शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
2
CAA, आरक्षण अन् राम मंदिराचा निर्णय..; PM नरेंद्र मोदींनी दिल्या 5 गॅरंटी
3
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
4
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
5
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
6
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
7
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
8
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
9
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
10
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
11
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
12
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
13
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
14
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
15
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
16
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
17
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
18
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
19
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
20
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला

“इंदूर-भोपाळ वंदे भारत फेल होणार हे माहिती होते, राजकारणामुळे तो निर्णय घेण्यात आला”

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 5:18 PM

Vande Bharat Express Train: इंदूर ते भोपाळ या मार्गावर वंदे भारत सुरू करण्याचा निर्णय व्यवहार्य नव्हता. आता तिकीट दर कमी केल्यास मोठे नुकसान होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.

Vande Bharat Express Train: देशभरात सुरू असलेल्या ३४ वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची लोकप्रियता आणि प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू झालेले असे काही मार्ग आहेत, ज्या मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद अतिशय कमी आहे. यामध्ये इंदूर-भोपाळ मार्गाचा समावेश आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे जनक मानले जाणारे सुधांशू मणि यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. इंदूर-भोपाळ या मार्गावर वंदे भारत ट्रेन फेल होणार हे माहिती होते. परंतु, राजकारणामुळे हा निर्णय घेण्यात आला, असा दावा सुधांशू मणि यांनी केला. 

इंदूर-भोपाळ मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करणे व्यवहार्य निर्णय नव्हता. या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली, तर ती यशस्वी होऊ शकणार नाही, हे आधीपासून माहिती होते. मात्र, राजकीय कारणांमुळे सदर निर्णय घेण्यात आला. या मार्गावरील अन्य ट्रेनने जायला प्रवाशांना तेवढाच वेळ लागतो. त्या ट्रेनचे तिकीट दरही तुलनेने फार स्वस्त आहेत. अशा परिस्थितीत महाग तिकीट काढून तेवढ्याच वेळात पोहोचण्याचा निर्णय प्रवासी का घेतील, असा उलटप्रश्न विचारत या मार्गाच्या प्रतिसादाबाबत सुधांशू मणि यांनी नाराजी व्यक्त केली. इंदूर-भोपाळ मार्गावरील वंदे भारत ट्रेन ७० टक्के रिकामी जाते, अशी माहिती देण्यात आली आहे. 

तिकीट दर कमी करून मोठे नुकसान होईल

इंदूर-भोपाळ मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला जात आहे. मात्र, हे चुकीचे ठरेल. तिकीट दर कमी केल्यास मोठे नुकसान सोसावे लागेल. एखादी ट्रेन मार्गावर सुरू करण्याआधी मोठा सर्व्हे केला जातो. तो सर्व्हे सकारात्मक असेल, तरच त्या मार्गावर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येतो. मात्र, याबाबतीत असे घडले नाही, असे सुधांशू मणि यांनी सांगितले. 

भविष्यात राजधानी ट्रेन बंद होणार

येत्या ५ वर्षात देशात ५०० वंदे भारत ट्रेन चालवण्याची तयारी आहे. देशाच्या विविध भागांमध्ये वंदे भारत ट्रेन सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. ज्या मार्गांवर जास्त प्रतिसाद आहे, त्याच मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवावी, असे सुधांशू मणि यांनी स्पष्ट केले. भविष्यात देशातील सर्व राजधानी ट्रेन सेवा बंद केल्या जातील. हे टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. प्रत्येक राजधानीची जागा वंदे भारत स्लीपर ट्रेन घेणार आहे. यासोबतच रेल्वे स्थानके सुधारण्याचे कामही वेगाने केले जाणार आहे, अशी माहिती सुधांशू मणि यांनी दिली.

दरम्यान, वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन इंदूर ते भोपाळ या मार्गावर चालवली जात होती. मात्र, प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे या ट्रेनची सेवा नागपूरपर्यंत वाढवण्यात आली. ही ट्रेन इंदूर जंक्शनवरून सकाळी ०६ वाजून १० मिनिटांनी सुटते आणि दुपारी ०२ वाजून ३० मिनिटांनी नागपूरला पोहोचते. या मार्गावर ६ स्थानकांवर वंदे भारत थांबते. सुमारे ८ तास २० मिनिटांत ६३५ किलोमीटरचे अंतर कापते.  

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेbhopal-pcभोपाळindore-pcइंदौर