शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

सुब्रमण्यम स्वामींनी NSA अजित डोवालना केले टार्गेट

By admin | Updated: July 12, 2017 12:46 IST

जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चहूबाजूंनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका सुरु आहे.

 ऑनलाइन लोकमत 

नवी दिल्ली, दि. 12 - जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरुंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चहूबाजूंनी नरेंद्र मोदी सरकारवर टीका सुरु आहे. आता भाजपाचेच खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी एनएसए अजित डोवाल यांच्यावर निशाणा साधला आहे. स्वामी यांच्या टि्वटवरुन त्यांचा रोख डोवाल यांच्याकडे असल्याचे दिसत आहे. 25 जूनलाच दहशतवादी हल्ल्याची शक्यता असल्याची माहिती सरकारला मिळाली होती. मग या हल्ल्यासाठी नोकरशाहीमध्ये कोणाला जबाबदार धरणार ? असा सवाल टि्वटमधून विचारला आहे. 
 
जम्मू-काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांच्या पत्राच्या आधारे स्वामींनी हा प्रश्न उपस्थित केला आहे. मुनीर खान यांनी दहशतवादी अमरनाथ यात्रेकरुंना लक्ष्य करु शकतात असे लष्कर, सीआरपीएफला पाठवलेल्या पत्रात म्हटले होते. जवळपास 15 दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांनी जम्मू काश्मीर प्रशासनाला अमरनाथ यात्रेला धोका असल्याचा अलर्ट दिला होता. संध्याकाळच्या वेळेस बसेसची वाहतूक थांबवून हल्ला टाळता येणं शक्य होतं. 25 जून रोजी चंदिगड येथे जम्मू काश्मीर पोलीस, सीआरपीएफ आणि गुप्तचर खात्याच्या अधिका-यांची एक बैठक पार पडली होती. 
 
आणखी वाचा 
अमरनाथ यात्रा, गुप्तचर यंत्रणांनी 15 दिवसांपूर्वीच दिला होता हल्ल्याचा इशारा
भारताच्या जेम्स बॉण्डला हटवण्यासाठी #SackDoval ट्रेंड
अमरनाथ यात्रेतील मृतांच्या नातेवाईकांना 10 लाखांची मदत
 
या बैठकीत अमरनाथ यात्रेकरुंवर होणा-या हल्ल्याची माहिती देण्यात आली होती. आज स्वामींनी जो प्रश्न विचारलाय तोच प्रश्न काल काँग्रेसने विचारला होता. हल्ल्याची आगाऊ माहिती होती मग हल्ला रोखण्यासाठी वेळीच पावले का नाही उचलली ? असा सवाल सरकारला विचारण्यात आला होता. स्वामी यांनी यापूर्वी सुद्धा अजित डोवाल यांना टार्गेट केले आहे. एप्रिल महिन्यात त्यांनी काश्मीरमधल्या अस्थिर परिस्थितीसाठी अजित डोवाल यांना जबाबदार धरले होते. 
 
अजित डोवाल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निकटवर्तीय वर्तुळात त्यांचा समावेश होतो. अमरनाथ यात्रेकरुंवरील हल्ल्यानंतर स्वामींनी राज्यातील सरकार बर्खास्त करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली होती. जम्मू-काश्मीरमध्ये भाजपा-पीडीपी आघाडीचे सरकार आहे. दहशतवाद्यांनी सोमवारी रात्री अमरनाथ यात्रेला निघालेल्या यात्रेकरूंच्या बसवर अनंतनाग जिल्ह्यात अंदाधुंद गोळीबार केल्याने त्यात ७ भाविक मरण पावले आणि तीन पोलिसांसह ३२ जखमी झाले.