शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

आधार बंधनकारक !

By admin | Updated: March 12, 2016 04:49 IST

सरकारी सबसिडी पात्र व्यक्तीलाच मिळावी यासाठी लागू करण्यात आलेल्या आधार कार्ड योजनेवर मागील काळात कायदेशीर वाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर या योजनेला कायदेशीर स्वरूप देण्यासाठीच्या विधेयकावर

नवी दिल्ली : सरकारी सबसिडी पात्र व्यक्तीलाच मिळावी यासाठी लागू करण्यात आलेल्या आधार कार्ड योजनेवर मागील काळात कायदेशीर वाद झाल्याच्या पार्श्वभूमीवर या योजनेला कायदेशीर स्वरूप देण्यासाठीच्या विधेयकावर शुक्रवारी लोकसभेने मंजुरीची मोहर उमटवली. पळवाटांनी गडप होणाऱ्या सरकारी सबसिडीचे कोट्यवधी रुपये त्यामुळे वाचविणे शक्य होईल, असा दावा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला आहे.अपात्र लोकांकडे पैसा जाऊ न देता पात्र लोकांना त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी राज्यांना अधिकार बहाल करणारे हे विधेयक असल्याने सभागृहाने एकमताने ते मंजूर करावे, असे आवाहन अरुण जेटलींनी केले. आधार (आर्थिक पोच आणि अन्य सबसिडी, लाभ आणि सेवा) विधेयक २०१६ मंजूर झाल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारांना कोट्यवधी रुपयांची बचत करता येईल, असेही ते म्हणाले. आवाजी मतदानाने हे विधेयक संमत करण्यात आले. घरगुती गॅस (एलपीजी) ग्राहकांना आधारकार्डच्या माध्यमातून लक्ष्य ठरवून दिलेली सबसिडी पुरविण्यात आली असून त्यामुळे केंद्राला १५ हजार कोटींची बचत करता आली. चार राज्यांनी सार्वजनिक वितरण प्रणाली(पीडीएस) याच धर्तीवर चालवत २३०० कोटींची बचत केली आहे, असेही त्यांनी सांगितले.तत्पूर्वी झालेल्या चर्चेत सहभागी होताना आधार कायद्याद्वारे देशातील लोकांच्या वैयक्तिक आयुष्यावर पाळत ठेवली जाण्याची भीती असल्याची भीती बिजू जनता दलाचे तथागत सत्पथी यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे राजीव सातव म्हणाले की याच आधारवर नरेंद्र मोदी आणि राजनाथ सिंग यांनी विरोधी पक्षात असताना टीका केली होती आणि भाजपच्या नेत्या यांनी तर आधारची सीबीआय चौकशी करण्याची भाषा केली होती. शिवसेनेचे अरविंद सावंत व तेलगू देसमचे राममोहन नायडू यांनी विधेयकाचे जोरदार समर्थन केले, तर विधेयकातील सकारात्मक आणि नकारात्मक बाबींकडे माकपचे जीतेंद्र चौधरी यांनी सरकारचे लक्ष वेधले. काही सदस्यांनी हे विधेयक संसदेच्या स्थायी समितीकडे पाठवण्याची मागणी केली, तर वित्त विधेयकाच्या स्वरूपात ते आणून राज्यसभेत ते संमत होण्याची व्यवस्थाच सरकारने केली असल्याची टीकाही काही सदस्यांनी केली. (वृत्तसंस्था)———————————————सात वर्षे केवळ चर्चा...संपुआ सरकारच्या मंत्रिमंडळाने सप्टेंबर २०१० मध्ये आधार योजनेला मंजुरी देत डिसेंबरमध्ये या योजनेचा समावेश केला होता. गेल्या सात वर्षांपासून केवळ चर्चा सुरू होते. आता ही चर्चा संपली आहे. स्थायी समितीत व्यापक चर्चा झाली. जनतेकडून सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या सर्व बाबींची दखल घेण्यात आली आहे. याआधी प्राधिकरण स्थापन केले जात होते. ‘युनिक आयडेंटी’हा विशिष्ट ओळख क्रमांक देण्यामागचा उद्देश मात्र आधीच्या सरकारला स्पष्ट करता आला नव्हता. हा अनुभव लक्षात घेत आम्ही या बिलावर लक्ष केंद्रित केले, असेही जेटलींनी स्पष्ट केले.>>आधार विधेयकाची ठळक वैशिष्ट्येसरकारी सेवा व सबसिडीचा लाभ मिळवण्यासाठी आधार आधारभूत मानले जाईल.पासपोर्ट, रेशन कार्डसारख्या अधिकृत दस्तऐवजांसाठी आधार अनिवार्य ठरेल. बँकिंग व्यवहारांसाठी त्याची आवश्यकता भासेल.पेन्शनसारख्या सामाजिक हिताच्या योजनाही आधारशी संलग्न होतील. भारतीय नागरिक असल्याचा पुरावा नसून भारतात निवास करणाऱ्यांचे ते ओळखपत्र आहे. एलपीजी गॅस ग्राहक आधारशी जोडल्याने केंद्र सरकारची १५ हजार कोटींची बचत.काही राज्य सरकारांनी पीडीएस आधारशी संलग्न केल्यामुळे त्यांची २३00 कोटींची बचत.आधारधारकाचे तपशील त्याच्या संमतीशिवाय कोणालाही देता येणार नाहीत. ही माहिती कोणी लीक केल्यास शिक्षा.आधार कार्ड दररोज ५ ते ७ लाख लोकांना मिळत आहे.आधार विधेयकाची मूळ संकल्पना यूपीएची; मात्र युनिक आयडीचा नेमका वापर कशासाठी करणार, याविषयी स्पष्टता नव्हती. नव्या विधेयकात त्याचे सारे तपशील स्पष्ट केले आहेत.