शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

“इंदूर-भोपाळ वंदे भारत फेल होणार हे माहिती होते, राजकारणामुळे तो निर्णय घेण्यात आला”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 17:18 IST

Vande Bharat Express Train: इंदूर ते भोपाळ या मार्गावर वंदे भारत सुरू करण्याचा निर्णय व्यवहार्य नव्हता. आता तिकीट दर कमी केल्यास मोठे नुकसान होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.

Vande Bharat Express Train: देशभरात सुरू असलेल्या ३४ वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची लोकप्रियता आणि प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू झालेले असे काही मार्ग आहेत, ज्या मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद अतिशय कमी आहे. यामध्ये इंदूर-भोपाळ मार्गाचा समावेश आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे जनक मानले जाणारे सुधांशू मणि यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. इंदूर-भोपाळ या मार्गावर वंदे भारत ट्रेन फेल होणार हे माहिती होते. परंतु, राजकारणामुळे हा निर्णय घेण्यात आला, असा दावा सुधांशू मणि यांनी केला. 

इंदूर-भोपाळ मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करणे व्यवहार्य निर्णय नव्हता. या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली, तर ती यशस्वी होऊ शकणार नाही, हे आधीपासून माहिती होते. मात्र, राजकीय कारणांमुळे सदर निर्णय घेण्यात आला. या मार्गावरील अन्य ट्रेनने जायला प्रवाशांना तेवढाच वेळ लागतो. त्या ट्रेनचे तिकीट दरही तुलनेने फार स्वस्त आहेत. अशा परिस्थितीत महाग तिकीट काढून तेवढ्याच वेळात पोहोचण्याचा निर्णय प्रवासी का घेतील, असा उलटप्रश्न विचारत या मार्गाच्या प्रतिसादाबाबत सुधांशू मणि यांनी नाराजी व्यक्त केली. इंदूर-भोपाळ मार्गावरील वंदे भारत ट्रेन ७० टक्के रिकामी जाते, अशी माहिती देण्यात आली आहे. 

तिकीट दर कमी करून मोठे नुकसान होईल

इंदूर-भोपाळ मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला जात आहे. मात्र, हे चुकीचे ठरेल. तिकीट दर कमी केल्यास मोठे नुकसान सोसावे लागेल. एखादी ट्रेन मार्गावर सुरू करण्याआधी मोठा सर्व्हे केला जातो. तो सर्व्हे सकारात्मक असेल, तरच त्या मार्गावर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येतो. मात्र, याबाबतीत असे घडले नाही, असे सुधांशू मणि यांनी सांगितले. 

भविष्यात राजधानी ट्रेन बंद होणार

येत्या ५ वर्षात देशात ५०० वंदे भारत ट्रेन चालवण्याची तयारी आहे. देशाच्या विविध भागांमध्ये वंदे भारत ट्रेन सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. ज्या मार्गांवर जास्त प्रतिसाद आहे, त्याच मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवावी, असे सुधांशू मणि यांनी स्पष्ट केले. भविष्यात देशातील सर्व राजधानी ट्रेन सेवा बंद केल्या जातील. हे टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. प्रत्येक राजधानीची जागा वंदे भारत स्लीपर ट्रेन घेणार आहे. यासोबतच रेल्वे स्थानके सुधारण्याचे कामही वेगाने केले जाणार आहे, अशी माहिती सुधांशू मणि यांनी दिली.

दरम्यान, वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन इंदूर ते भोपाळ या मार्गावर चालवली जात होती. मात्र, प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे या ट्रेनची सेवा नागपूरपर्यंत वाढवण्यात आली. ही ट्रेन इंदूर जंक्शनवरून सकाळी ०६ वाजून १० मिनिटांनी सुटते आणि दुपारी ०२ वाजून ३० मिनिटांनी नागपूरला पोहोचते. या मार्गावर ६ स्थानकांवर वंदे भारत थांबते. सुमारे ८ तास २० मिनिटांत ६३५ किलोमीटरचे अंतर कापते.  

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेbhopal-pcभोपाळindore-pcइंदौर