शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

जेएनयूमध्ये विद्यार्थी व प्रशासन आमने-सामने; निवडणुकीतील हस्तक्षेप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 01:37 IST

आरोप-प्रत्यारोप सुरूच

उमेश जाधव नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील विद्यार्थी संघाच्या निवडणुकीतील हस्तक्षेपावरून विद्यार्थी आणि प्रशासन आमने-सामने आले असून आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. प्रशासनाचा निषेध करताना डाव्या संघटनांनी बुधवारी आणि गुरुवारी प्रशासकीय इमारतीसमोर आंदोलन केले.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीच्या निकालाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. लिंगडोह समितीच्या सूचनांचे उल्लंघन करून निवडणूक घेण्यात आल्याप्रकरणी न्यायालयात दोन विद्यार्थ्यांनी याचिका दाखल केली होती. त्यामुळे न्यायालयाने निकाल जाहीर करण्यास स्थगिती दिली. त्यानंतर विद्यापीठातील विद्यार्थी डीन उमेश कदम यांनी निवडणूक समितीला समन्स बजावली होती. समन्सला उत्तर देण्यासाठी कदम यांच्या कार्यालयात गेलो असता प्रवेश नाकारण्यात आल्याचा आरोप निवडणूक समिती आणि विद्यार्थी संघटनांनी केला आहे. तर विद्यार्थ्यांनी एका खोलीत कोंडून ठेवल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.

कदम यांनी निवडणूक समितीच्या सदस्यांना नोटीस पाठवून याप्रकरणी बुधवारी सकाळी उत्तर देण्यास सांगितले होते. कदम हे तक्रार निवारण विभागाचेही प्रमुख आहेत. सकाळी दहा ते दुपारी अडीच वाजेपर्यंत निवडणूक समितीचे सदस्य कार्यालयात आले नाही.सायंकाळी साडेपाच वाजता हे सदस्य कार्यालयात आले. मात्र, कार्यालय बंद झाल्यामुळे त्यांचे उत्तर स्वीकारण्यात आले नाही. त्यानंतर विद्यार्थ्यांनी दरवाजावर आंदोलन करून आम्हाला कोंडून ठेवले. त्यामुळे रक्तदाब वाढल्याने मला रुग्णालयात दाखल व्हावे लागले, असे कदम यांनी सांगितले. विद्यापीठ प्रशासनाने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप केला आहे.

त्यांमुळे विद्यार्थी संघटनांच्या संयम सुटला असून त्यामुळे आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. निवडणूक समितीतील सदस्यांचाही मानसिक छळ सुरू आहे. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघाच्या (जेएनएसयू) घटनेचे उल्लंघन करण्यात येत आहे, असे विद्यार्थी नेता साकेत मून याने सांगितले.जेएनयूमध्ये लोकशाही पद्धतीने सुरू असलेल्या निवडणुकांमध्ये बदल करून त्यात प्रशासनाचा हस्तक्षेप वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, आम्ही लढा देऊ. - एन. साई बालाजी, प्रभारी अध्यक्ष, जेएनएसयू