शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

सुब्रमण्यम स्वामींनी NSA अजित डोवालना केले टार्गेट

By admin | Updated: July 12, 2017 12:46 IST

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चहूबाजूंनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका सुरु आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 12 - जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चहूबाजूंनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका सुरु आहे. आता भाजपाचेच खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एनएसए अजित डोवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वामी यांच्या टि्वटवरुन त्यांचा रोख डोवाल यांच्याकडे असल्याचे दिसत आहे. 25 जूनलाच दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याची माहिती सरकारला मिळाली होती. मग या हल्ल्यासाठी नोकरशाहीमध्ये कोणाला जबाबदार धरणार ? असा सवाल टि्वटमधून विचारला आहे. 
 
जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांच्या पत्राच्या आधारे स्वामींनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. मुनीर खान यांनी दहशतवादी अमरनाथ यात्रेकरुंना लक्ष्य करु शकतात असे लष्कर, सीआरपीएफला पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. जवळपास 15 दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांनी जम्मू काश्मीर प्रशासनाला अमरनाथ यात्रेला धोका असल्याचा अलर्ट दिला होता. संध्याकाळच्या वेळेस बसेसची वाहतूक थांबवून हल्ला टाळता येणं शक्य होतं. 25 जून रोजी चंदिगड येथे जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि गुप्तचर खात्याच्या अधिका-यांची एक बैठक पार पडली होती. 
 
आणखी वाचा 
अमरनाथ यात्रा, गुप्तचर यंत्रणांनी 15 दिवसांपूर्वीच दिला होता हल्ल्याचा इशारा
भारताच्या जेम्स बॉण्डला हटवण्यासाठी #SackDoval ट्रेंड
अमरनाथ यात्रेतील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत
 
या बैठकीत अमरनाथ यात्रेकरुंवर होणा-या हल्ल्याची माहिती देण्यात आली होती. आज स्वामींनी जो प्रश्न विचारलाय तोच प्रश्न काल काँग्रेसने विचारला होता. हल्ल्याची आगाऊ माहिती होती मग हल्ला रोखण्यासाठी वेळीच पावले का नाही उचलली ? असा सवाल सरकारला विचारण्यात आला होता. स्वामी यांनी यापूर्वी सुद्धा अजित डोवाल यांना टार्गेट केले आहे. एप्रिल महिन्यात त्यांनी काश्मीरमधल्या अस्थिर परिस्थितीसाठी अजित डोवाल यांना जबाबदार धरले होते. 
 
अजित डोवाल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीय वर्तुळात त्यांचा समावेश होतो. अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्यानंतर स्वामींनी राज्यातील सरकार बर्खास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा-पीडीपी आघाडीचे सरकार आहे. दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले.