शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!
2
'गोल्डन बॉय' नीरज चोप्रानं जिंकली पॅरिस डायमंड लीग स्पर्धा; पहिला प्रयत्न ठरला सगळ्यात भारी!
3
KL राहुल-यशस्वीनं रचला पाया; गिल-पंत जोडीही जमली! पण हा तर फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी...
4
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
5
ENG vs IND : 'सेनापती' झाला अन् SENA देशांतील शतकाचा दुष्काळच संपवला, शुबमन गिलची कडक सेंच्युरी
6
Viral Video : बायकोचा धाकच वेगळा! पठ्ठ्यानं गाडीवर लावला 'असा' बोर्ड, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्  
7
पती म्हणावा की हैवान? हुंड्यासाठी आधी मारहाण केली, मग खिडकीतून पत्नीला खाली फेकलं! 
8
ENG vs IND : "मेरी आदत है..." बॅटिंगवेळी यशस्वी जैस्वाल कॅप्टन गिलला असं का म्हणाला? व्हिडिओ व्हायरल
9
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा
10
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
11
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
12
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
13
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
14
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
15
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
16
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
17
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
18
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
19
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
20
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!

सुब्रमण्यम स्वामींनी NSA अजित डोवालना केले टार्गेट

By admin | Updated: July 12, 2017 12:46 IST

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चहूबाजूंनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका सुरु आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 12 - जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चहूबाजूंनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका सुरु आहे. आता भाजपाचेच खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एनएसए अजित डोवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वामी यांच्या टि्वटवरुन त्यांचा रोख डोवाल यांच्याकडे असल्याचे दिसत आहे. 25 जूनलाच दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याची माहिती सरकारला मिळाली होती. मग या हल्ल्यासाठी नोकरशाहीमध्ये कोणाला जबाबदार धरणार ? असा सवाल टि्वटमधून विचारला आहे. 
 
जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांच्या पत्राच्या आधारे स्वामींनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. मुनीर खान यांनी दहशतवादी अमरनाथ यात्रेकरुंना लक्ष्य करु शकतात असे लष्कर, सीआरपीएफला पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. जवळपास 15 दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांनी जम्मू काश्मीर प्रशासनाला अमरनाथ यात्रेला धोका असल्याचा अलर्ट दिला होता. संध्याकाळच्या वेळेस बसेसची वाहतूक थांबवून हल्ला टाळता येणं शक्य होतं. 25 जून रोजी चंदिगड येथे जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि गुप्तचर खात्याच्या अधिका-यांची एक बैठक पार पडली होती. 
 
आणखी वाचा 
अमरनाथ यात्रा, गुप्तचर यंत्रणांनी 15 दिवसांपूर्वीच दिला होता हल्ल्याचा इशारा
भारताच्या जेम्स बॉण्डला हटवण्यासाठी #SackDoval ट्रेंड
अमरनाथ यात्रेतील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत
 
या बैठकीत अमरनाथ यात्रेकरुंवर होणा-या हल्ल्याची माहिती देण्यात आली होती. आज स्वामींनी जो प्रश्न विचारलाय तोच प्रश्न काल काँग्रेसने विचारला होता. हल्ल्याची आगाऊ माहिती होती मग हल्ला रोखण्यासाठी वेळीच पावले का नाही उचलली ? असा सवाल सरकारला विचारण्यात आला होता. स्वामी यांनी यापूर्वी सुद्धा अजित डोवाल यांना टार्गेट केले आहे. एप्रिल महिन्यात त्यांनी काश्मीरमधल्या अस्थिर परिस्थितीसाठी अजित डोवाल यांना जबाबदार धरले होते. 
 
अजित डोवाल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीय वर्तुळात त्यांचा समावेश होतो. अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्यानंतर स्वामींनी राज्यातील सरकार बर्खास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा-पीडीपी आघाडीचे सरकार आहे. दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले.