शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
5
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
6
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
7
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
8
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
9
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
10
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
11
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
12
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
13
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
14
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
15
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
16
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
17
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
18
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
19
काैटुंबिक कलहातून होतेय कोवळ्या मुलांची हाेरपळ; बदलापुरात मुलीचे अपहरण; मुंब्य्रात आईच बनली क्रूर
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

शेतकर्‍यांना आधार देणे, आपलीच गरज !

By admin | Updated: September 7, 2015 23:27 IST

फोटोडेस्क - ०७नाना

फोटोडेस्क - ०७नाना
----------------

नाना पाटेकर : शेतकर्‍यांच्या १३५ विधवांना आर्थिक मदत
औरंगाबाद : शेतकरी बांधवांनो आत्महत्या करू नका. हा मोठा गुन्हा आहे. तुम्ही एकटे नाहीत. आम्ही तुमच्या सोबत आहोत. हा आत्मविश्वास देण्यासाठीच आम्ही आलो आहोत. किरकोळ रकमेचा धनादेश देताना आम्हालाही लाज वाटते. ही मदत नाही. ही सहानुभूतीही नाही. अनुकंपा तर नक्कीच नाही. ही आमची गरज आहे, असे सद्गतीत उद्गार प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी सोमवारी शेतकर्‍यांच्या विधवांना आर्थिक मदत करताना येथे काढले.
नाना पाटेकर यांनी भावनिक साद दिल्याने सभागृहात अनेकांना आपला हुंदका रोखता आला नाही. पाणावलेल्या डोळ्यांनी उपस्थितांनी बळीराजाच्या ऋणातून उतराई होण्याचा संकल्प सोडला. औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील पीडित कुटुंबीयांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचा धनादेश व कपड्यांचे वाटप नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी केले. ही माणुसकीची चळवळ आहे. त्यात जीवंत, समंजस व्यक्तींनी सहभागी व्हावे, असे आवाहन चित्रपट अभिनेते अनासपुरे यांनी केले. (प्रतिनिधी)
-------------------
माझ्या पतीने काही खरं केलं नाही. एक आठ वर्षांचा मुलगा व चार वर्षांची मुलगी आहे मला. मुलांचे शिक्षण कसं करू. आम्ही चौघेच आहोत. त्यांच्या आंधळ्या आईला कसे सांभाळू.
- सरस्वती रहाटे,
अंभई, औरंगाबाद
--------------
(फोटोडेस्क)
सगळं संपलं, काय करू ?
हे गेले. मला सासू नाही. सासरा नाही. साडेपाच वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी आहे. कुणाचाच आसरा नाही. घर नाही. भाड्याने राहते. काय खाऊ, कसं राहू, असे म्हणत कविता सोमनाथ राऊत यांना रडू कोसळले. नाना पाटेकरांनी सांत्वन करुन तिला शांत केले.
--------------
आम्हा मजुरांचे काय?
मदतीचे वाटप होत असतानाच एक मध्यमवयीन व्यक्ती थेट धावत मंचावर पोहोचली. हातातील कागद नाना व मकरंद यांच्या समोर टाकून, शेतकर्‍यांना मदत व आम्हा मोलमजुरी करणार्‍यांना काहीच कसं नाही, म्हणत त्यांनी टाहो फोडला. मागील तीन वर्षांपासून माझी पत्नी आजारी आहे. काम करुन सर्व कुटुंब पोसतो. पत्नीच्या आजारासाठी आता पैसा नाही. वडील मंदिरासमोर भीक मागतात. मला उपचारासाठी मदत करा, असे ती व्यक्ती जोरजोराने सांगत होती. त्यांचे वृद्ध वडीलही त्याच्यापाठोपाठ याचना करीत मंचावर दाखल झाले. तेव्हा नाना व मकरंदने त्यांना मदतीचे आश्वासन देत शांत केले.