शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

सुलभाताईंनी साहित्यात वेगळेपण निर्माण केले

By admin | Updated: July 31, 2015 23:54 IST

सुधीर पाठक : अभिव्यक्तीतर्फे सुलभाताई हेर्लेकर स्मृतिदिन

सुधीर पाठक : अभिव्यक्तीतर्फे सुलभाताई हेर्लेकर स्मृतिदिन
नागपूर : सुलभाताई हेर्लेकर यांनी मराठी साहित्य क्षेत्रात मोठी उंची गाठली आहे. वैदर्भीयामधून ग्रेस आणि सुरेश भट यांच्यासारखे दिग्गज असतांनाही सुलभाताईंनी मराठी साहित्यात स्वत:चे वेगळेपण निर्माण केले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार सुधीर पाठक यांनी व्यक्त केले.
सुलभाताई हेर्लेकर यांच्या तिसऱ्या स्मृतिदिनानिमित्त अभिव्यक्ती या वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे शुक्रवारी राष्ट्रभाषा प्रचार समितीच्या श्रीमंत बाबूराव धनवटे सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित सुधीर पाठक बोलत होते. ते पुढे म्हणाले, सुलभाताईंच्या साहित्यात स्त्रीवादी भाव आणि निसर्गप्रेमाचे वर्णन आहे. त्यांच्या साहित्याचा आस्वाद घ्यावा असे नेहमी वाटायचे, कारण काहीतरी वेगळे देणारी लेखिका म्हणून त्यांची ओळख होती. मात्र व्यक्ती म्हणूनही त्या ग्रेटच होत्या. त्यामुळेच त्यांच्या जाण्याला तीन वर्ष लोटूनही अभिव्यक्तीतर्फे त्यांच्या आठवणीत कार्यक्रम होणे, यातच सुलभाताईंच मोठेपण असल्याचे पाठक म्हणाले. याप्रसंगी अभिव्यक्ती संस्थेच्या अध्यक्षा सुप्रिया अय्यर यांनी प्रास्ताविकातून सुलभाताईंच्या आठवणींना उजाळा दिला. सुलभाताईंनी समीक्षा केल्या, ललितबंध निर्माण केले, मात्र कविता हा त्यांचा पिंड होता. कवयित्री म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रात मोठी उंची गाठली. मात्र व्यक्ती म्हणून त्या अतिशय चांगल्या होत्या. स्वभाव अतिशय मृदु आणि लाघवी असला तरी पाठीमागे ठामपणे उभे राहण्याचा खंबीरपणाही त्यांच्यात होता. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढणे कठीण आहे, अशा भावना अय्यर यांनी व्यक्त केल्या.
यावेळी सुलभाताईंच्या दूर दिव्याच्या सायंकाळी या ललितबंधातील काही अंश अभिनयरूपात सादर करण्यात आले. केतकी कुलकर्णी हिने मोगऱ्याचे झेले, मधुरा देशपांडे हिने मैत्रीचे घर व डॉ. शुभा साठे यांनी अंबादेवीच्या कुशीतले माहेरपण हे ललितबंधाचे अंश आपल्या सुरेख अभिनयाने श्रोत्यांसमोर सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अश्विनी पोफळे यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना सुप्रिया अय्यर आणि हेमा नागपूरकर यांची होती.