शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शेतकऱ्यांना देशद्रोही आणि खलिस्तानी म्हणायचा अधिकार तुम्हाला कुणी दिला?; सुखबीरसिंग बादल यांचा भाजपला सवाल

By मोरेश्वर येरम | Updated: December 3, 2020 18:20 IST

शेतकरी आंदोलनात अनेक वृद्ध महिला देखील सामील झालेल्या आहेत. मग त्यापण खलिस्तानी आहेत का? देशाच्या शेतकऱ्यांना संबोधित करण्याचा हा नेमका कोणता प्रकार आहे?

चंदीगडनव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या आठ दिवसांपासून दिल्लीच्या वेशीवर आंदोलन सुरु आहे. तर गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी संघटना आणि केंद्र सरकारमध्ये बैठकांचं सत्र सुरू असूनही अद्याप काही तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला माजी खेळाडूंनीही पाठिंबा दिला आहे. शिरोमणी अकाली दलाचे खासदार सुखबीरसिंग बादल यांनीही भाजपवर जोरदार टीका केली आहे. आंदोलनातील शेतकऱ्यांना देशद्रोही ठरविण्याचा अधिकार भाजपला कुणी दिला, असा सवाल सुखबीरसिंग बादल यांनी उपस्थित केला आहे. 

"शेतकरी आंदोलनात अनेक वृद्ध महिला देखील सामील झालेल्या आहेत. मग त्यापण खलिस्तानी आहेत का? देशाच्या शेतकऱ्यांना संबोधित करण्याचा हा नेमका कोणता प्रकार आहे? शेतकऱ्यांना देशद्रोही आणि खलिस्तानी म्हणणं हा त्यांचा अपमान आहे. देशातील शेतकऱ्यांना देशद्रोही म्हणण्याचा अधिकार कुणी दिला?", असं सुखबीरसिंग बादल म्हणाले. 

प्रकाशसिंह बादल यांनी पद्म विभूषण पुरस्कार केला परतशेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा न निघाल्याने प्रकाशसिंह बादल यांना मोदी सरकारने दिलेला पद्म विभूषण पुरस्कार परत करण्याबाबतचं पत्र राष्ट्रपतींना लिहीलं आहे. "प्रकाशसिंह बादल यांनी आपलं पूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी व्यतित केलं आहे. त्यामुळे सरकारला एक खणखणीत चपकार देण्यासाठी त्यांनी आपला पुरस्कार परत केला आहे. जर शेतकऱ्यांनाच हा नवा कायदा गरजेचा वाटत नसताना सरकार तो लादण्याचा का प्रयत्न करतंय?", असं सुखबीरसिंह बादल म्हणाले. 

हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी केलं होतं वादग्रस्त वक्तव्यहरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी शेतकरी आंदोलनात खलिस्तान्यांचा समावेश असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला. शेतकऱ्यांच्या आंदोलनात हिंसक वळण देण्यासाठी काही खलिस्तानी देखील यात सामील झाले आहेत, असा दावा खट्टर यांनी केला होता. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपdelhiदिल्लीBJPभाजपा