शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल, भाजपतील संघर्ष उफाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 04:59 IST

लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात तीव्र संघर्ष उफाळून आला असून, विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात एक जण ठार, तसेच कित्येक जण जखमी झाले आहेत.

कोलकाता : लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात तीव्र संघर्ष उफाळून आला असून, विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात एक जण ठार, तसेच कित्येक जण जखमी झाले आहेत.आपल्या अनेक कार्यालयांवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ले केले असून, अनेक कार्यालये ताब्यात घेण्यात आली आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील सीताई आणि तितागढ तसेच कोलकाताजवळील न्यू टाऊन भागात भाजप समर्थकांनी तृणमूल कार्यकर्त्यांवर हल्ले केले आहेत. भाजप विजयी झालेल्या कूचबिहारमधील बक्षीरहाट, महिशकुची, रामपूर आणि शालबारी येथील तृणमूलची कार्यालये भाजप समर्थकांनी उद्ध्वस्त केली. सितलकुची येथील कार्यालयही फोडण्यात आले.तृणमूलचे सितलकुची गटाचे अध्यक्ष आबेद अली मिया यांनी सांगितले की, निवडणुकीचे निकाल आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यालयांना एक तर कुलपे लावली अथवा कार्यालयांची तोडफोड केली.कुचबिहार लोकसभा मतदारसंघात भाजपचे निशित प्रामाणिक यांनी तृणमूलचे परेश अधिकारी यांचा पराभव केला आहे.भाजपनेही तृणमूल कार्यकर्त्यांवर हिंसाचाराचा आरोप केला आहे. बक्षीरहाट येथील विजयी मिरवणुकीवर तृणमूल कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. तृणमूलने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.तृणमूल काँग्रेसने म्हटले की, सीताई येथील आपल्या महिला नेत्याच्या घरावर गावठी बॉम्ब फेकण्यात आला. भाजपचा विजय झालेल्या बंकुरा येथेही अशीच घटना घडली. भाजपने म्हटले की, बंकुरा येथे आपल्या एका स्थानिक नेत्यावर गोळीबार करण्यात आला. भाजपचे जिल्हाध्यक्ष विवेकानंद पात्रा यांनी सांगितले की, सालतोरा येथे स्थानिक भाजप नेते विद्युत दास यांच्यावर विजयी मिरवणुकीदरम्यान हल्ला करण्यात आला. स्थानिक तृणमूल नेता काली रॉय यांच्या नेतृत्वाखाली हा हल्ला करण्यात आला. यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. तृणमूलचे जिल्हाध्यक्ष अरूप खान यांनी भाजपचा आरोप फेटाळून लावला आहे. दोन्ही बाजूंनी तक्रारी देण्यात आल्याचे बंकुरा पोलिसांनी सांगितले. पंचमुरा जिल्ह्यात तृणमूलच्या कामगार संघटनेचे कार्यालय फोडण्यात आले. काही नेत्यांच्या घरांवरही हल्ले झाले.>वाहने जाळलीभाजप विजयी झालेल्या बराकपूरमधील भातपारा आणि काकिनाडा येथेही तृणमूलच्या कार्यालयांवर हल्ले झाले. अनेक ठिकाणी वाहने जाळण्यात आली. नादिया जिल्ह्यातील चाकडाह येथील २३ वर्षीय भाजप कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.