शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

अशी विधाने उच्चपदाला शोभत नाहीत... भाजपाची अन्सारींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 18:10 IST

आता निवृत्तीनंतर राजकीय आश्रय शोधण्यासाठीच ते अशी विधाने करत आहेत, इतक्या उच्च पदावरील व्यक्तीने अशी विधाने करायला नको होती अशा शब्दांमध्ये भाजपाचे सरचिटणिस कैलाश विजयवर्गिय यांनी उपराष्ट्रपतींवर टीका केली आहे.

ठळक मुद्दे आपल्या देशात अल्पसंख्यांकांशी भेदभाव केला जात नाही असा इतिहासच आहे. अल्पसंख्य़ांक आपल्या गुणांच्या बळावर उच्च पदांवर विराजमानही झाले आहेत.- नायडूते अजूनही उपराष्ट्रपती आहेत आणि अशी विधाने त्यांच्या पदाला शोभत नाहीत.- विजयवर्गिय

नवी दिल्ली, दि.10- मावळते उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी निवृत्त होताना शेवटच्या मुलाखतीत केलेल्या विधानानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. देशात मुस्लीम समुदायात असुरक्षिततेची भावना असल्याचे विधान त्यांनी काल केले होते. त्यावर भाजपाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गिय यांनी उपराष्ट्रपतीपदावरच्या व्यक्तीने असे विधान करणे त्यांच्या पदाला शोभा देत नाहीत अशी टीका केली आहे. इतकेच नव्हे तर हमिद अन्सारी आता पदावरुन मुक्त झाल्यावर पुन्हा राजकीय आश्रय शोधत आहेत त्यामुळेच त्यांनी असे विधान केल्याचीही टीका विजयवर्गिय यांनी केली.

अन्सारी यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना विजयवर्गिय म्हणाले, 'मी अशा विधानाचा निषेध करतो. आता निवृत्त होत असल्यामुळेच अन्सारी यांनी असे विधान केले आहे. ते अजूनही उपराष्ट्रपती आहेत आणि अशी विधाने त्यांच्या पदाला शोभत नाहीत. आता निवृत्तीनंतर राजकीय आश्रय शोधण्यासाठीच ते अशी विधाने करत आहेत, इतक्या उच्च पदावरील व्यक्तीने अशी विधाने करायला नको होती.'

'नवनिर्वाचित उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देखिल अन्सारी यांच्या विधानाचा त्यांचे नाव न घेता समाचार घेतला. 'काही लोक भारतात अल्पसंख्यांक असुरक्षित असल्याचे सांगत आहेत, मात्र संपुर्ण जगाशी तुलना केली तर भारतामध्ये ते अधिक सुरक्षित असल्याचे दिसून येते.' भारतामध्ये सहनशिलता लोप पावत असल्याच्या टीकेलाही त्यांनी भारतीय समाज सर्वात जास्त सहनशिल असल्याचे सांगत सहनशिलतेमुळेच भारतात लोकशाही यशस्वी झाल्याचे नायडू यांनी स्पष्ट केले. जर तर तुम्ही एखाद्या समुदायाला वेगळे काढून विचार करायला लागलात की इतर समुदाय त्याचा चुकीचा अर्थ काढतील. म्हणून तर सर्व समुदाय एकसमान आहेत, सर्वांना समान न्या आणि कोणाचेही लांगूलचालन होणार नाही असे आम्ही म्हणतो. आपल्या देशात अल्पसंख्यांकांशी भेदभाव केला जात नाही असा इतिहासच आहे. अल्पसंख्य़ांक आपल्या गुणांच्या बळावर उच्च पदांवर विराजमानही झाले आहेत. भारतामध्ये सर्वधर्मसमभाव सर्व लोकांच्या मनात आणि रक्तातच आहे. भारत धर्मनिरपेक्ष राजकीय व्यक्तींमुळे नाही तर लोक आणि इथल्या संस्कृतीमुळे आहे. अशा शब्दांमध्ये नायडू यांनी आपले मत व्यक्त केले आहे. नायडू यांनी जरी अन्सारी यांचे नाव घेतले नसले तरी हे मत त्यांच्या विधानाला उत्तर समजले जाऊ शकते.