शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

अशी विधाने उच्चपदाला शोभत नाहीत... भाजपाची अन्सारींवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 18:10 IST

आता निवृत्तीनंतर राजकीय आश्रय शोधण्यासाठीच ते अशी विधाने करत आहेत, इतक्या उच्च पदावरील व्यक्तीने अशी विधाने करायला नको होती अशा शब्दांमध्ये भाजपाचे सरचिटणिस कैलाश विजयवर्गिय यांनी उपराष्ट्रपतींवर टीका केली आहे.

ठळक मुद्दे आपल्या देशात अल्पसंख्यांकांशी भेदभाव केला जात नाही असा इतिहासच आहे. अल्पसंख्य़ांक आपल्या गुणांच्या बळावर उच्च पदांवर विराजमानही झाले आहेत.- नायडूते अजूनही उपराष्ट्रपती आहेत आणि अशी विधाने त्यांच्या पदाला शोभत नाहीत.- विजयवर्गिय

नवी दिल्ली, दि.10- मावळते उपराष्ट्रपती हमिद अन्सारी यांनी निवृत्त होताना शेवटच्या मुलाखतीत केलेल्या विधानानंतर आता राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. देशात मुस्लीम समुदायात असुरक्षिततेची भावना असल्याचे विधान त्यांनी काल केले होते. त्यावर भाजपाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गिय यांनी उपराष्ट्रपतीपदावरच्या व्यक्तीने असे विधान करणे त्यांच्या पदाला शोभा देत नाहीत अशी टीका केली आहे. इतकेच नव्हे तर हमिद अन्सारी आता पदावरुन मुक्त झाल्यावर पुन्हा राजकीय आश्रय शोधत आहेत त्यामुळेच त्यांनी असे विधान केल्याचीही टीका विजयवर्गिय यांनी केली.

अन्सारी यांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना विजयवर्गिय म्हणाले, 'मी अशा विधानाचा निषेध करतो. आता निवृत्त होत असल्यामुळेच अन्सारी यांनी असे विधान केले आहे. ते अजूनही उपराष्ट्रपती आहेत आणि अशी विधाने त्यांच्या पदाला शोभत नाहीत. आता निवृत्तीनंतर राजकीय आश्रय शोधण्यासाठीच ते अशी विधाने करत आहेत, इतक्या उच्च पदावरील व्यक्तीने अशी विधाने करायला नको होती.'

'नवनिर्वाचित उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी देखिल अन्सारी यांच्या विधानाचा त्यांचे नाव न घेता समाचार घेतला. 'काही लोक भारतात अल्पसंख्यांक असुरक्षित असल्याचे सांगत आहेत, मात्र संपुर्ण जगाशी तुलना केली तर भारतामध्ये ते अधिक सुरक्षित असल्याचे दिसून येते.' भारतामध्ये सहनशिलता लोप पावत असल्याच्या टीकेलाही त्यांनी भारतीय समाज सर्वात जास्त सहनशिल असल्याचे सांगत सहनशिलतेमुळेच भारतात लोकशाही यशस्वी झाल्याचे नायडू यांनी स्पष्ट केले. जर तर तुम्ही एखाद्या समुदायाला वेगळे काढून विचार करायला लागलात की इतर समुदाय त्याचा चुकीचा अर्थ काढतील. म्हणून तर सर्व समुदाय एकसमान आहेत, सर्वांना समान न्या आणि कोणाचेही लांगूलचालन होणार नाही असे आम्ही म्हणतो. आपल्या देशात अल्पसंख्यांकांशी भेदभाव केला जात नाही असा इतिहासच आहे. अल्पसंख्य़ांक आपल्या गुणांच्या बळावर उच्च पदांवर विराजमानही झाले आहेत. भारतामध्ये सर्वधर्मसमभाव सर्व लोकांच्या मनात आणि रक्तातच आहे. भारत धर्मनिरपेक्ष राजकीय व्यक्तींमुळे नाही तर लोक आणि इथल्या संस्कृतीमुळे आहे. अशा शब्दांमध्ये नायडू यांनी आपले मत व्यक्त केले आहे. नायडू यांनी जरी अन्सारी यांचे नाव घेतले नसले तरी हे मत त्यांच्या विधानाला उत्तर समजले जाऊ शकते.