शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
6
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
7
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
8
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
9
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
10
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
11
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
16
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
17
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
18
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
20
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 

यश सहज मिळत नाही, दुप्पट मेहनत करा; स्टार अवनी लेखरा आणि सुहास यतीराज यांचा सल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 08:17 IST

दोन वेळा पॅरालिम्पिक चॅम्पियन असलेली नेमबाज लेखारा म्हणाली, “लोक म्हणतात की यश हे अपयशाचा समानार्थी आहे; पण मला वाटतं की अपयश हा यशाचा सर्वात मोठा भाग आहे. अपयशाशिवाय यश कधीच मिळू शकत नाही.”

नवी दिल्ली : अपयशाशिवाय यश मिळत नाही. यशासाठी कठोर परिश्रम करत राहणे अत्यंत आवश्यक आहे, असा सल्ला दिग्गज बॉक्सर एमसी मेरी कोम, पॅरालिम्पिक स्टार अवनी लेखरा आणि सुहास यतीराज यांनी ‘परीक्षा पे चर्चा’ उपक्रमात दिला.

दोन वेळा पॅरालिम्पिक चॅम्पियन असलेली नेमबाज लेखारा म्हणाली, “लोक म्हणतात की यश हे अपयशाचा समानार्थी आहे; पण मला वाटतं की अपयश हा यशाचा सर्वात मोठा भाग आहे. अपयशाशिवाय यश कधीच मिळू शकत नाही.”

तुमच्या समोर कोण आहे हे विसरा

पॅरालिम्पिक रौप्यपदक विजेता बॅडमिंटन स्टार आणि आयएएस अधिकारी सुहास म्हणाले, “चांगल्या गोष्टी सहज मिळत नाहीत. तुमचे मन हे तुमचे सर्वात मोठे मित्र आणि शत्रूही आहे. पराभवाच्या भीतीवर मात केल्यानंतर मी फक्त तो सामनाच नाही तर आणखी सहा सामने जिंकले.

लक्षात घ्या पराभवाच्या भीतीवर मात करा. तुमच्या समोर कोण आहे, याचा विचार करू नका.

शॉर्टकट नाही’

मेरी कोम म्हणाली, “बॉक्सिंग हा महिलांचा खेळ नाही. मी हे आव्हान स्वीकारले, कारण मला स्वतःला सिद्ध करायचे होते. देशातील सर्व महिलांना सांगायचे होते की आपण ते करू शकतो. जिद्दीतूनच मी अनेक वेळा विश्वविजेती झाले.

मुलांनो, हे लक्षात ठेवा

यशासाठी कोणताही शॉर्टकट नाही. अपयश हा यशाचा समानार्थी आहे.

तुमचे विचार तुमचे भविष्य ठरवतात. पराभवावर भीतीवर मात करा

स्पर्धा नेहमी स्वत:शी ठेवा. लक्ष केंद्रीत करण्यासाठी श्वासनाचा व्यायाम करा.

खेळ किंवा अभ्यास, यात ब्रेक हवाच. कोणत्याही आव्हानाला समोरे जाण्यापूर्वी स्वत:शी लढा.

चांगल्या गोष्टी सहजपणे मिळत नाहीत. दुप्पट मेहनत करा.

झोप अतिशय गरजेची आहे. मानसिक फिट रहाल तरच फिजिकली फिट.