शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
8
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल, भाजपतील संघर्ष उफाळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 04:59 IST

लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात तीव्र संघर्ष उफाळून आला असून, विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात एक जण ठार, तसेच कित्येक जण जखमी झाले आहेत.

कोलकाता : लोकसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजप यांच्यात तीव्र संघर्ष उफाळून आला असून, विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात एक जण ठार, तसेच कित्येक जण जखमी झाले आहेत.आपल्या अनेक कार्यालयांवर भाजप कार्यकर्त्यांनी हल्ले केले असून, अनेक कार्यालये ताब्यात घेण्यात आली आहेत, असा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. पोलीस सूत्रांनी सांगितले की, उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील सीताई आणि तितागढ तसेच कोलकाताजवळील न्यू टाऊन भागात भाजप समर्थकांनी तृणमूल कार्यकर्त्यांवर हल्ले केले आहेत. भाजप विजयी झालेल्या कूचबिहारमधील बक्षीरहाट, महिशकुची, रामपूर आणि शालबारी येथील तृणमूलची कार्यालये भाजप समर्थकांनी उद्ध्वस्त केली. सितलकुची येथील कार्यालयही फोडण्यात आले.तृणमूलचे सितलकुची गटाचे अध्यक्ष आबेद अली मिया यांनी सांगितले की, निवडणुकीचे निकाल आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यालयांना एक तर कुलपे लावली अथवा कार्यालयांची तोडफोड केली.कुचबिहार लोकसभा मतदारसंघात भाजपचे निशित प्रामाणिक यांनी तृणमूलचे परेश अधिकारी यांचा पराभव केला आहे.भाजपनेही तृणमूल कार्यकर्त्यांवर हिंसाचाराचा आरोप केला आहे. बक्षीरहाट येथील विजयी मिरवणुकीवर तृणमूल कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप भाजपने केला आहे. तृणमूलने मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे.तृणमूल काँग्रेसने म्हटले की, सीताई येथील आपल्या महिला नेत्याच्या घरावर गावठी बॉम्ब फेकण्यात आला. भाजपचा विजय झालेल्या बंकुरा येथेही अशीच घटना घडली. भाजपने म्हटले की, बंकुरा येथे आपल्या एका स्थानिक नेत्यावर गोळीबार करण्यात आला. भाजपचे जिल्हाध्यक्ष विवेकानंद पात्रा यांनी सांगितले की, सालतोरा येथे स्थानिक भाजप नेते विद्युत दास यांच्यावर विजयी मिरवणुकीदरम्यान हल्ला करण्यात आला. स्थानिक तृणमूल नेता काली रॉय यांच्या नेतृत्वाखाली हा हल्ला करण्यात आला. यावेळी पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. तृणमूलचे जिल्हाध्यक्ष अरूप खान यांनी भाजपचा आरोप फेटाळून लावला आहे. दोन्ही बाजूंनी तक्रारी देण्यात आल्याचे बंकुरा पोलिसांनी सांगितले. पंचमुरा जिल्ह्यात तृणमूलच्या कामगार संघटनेचे कार्यालय फोडण्यात आले. काही नेत्यांच्या घरांवरही हल्ले झाले.>वाहने जाळलीभाजप विजयी झालेल्या बराकपूरमधील भातपारा आणि काकिनाडा येथेही तृणमूलच्या कार्यालयांवर हल्ले झाले. अनेक ठिकाणी वाहने जाळण्यात आली. नादिया जिल्ह्यातील चाकडाह येथील २३ वर्षीय भाजप कार्यकर्त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली.