शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

‘संथारा’वरील बंदी सुप्रीम कोर्टाने उठविली

By admin | Updated: September 1, 2015 02:38 IST

पूर्वापार चालत आलेल्या संथारा किंवा संलेखना (मृत्यूपर्यंत उपवास) या धार्मिक व्रताला बेकायदेशीर ठरविणाऱ्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने

नवी दिल्ली : पूर्वापार चालत आलेल्या संथारा किंवा संलेखना (मृत्यूपर्यंत उपवास) या धार्मिक व्रताला बेकायदेशीर ठरविणाऱ्या राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती देत जैन समाजाला मोठा दिलासा दिला आहे. या व्रताला बेकायदेशीर ठरविण्यात आल्यानंतर जैन धर्मीयांनी देशभर आंदोलन चालवतानाच कायदेशीर लढ्याचा मार्ग अवलंबला होता.सरन्यायाधीश एच.एल. दत्तू आणि न्या. अमिताव रॉय यांच्या खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करणार असल्याचे स्पष्ट करतानाच केंद्र आणि राजस्थान सरकारला नोटीस जारी केली आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय चार वर्षे स्थगित ठेवला जाऊ शकतो किंवा सुनावणीपर्यंत हे प्रकरण स्थगित राहील. अखिल भारत वर्षीय दिगंबर जैन परिषदेसह चार संघटना आणि दोन जैन धर्मीयांनी राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाने संथारा व्रताला आत्महत्या ठरवितानाच भादंवि कलम ३०६ आणि नाही, असे उच्च न्यायालयाने म्हटले होते. २००६ मध्ये जयपूरच्या कैलादेवी हिरावत यांनी संथारा व्रत अवलंबत शरीर त्यागल्यानंतर या व्रताची चर्चा झाली.याचिकेतील युक्तिवाद जैन धर्माचे आधारभूत दर्शन आणि तत्त्वांचा विचार न करताच उच्च न्यायालयाने निर्णय दिल्याकडे विविध जैन संघटनांनी लक्ष वेधले होते. संथारा ही अत्यंत प्राचीन परंपरा असून या व्रताची तुलना आत्महत्येशी करता येत नाही. संसारातील मोह पूर्णपणे संपल्यानंतर संथारा व्रत अवलंबता येते. हे व्रत वृद्धावस्थेत स्वीकारले जाते तर आत्महत्या ही कोणत्याही क्षणी आवेगाच्या परिणामांतून घडत असते. भारतीय राज्यघटनेने प्रत्येक व्यक्तीला आपली श्रद्धा आणि मान्यतेनुसार जगण्याचा अधिकार आहे. संथारावर बंदी आणल्यास घटनेच्या मूलभूत अधिकाराचे उल्लंघन ठरेल. आधुनिकतेच्या नावाखाली जैन समाजावर काहीही थोपवता येणार नाही, असा युक्तिवाद सर्वोच्च न्यायालयांत दाखल याचिकांमधून करण्यात आला होता. कुटुंबाची सहमती आवश्यकऔरंगाबादचे सचिन झवेरी यांच्या याचिकेवर बाजू मांडणारे वकील अ‍ॅड. संदीप देशमुख यांनी संथारा व्रत स्वीकारताना कुटुंबीय आणि नातेवाइकांची सहमती आवश्यक असल्याकडे लक्ष वेधत आत्महत्येशी नाते जोडता येणार नसल्याचे ठामपणे सांगितले. या मुद्यासह विविध पैलूंवर विचार करीत सर्वोच्च न्यायालयाने स्थगनादेश दिला. पुढील सुनावणीबाबत न्यायालयाने काहीही स्पष्ट केलेले नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)