शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शहरातील गरिबांतील कुपोषण रोखण्याच्या राज्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 04:47 IST

शहरांतील झोपडपट्ट्यांत राहणारे गरीब आणि स्थलांतरितांमधील कुपोषण रोखण्यावर लक्ष केंद्रित करा, अशा सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिल्या आहेत.

नवी दिल्ली : पोषण अभियानांतर्गत महिनाभर चालणाऱ्या कुपोषणविरोधी मोहिमेत शहरांतील झोपडपट्ट्यांत राहणारे गरीब आणि स्थलांतरितांमधील कुपोषण रोखण्यावर लक्ष केंद्रित करा, अशा सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारांना दिल्या आहेत.केंद्रीय महिला व बालकल्याण विकास मंत्रालयाने राज्य आणि जिल्हा अधिकाऱ्यांसाठी एक टिपण जारी केले आहे. त्यात या सूचना करण्यात आल्या आहेत. राज्य, जिल्हा आणि गट पातळीवरील अधिकाºयांच्या जबाबदाºया यात निश्चित करण्यात आल्या आहेत. विविध विभागांत समन्वय वाढविणे, शहरी आरोग्य सेवांचा विकास करणे आणि स्वच्छ भारत अभियानाचा संदेश प्रसारित करणे यासाठी विशेष पावले उचलण्याच्या सूचना या अधिकाºयांना करण्यात आल्या आहेत.मंत्रालयाने राज्य सरकारांना सांगितले की, स्थलांतरितांशी संपर्क साधण्यासाठी राज्यांनी कामगार केंद्रित उद्योग आणि खाजगी रोजगारदात्यांशी संपर्क करावा. त्यांना पोषण अभियानाबाबत संवेदनशील करावे.>2018 पासून सप्टेंबरमध्ये पोषण अभियान राबविण्यात येते. हा महिना ‘पोषण मास’ म्हणून साजरा केला जातो. माता, बाळ आणि लहान मुले यांच्याबाबतीत वर्तनात्मक बदल घडविण्यासाठी हे अभियान सुरू करण्यात आले आहे.सरकारने म्हटले की, गरिबांची वाढती संख्या, अन्न सुरक्षेची जोखीम आणि अनारोग्यकारक खाद्य वातावरण यातून शहरातील कुपोषण प्रामुख्याने वाढत आहे. या कुपोषणावर मात करण्यासाठी राज्य सरकारांनी झोपडपट्टीवासीय आणि स्थलांतरित यांच्यापर्यंत आरोग्य सेवा पोषण सेवा पोहोचवाव्यात.