शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

निमलष्करी दलांमध्ये आत्महत्या अधिक; अस्थैर्य, एकाकीपणाने जवानांमध्ये नैराश्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 02:15 IST

केंद्रीय निमलष्करी दलांमधील सुमारे ७०० जवानांनी गेल्या काही वर्षांत आत्महत्या केली व ही संख्या कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य आलेल्या जवानांहून अधिक आहे. शिवाय याच काळात या दलांमधील नऊ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे , अशी धक्कादायक माहिती गृह मंत्रालयाने एका संसदीय समितीस दिली आहे.

नवी दिल्ली : केंद्रीय निमलष्करी दलांमधील सुमारे ७०० जवानांनी गेल्या काही वर्षांत आत्महत्या केली व ही संख्या कर्तव्य बजावत असताना हौतात्म्य आलेल्या जवानांहून अधिक आहे. शिवाय याच काळात या दलांमधील नऊ हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे , अशी धक्कादायक माहिती गृह मंत्रालयाने एका संसदीय समितीस दिली आहे.भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखालील संसदेच्या अंदाज समितीने त्यांच्या ताज्या अहवालात मंत्रालयाच्या अधिकाºयांनी यासंदर्भात दिलेली माहिती नमूद केली आहे. जीवनातील अस्थिरता, एकाकीपणा आणि त्यामुळे निर्माण होणारे कौटुंबिक कलह ही आत्महत्यांची प्रमुख कारणे असल्याचे अधिकाºयांनी समितीस सांगितले.आत्महत्या आणि सेवा बजावताना आलेला मृत्यू यांचे सर्वाधिक व्यस्त गुणोत्तर सशस्त्र सेवा दल (१:८), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (१:६३) आणि भारत तिबेट सीमा पोलीस (१: ४) या निमलष्करी दलांमध्ये आहे, असेही समितीस सांगण्यात आले.समितीच्या अहवालानुसार गृह सचिवांनी असे सांगितले की, या विषयी आम्ही मंत्रालयात चर्चा केली. त्यातून असे दिसले की, जीवनातील अस्थिरता, एकाकीपणा आणि कौटुंबिक कलह ही आत्महत्यांची प्रमुख कारणे आहेत. या दलांमधील जवान वर्षातील १०-११ महिने घराबाहेर असतात. त्यावरून वैवाहिक संबंधांना संशयाचे ग्रहण लागते व त्यातून साहजिकच मानसिक तणाव निर्माण होतो. या दलांना नेहमीच कुठे ना कुठे तैनात करावे लागत असल्याने कर्मचाºयांना त्यांच्या हक्काच्या रजाही घेता येत नाहीत.मंत्रालायाने असेही सांगितले की, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल व भारत तिबेट सीमा पोलीस या दलांनी त्यांच्या नावाप्रमाणे ठराविक ठिकाणीच काम करणे अपेक्षित असले तरी निर्माण होणाºया परिस्थितीनुसार त्यांना आसाम ते केरळ आणि केरळ ते काश्मिर असे देशात कुठेही तैनात केले जाते. परिणामी या दलांमधील जवानांचा एका ठिकाणी दीर्घकाळ मुक्काम नसतो. त्यांचे मुख्यालयही एका ठिकाणी नसते.अशा झाल्या आत्महत्यागृह मंत्रालयाने या सहा वर्षाच्या काळात प्रत्येक दलामध्ये किती आत्महत्या झाल्या याची संगतवार माहिती मंत्रालयाने समितीस दिली नाही. मात्र काही दलांची काही वर्षांची आकडेवारी दिली.ती अशी-- सीआरपीएफ: (सन २०१२) १८९ आत्महत्या, १७५ सेवेत मृत्यू- बीएसएफ: (सन २०११) ५२९ आत्महत्या, ४९१ सेवेत मृत्यू- आयटीबीपी: (सन २००६) ६२ आत्महत्या, १६ सेवेत मृत्यू- सीआयएसएफ: (सन २०१३) ६३ आत्महत्या, एक सेवेत मृत्यू- एसएसबी: (सन २०१३) ३२ आत्महत्या, चार सेवेत मृत्यू- आसाम रायफल्स : (सन २०१४) २७ आत्महत्या, ३३ सेवेत मृत्यू

टॅग्स :Suicideआत्महत्या