शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

कधी टेम्पो चालवला तर कधी भिकाऱ्यांसोबत झोपला; 12वी नापास मुलगा 'असा' IPS अधिकारी झाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 12:28 IST

मनोज कुमार हे बारावी नापास झाले होते. इयत्ता नववी आणि दहावीमध्ये कसेबसे उत्तीर्ण झाले.

IPS मनोज कुमार शर्मा हे मध्य प्रदेशातील मुरैना जिल्ह्यातील रहिवासी आहेत. लहानपणापासूनच ते अभ्यासात हुशार नव्हते. आर्थिक परिस्थितीशी झगडणाऱ्या कुटुंबात त्यांचं पालनपोषणही झालं. देशातील सर्वात कठीण स्पर्धा परीक्षा, UPSC परीक्षा उत्तीर्ण करून त्यांनी जिद्दीने करून दाखवलं आहे. मनोज कुमार शर्मा यांचा हा प्रवास सोपा नव्हता. एखाद्या चित्रपटाप्रमाणे त्यांच्या आयुष्यात चढ- उतार आले. पण त्यांनी धीराने या परिस्थितीशी सामना केला. विशेष म्हणजे आता त्यांच्या आयुष्यावर लवकरच चित्रपट देखील येणार आहे. 

मनोज कुमार हे बारावी नापास झाले होते. इयत्ता नववी आणि दहावीमध्ये कसेबसे उत्तीर्ण झाले. बारावीत फक्त हिंदी या एकाच विषयात पास झाले होते. मात्र तरी देखील त्यांनी जीद्द सोडली नाही. प्रेमामुळेच माझ्यावर नापास होण्याची वेळ आली. मात्र त्यानंतर प्रेमामुळे मी माझं ध्येय गाठू शकलो, मी आयपीएस परीक्षा पास झालो असं मनोज कुमार यांनी म्हटलं आहे. प्रेयसीने लग्नासाठी तशी अटच घातली होती. त्यामुळे प्रचंड मेहनत करून आयपीएस परीक्षेत त्यांनी यश मिळवलं.

मनोज यांना अत्यंत कठिण परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यांनी काही काळ टेम्पो देखील चालवला. त्यांना रात्री झोपण्यासाठी जागा देखील मिळत नसे. त्यामुळे भिकाऱ्यांसोबत झोपण्याची त्यांच्यावर वेळ आली. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील एका वाचनालयात काम सुरू केलं. या काळात त्यांचा पुस्तकांशी जवळून संबंध आला. त्यांचा य़ेथेच मॅक्सिम गार्की, अब्राहन लिंकन यांच्या विचारांशी परिचय झाला. पुढे हेच त्यांना अत्यंत फायद्याचं ठरलं.

मनोज कुमार शर्मा UPSC परीक्षेत तीन वेळा नापास झाले होते. त्यानंतर चौथ्या प्रयत्नात 121 वा क्रमांक मिळवून तो आयपीएस अधिकारी झाले. मनोज शर्मा हे सध्या मुंबई पोलीस दलात अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या जीवनातील संघर्ष कोणालाही अपयशातून शिकून पुढे जाण्याची प्रेरणा देतं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"