शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
3
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
4
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
5
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
6
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
7
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
8
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
9
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
10
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
11
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
12
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
13
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
14
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
15
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
16
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
17
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
18
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
19
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
20
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!

अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाहीच! सुप्रीम कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश, दिले दोन पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2024 16:48 IST

Arvind Kejriwal Move To Supreme Court For Bail: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची जामिनासाठी धावाधाव सुरू असून, सुप्रीम कोर्टाने दिलासा देण्यास नकार दिला.

Arvind Kejriwal Move To Supreme Court For Bail: मद्य धोरण प्रकरणी उ‌द्भवलेल्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला. परंतु, दिल्ली उच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती दिली. यानंतर या स्थगितीविरोधात अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर सुनावणी झाली. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने केजरीवाल यांना दिलासा दिला नाही. 

सर्वोच्च न्यायालयात न्या. मनोज मिश्र आणि न्या. एसवीएन भट्टी यांच्या खंडपीठासमोर अरविंद केजरीवाल यांच्यावतीने दाखल याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रलंबित असल्यामुळे उच्च न्यायालयात सुनावणी होत नसल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने सांगण्यात आले. यावर, उच्च न्यायालयातील याचिका मागे घ्या आणि त्यानंतर आमच्याकडे या, असे न्यायालयाने केजरीवाल यांच्या वकिलांना सांगितले. तसेच उच्च न्यायालयाने जामिनाला स्थगिती देण्याच्या निर्णयाला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला. 

दिल्ली उच्च न्यायालयाने निर्णय राखून ठेवला आहे. अशा परिस्थितीत निकालाची वाट पाहायला हवी होती. उच्च न्यायालयाच्या प्रक्रियेत दखल देणे योग्य नाही, असे सांगत आता या याचिकेवर बुधवारी सुनावणी घेण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. अरविंद केजरीवाल यांच्यावतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी जोरदार युक्तिवाद केला. आदेशाची प्रत मिळाल्याशिवाय उच्च न्यायालय जामिनाला स्थगिती देऊ शकते, तर उच्च न्यायालयाच्या आदेशाची वाट न पाहता सर्वोच्च न्यायालय निर्णय देऊ शकते, अशी बाजू संघवी यांनी मांडली. 

दरम्यान, अशा प्रकारच्या याचिकांमध्ये न्यायालय तातडीने निर्देश देते. निर्णय राखून ठेवला जात नाही. मात्र, दिल्ली उच्च न्यायालयात झाले, ते असामान्य आहे, अशी टिप्पणी न्या. मनोज मिश्र यांनी केली. यावर, उच्च न्यायालयाने जामिनाला दिलेली स्थगिती न्याय प्रक्रियेचे उल्लंघन असल्याचे संघवी यांनी सांगितले. यावर, उच्च न्यायालय एक दोन दिवसांत निर्णय देईल, असे मनोज मिश्र यांनी म्हटले. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयArvind Kejriwalअरविंद केजरीवाल