शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
5
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
6
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
7
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
8
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
9
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
10
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
11
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
12
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
13
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
14
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
15
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
16
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
17
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
18
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
19
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
20
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले

“इंदूर-भोपाळ वंदे भारत फेल होणार हे माहिती होते, राजकारणामुळे तो निर्णय घेण्यात आला”

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 17:18 IST

Vande Bharat Express Train: इंदूर ते भोपाळ या मार्गावर वंदे भारत सुरू करण्याचा निर्णय व्यवहार्य नव्हता. आता तिकीट दर कमी केल्यास मोठे नुकसान होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे.

Vande Bharat Express Train: देशभरात सुरू असलेल्या ३४ वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेनची लोकप्रियता आणि प्रवाशांचा मिळणारा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. मात्र, वंदे भारत ट्रेनची सेवा सुरू झालेले असे काही मार्ग आहेत, ज्या मार्गांवर प्रवाशांचा प्रतिसाद अतिशय कमी आहे. यामध्ये इंदूर-भोपाळ मार्गाचा समावेश आहे. वंदे भारत एक्स्प्रेसचे जनक मानले जाणारे सुधांशू मणि यांनी याबाबत मोठा खुलासा केला आहे. इंदूर-भोपाळ या मार्गावर वंदे भारत ट्रेन फेल होणार हे माहिती होते. परंतु, राजकारणामुळे हा निर्णय घेण्यात आला, असा दावा सुधांशू मणि यांनी केला. 

इंदूर-भोपाळ मार्गावर वंदे भारत ट्रेन सुरू करणे व्यवहार्य निर्णय नव्हता. या मार्गावर वंदे भारत एक्स्प्रेस सुरू केली, तर ती यशस्वी होऊ शकणार नाही, हे आधीपासून माहिती होते. मात्र, राजकीय कारणांमुळे सदर निर्णय घेण्यात आला. या मार्गावरील अन्य ट्रेनने जायला प्रवाशांना तेवढाच वेळ लागतो. त्या ट्रेनचे तिकीट दरही तुलनेने फार स्वस्त आहेत. अशा परिस्थितीत महाग तिकीट काढून तेवढ्याच वेळात पोहोचण्याचा निर्णय प्रवासी का घेतील, असा उलटप्रश्न विचारत या मार्गाच्या प्रतिसादाबाबत सुधांशू मणि यांनी नाराजी व्यक्त केली. इंदूर-भोपाळ मार्गावरील वंदे भारत ट्रेन ७० टक्के रिकामी जाते, अशी माहिती देण्यात आली आहे. 

तिकीट दर कमी करून मोठे नुकसान होईल

इंदूर-भोपाळ मार्गावरील वंदे भारत एक्स्प्रेसचे तिकीट दर कमी करण्याचा निर्णय घेतला जात आहे. मात्र, हे चुकीचे ठरेल. तिकीट दर कमी केल्यास मोठे नुकसान सोसावे लागेल. एखादी ट्रेन मार्गावर सुरू करण्याआधी मोठा सर्व्हे केला जातो. तो सर्व्हे सकारात्मक असेल, तरच त्या मार्गावर ट्रेन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात येतो. मात्र, याबाबतीत असे घडले नाही, असे सुधांशू मणि यांनी सांगितले. 

भविष्यात राजधानी ट्रेन बंद होणार

येत्या ५ वर्षात देशात ५०० वंदे भारत ट्रेन चालवण्याची तयारी आहे. देशाच्या विविध भागांमध्ये वंदे भारत ट्रेन सेवा सुरू करण्याचे नियोजन आहे. ज्या मार्गांवर जास्त प्रतिसाद आहे, त्याच मार्गांवर वंदे भारत ट्रेन चालवावी, असे सुधांशू मणि यांनी स्पष्ट केले. भविष्यात देशातील सर्व राजधानी ट्रेन सेवा बंद केल्या जातील. हे टप्प्याटप्प्याने केले जाणार आहे. प्रत्येक राजधानीची जागा वंदे भारत स्लीपर ट्रेन घेणार आहे. यासोबतच रेल्वे स्थानके सुधारण्याचे कामही वेगाने केले जाणार आहे, अशी माहिती सुधांशू मणि यांनी दिली.

दरम्यान, वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन इंदूर ते भोपाळ या मार्गावर चालवली जात होती. मात्र, प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे या ट्रेनची सेवा नागपूरपर्यंत वाढवण्यात आली. ही ट्रेन इंदूर जंक्शनवरून सकाळी ०६ वाजून १० मिनिटांनी सुटते आणि दुपारी ०२ वाजून ३० मिनिटांनी नागपूरला पोहोचते. या मार्गावर ६ स्थानकांवर वंदे भारत थांबते. सुमारे ८ तास २० मिनिटांत ६३५ किलोमीटरचे अंतर कापते.  

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसIndian Railwayभारतीय रेल्वेbhopal-pcभोपाळindore-pcइंदौर