शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
2
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
3
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
4
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले
5
Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
6
VIDEO: भारतीय संघाची जर्सी घालून पाकिस्तानच्या गल्लीबोळात फिरला तरूण, पुढे काय घडलं?
7
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
8
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
9
Smartphones: १०,००० रुपयांपेक्षा कमी किमतीत ५० मेगापिक्सेलचा कॅमेरा; जाणून घ्या 'या' ७ स्मार्टफोनबद्दल!
10
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
11
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
12
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
13
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
14
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
15
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
16
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
17
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
18
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
19
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
20
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!

निमलष्करी दलांमध्ये आत्महत्या अधिक; अस्थैर्य, एकाकीपणाने जवानांमध्ये नैराश्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 02:15 IST

केंद्रीय निमलष्करी दलांमधील सुमारे ७०० जवानांनी गेल्या काही वर्षांत आत्महत्या केली व ही संख्या कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य आलेल्या जवानांहून अधिक आहे. शिवाय याच काळात या दलांमधील नऊ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे , अशी धक्कादायक माहिती गृह मंत्रालयाने एका संसदीय समितीस दिली आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय निमलष्करी दलांमधील सुमारे ७०० जवानांनी गेल्या काही वर्षांत आत्महत्या केली व ही संख्या कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य आलेल्या जवानांहून अधिक आहे. शिवाय याच काळात या दलांमधील नऊ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे , अशी धक्कादायक माहिती गृह मंत्रालयाने एका संसदीय समितीस दिली आहे.भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील संसदेच्या अंदाज समितीने त्यांच्या ताज्या अहवालात मंत्रालयाच्या अधिकाºयांनी यासंदर्भात दिलेली माहिती नमूद केली आहे. जीवनातील अस्थिरता, एकाकीपणा आणि त्यामुळे निर्माण होणारे कौटुंबिक कलह ही आत्महत्यांची प्रमुख कारणे असल्याचे अधिकाºयांनी समितीस सांगितले.आत्महत्या आणि सेवा बजावताना आलेला मृत्यू यांचे सर्वाधिक व्यस्त गुणोत्तर सशस्त्र सेवा दल (१:८), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (१:६३) आणि भारत तिबेट सीमा पोलीस (१: ४) या निमलष्करी दलांमध्ये आहे, असेही समितीस सांगण्यात आले.समितीच्या अहवालानुसार गृह सचिवांनी असे सांगितले की, या विषयी आम्ही मंत्रालयात चर्चा केली. त्यातून असे दिसले की, जीवनातील अस्थिरता, एकाकीपणा आणि कौटुंबिक कलह ही आत्महत्यांची प्रमुख कारणे आहेत. या दलांमधील जवान वर्षातील १०-११ महिने घराबाहेर असतात. त्यावरून वैवाहिक संबंधांना संशयाचे ग्रहण लागते व त्यातून साहजिकच मानसिक तणाव निर्माण होतो. या दलांना नेहमीच कुठे ना कुठे तैनात करावे लागत असल्याने कर्मचाºयांना त्यांच्या हक्काच्या रजाही घेता येत नाहीत.मंत्रालायाने असेही सांगितले की, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व भारत तिबेट सीमा पोलीस या दलांनी त्यांच्या नावाप्रमाणे ठराविक ठिकाणीच काम करणे अपेक्षित असले तरी निर्माण होणाºया परिस्थितीनुसार त्यांना आसाम ते केरळ आणि केरळ ते काश्मिर असे देशात कुठेही तैनात केले जाते. परिणामी या दलांमधील जवानांचा एका ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम नसतो. त्यांचे मुख्यालयही एका ठिकाणी नसते.अशा झाल्या आत्महत्यागृह मंत्रालयाने या सहा वर्षाच्या काळात प्रत्येक दलामध्ये किती आत्महत्या झाल्या याची संगतवार माहिती मंत्रालयाने समितीस दिली नाही. मात्र काही दलांची काही वर्षांची आकडेवारी दिली.ती अशी-- सीआरपीएफ: (सन २०१२) १८९ आत्महत्या, १७५ सेवेत मृत्यू- बीएसएफ: (सन २०११) ५२९ आत्महत्या, ४९१ सेवेत मृत्यू- आयटीबीपी: (सन २००६) ६२ आत्महत्या, १६ सेवेत मृत्यू- सीआयएसएफ: (सन २०१३) ६३ आत्महत्या, एक सेवेत मृत्यू- एसएसबी: (सन २०१३) ३२ आत्महत्या, चार सेवेत मृत्यू- आसाम रायफल्स : (सन २०१४) २७ आत्महत्या, ३३ सेवेत मृत्यू

टॅग्स :Suicideआत्महत्या