांनी विधेयकांना मंजुरी न दिल्याच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात धाव घेतली असताना न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना यांनी हे विधान केलं आहे. तसेच घटनेच्या कलम ३६१ नुसार राज्यपालांना फौजदारी खटल्यापासून मुक्ततेचा प्रश्न  तपासण्याचेही कोर्टाने मान्य केले आहे. दुर्गाबाई देशमुख यांचा उल्लेख कर न्यायमूर्ती नागरत्ना म्हणाल्या की, राज्यपालांची भूमिका सुसंवाद वाढवणारी आणि ती राजकारणाच्या पलीकडे असायला हवी. दुर्गाबाई देशमुख या संविधान सभेच्या सदस्या आणि स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांच्या पत्नी होत्या.

बंगळुरुच्या एनएलएसआययू करार परिषदेत भाषण देताना न्यायमूर्ती नागरत्ना यांनी या सगळ्याबाबत भाष्य केलं. "आजच्या काळात दुर्दैवाने, भारतातील काही राज्यपाल भूमिका बजावत आहेत ज्या त्यांनी बजावू नयेत आणि त्यांनी जेथे सक्रिय असले पाहिजे तेथे ते निष्क्रिय आहेत. सुप्रीम कोर्टात राज्यपालांवरील खटले ही भारतातील राज्यपालांच्या घटनात्मक स्थितीची एक दुःखद कहाणी आहे. राज्यपालांनी काही काम करणे अपेक्षित आहे. आम्हाला राज्यपालांचा समावेश आमच्या राज्यघटनेत करायचा आहे, कारण आम्हाला असे वाटते की जर राज्यपाल खरोखरच त्यांच्या कर्तव्याची जाणीव ठेवत असतील आणि त्यांनी चांगले काम केले तर ही संस्था सुसंवाद आणेल. हेराज्यपालांना पक्षीय राजकारण, गटबाजी यापेक्षा वरचेवर ठेवणे आणि त्यांना पक्षीय बाबींच्या अधीन न ठेवणे ही शासनाची कल्पना आहे," असे न्यायमूर्ती बी.व्ही. नागरत्ना म्हणाल्या.

"राज्य आणि केंद्र या दोघांनाही राष्ट्रीय आणि प्रादेशिक अपेक्षा पूर्ण करण्याचा अधिकार आहे हे समजते. राज्यपालांनी राज्यांच्या मतांना महत्त्व दिले पाहिजे आणि त्यांचे अधिकार कमकुवत होऊ नयेत यावर भर दिला पाहिजे. सर्व गोष्टींमध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे संविधान. ते आपल्याला प्रेरणा देतो आणि प्रत्येक परिस्थितीवर उपाय देतो. लोकशाही मूल्यांची ते सतत आठवण करून देते," असेही न्यायमूर्ती म्हणाल्या.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय