भावपूर्ण सत्काराने रंगलेला सोहळा (भाग २)
By admin | Updated: December 27, 2014 23:38 IST
माझ्या विद्यार्थ्यांना स्वाभिमान दिला. विद्यार्थ्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व येत असल्याचे पाहून माझा हुरूप वाढला आणि कामही वाढले. प्रत्येकातच गुण असतात, विचार असतात पण आत्मविश्वास नसतो. मी हा विश्वास जागविण्याचे काम करतो आणि विद्यार्थी इंग्रजी शिकतात. गेल्या १५ वर्षापूर्वी मी सामान्यच होतो पण दरम्यानच्या काळात अनुभवांनी खूप शिकविले. हा माझ्या आयुष्यातील मोठा सत्कार आहे आणि यामुळे जबाबदारी वाढली, असे ते म्हणाले.
भावपूर्ण सत्काराने रंगलेला सोहळा (भाग २)
माझ्या विद्यार्थ्यांना स्वाभिमान दिला. विद्यार्थ्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व येत असल्याचे पाहून माझा हुरूप वाढला आणि कामही वाढले. प्रत्येकातच गुण असतात, विचार असतात पण आत्मविश्वास नसतो. मी हा विश्वास जागविण्याचे काम करतो आणि विद्यार्थी इंग्रजी शिकतात. गेल्या १५ वर्षापूर्वी मी सामान्यच होतो पण दरम्यानच्या काळात अनुभवांनी खूप शिकविले. हा माझ्या आयुष्यातील मोठा सत्कार आहे आणि यामुळे जबाबदारी वाढली, असे ते म्हणाले. श्रीरामपंत जोशी म्हणाले, परिस्थिती माणसाला घडविते. आपल्या आयुष्यातील अनुभवच आपल्याला शिकवित असतात. बुरघाटे यांनी विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा निर्माण केली, हे मोठे काम आहे. मैत्री परिवारानेही मोठे काम उभारून समाजाचे ऋण फेडण्याचे व्रत स्वीकारले. हे कार्य सातत्याने वाढत राहो, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्यात. आचार्य हरिभाऊ वेरुळकर म्हणाले, बुरघाटे यांनी स्वत:ला घडवितानाच इतरांचाही विचार केला. नकारात्मकता ओलांडण्याची आपली क्षमताच आपल्याला मोठे करीत असते, हे बुरघाटे यांनी सिद्ध केले. केवळ शिक्षणच महत्त्वाचे नाही तर संस्कार त्यापेक्षा महत्त्वाचा आहे. संस्कार आणि शिक्षणाच्या समन्वयातूनच निकोप समाजनिर्मिती होते, असे सांगताना त्यांनी अनेक उदाहरणे दिलीत. १ हजार यज्ञाने मिळणारे पुण्य मैत्री परिवार एका कार्यातून मिळवित असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या संस्थेने मानवधर्माचीच पताका हाती घेतली आहे, त्याचा प्रसार भविष्यात होतच राहो, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. प्रास्ताविकातून प्रमोद पेंडके यांनी संस्थेचा उद्देश आणि कार्य सांगितले. संचालन माधुरी यावलकर तर आभार संजय भेंडे यांनी मानले. याप्रसंगी संस्थेच्या संकेतस्थळाचे आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. -----------पुरस्काराची रक्कम दान सचिन बुरघाटे यांना पुरस्कारापोटी २१ हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. पण त्यांनी हा निधी वंदेमातरम ग्रुप आणि स्वामी विवेकानंद स्वयंसेवी संस्थेला प्रदान करण्याचा निर्णय जाहीर केला. दोन्ही संस्थांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचा निधी आणि उर्वरित एक हजार रुपये आईच्या साडीसाठी ठेवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या निर्णयाचे सर्वांनीच कौतुक केले. -------संगीताचा कार्यक्रम सत्कार समारंभानंतर गझलांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी प्रसन्न जोशी आणि साक्षी सरोदे यांनी गीत, गझल सादर केले. त्यांना नासिर खान, नीलेश खोडे, रााहुल मानेकर, निशिकांत यांनी वाद्यांवर साथ दिली.