शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

देशात दर तीन सेकंदांना एक आत्महत्या; मानसिक आरोग्य कायद्याची अंमलबजावणी शनिवारपासून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 01:17 IST

देशामध्ये दर तीन सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करतो. १५ ते २९ वयोगटातील युवकांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण देशात खूप मोठे आहे. २०२० सालापर्यंत एकूण लोकसंख्येपैकी २० टक्के जनता ही कोणत्या ना कोणत्या मानसिक विकारांनी ग्रस्त असेल.

नवी दिल्ली : देशामध्ये दर तीन सेकंदाला एक व्यक्ती आत्महत्या करतो. १५ ते २९ वयोगटातील युवकांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण देशात खूप मोठे आहे. २०२० सालापर्यंत एकूण लोकसंख्येपैकी २० टक्के जनता ही कोणत्या ना कोणत्या मानसिक विकारांनी ग्रस्त असेल. या परिस्थितीत मानसिक आरोग्य जपण्यासाठी प्रत्येकाला प्राथमिक उपचार मिळण्याची सोय सरकारने करणे आवश्यक आहे. मानसिक आरोग्य कायदा २०१७ची अमलबजावणी शनिवारी, ७ जुलैपासून होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर मानसोपचार तज्ज्ञांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे.

देशात १० कोटीहून अधिक मानसिक रुग्णजागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनूसार भारतातील १३५ कोटी लोकसंख्येपैकी ७.५ टक्के लोक हे मानसिक विकारांनी ग्रस्त आहेत. त्यातील काहींच्या विकाराचे स्वरुप सामान्य तसेच अतिशय गंभीरही आहे. जगातील १९५ देशांपैकी भारतासह असे फक्त १३ देश आहेत ज्यामध्ये मानसिक विकारांनी ग्रस्त असलेल्यांची संख्या प्रत्येकी १० कोटींच्या वर आहे. भारतामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने अशा प्रकारचे रुग्ण असूनही त्यांच्यावर उपचार करण्याकरिता फक्त ३८०० मानसोपचार तज्ज्ञ, ८९८ क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट, ८५० सायक्रिअ‍ॅटिक सोशल वर्कर, १५०० सायक्रिअ‍ॅटिक नर्सेस, ४३ मनोरुग्ण रुग्णालये इतकीच संसाधने उपलब्ध आहेत.देशातील सर्व मानसिक रुग्णालयांमध्ये फक्त २० हजार खाटाच उपलब्ध आहेत. त्यामुळे सर्वच मानसिक विकारग्रस्तांना योग्य उपचार मिळतात असे होत नाही. किंवा काहींना उपचारच मिळत नाहीत.खूप कमी रुग्णांना मिळतात उपचारमानसिक विकारग्रस्त रुग्णांची एकुण संख्येच्या मानाने खूप कमी रुग्णांवर उपचार होतात. त्यामुळे प्रत्येक मानसिक विकारग्रस्ताला प्राथमिक उपचार मिळण्याची सोय सरकारने करावी अशी मागणी मानसोपचार तज्ज्ञांनी केली आहे. देशात मानसोपचाराच्या व्यापक सुविधा सरकारी व खासगी क्षेत्रात उभ्या राहाव्यात व त्यावर योग्य नियंत्रण असावे यासाठी हा मानसिक आरोग्य कायदा २०१७ बनविण्यात आला आहे. त्याची प्रभावी अमलबजावणी व्हावी यासाठी सरकारने विशेष लक्ष द्यावे असे मानसोपचार तज्ज्ञांनी म्हटले आहे.

टॅग्स :Suicideआत्महत्या