शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
4
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
5
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
6
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
7
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
8
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
9
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
10
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
11
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
12
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
13
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
14
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
15
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
16
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
17
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
18
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
19
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
20
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!

रेल्वेचं नुकसान, तोडफोड करणाऱ्यांची आता खैर नाही; सरकारकडून कडक शिक्षेची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 18:17 IST

पश्चिम बंगालमध्ये 'वंदे भारत'वर दगडफेकीच्या घटना काही थांबत नाहीत. त्यामुळे रेल्वेच्या मालमत्तेचं मोठं नुकसान होत आहे.

नवी दिल्ली-

पश्चिम बंगालमध्ये 'वंदे भारत'वर दगडफेकीच्या घटना काही थांबत नाहीत. त्यामुळे रेल्वेच्या मालमत्तेचं मोठं नुकसान होत आहे. सोबतच प्रवाशांच्या जीवाचा धोकाही वाढत आहे. याआधीही रेल्वे गाड्यांवर दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या असून त्यात प्रवासी जखमी झाले आहेत. मोर्चा किंवा निदर्शनांमध्ये रेल्वेची मालमत्ता नेहमीच जमावाच्या निशाण्यावर असते. गेल्या वर्षी 'अग्निवीर' योजनेच्या निषेधार्थ रेल्वेचे अनेक डबे जाळण्यात आले होते. या सर्व घटना पाहता रेल्वे मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांसाठी सरकारने नियम अतिशय कडक केले आहेत. 

महत्वाची बाब म्हणजे बर्‍याचदा लोकांना या नियमांची माहित नसते, म्हणून रागाच्या भरात आपण कोणती पावलं उचलतोय आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात. आपलं भविष्य उद्ध्वस्त होऊ शकतं हेही जाणून घेणं गरजेचं आहे. अशा घटनांमध्ये तुमचे नाव आल्यास तुमचे किती नुकसान होऊ शकते हेच आपण जाणून घेणार आहोत.

भारतीय रेल्वेच्या नियमानुसार रेल्वेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते किंवा मोठा दंड ठोठावला जाऊ शकतो. गुन्हा गंभीर असल्यास शिक्षा आणि दंड दोन्ही ठोठावले जाऊ शकतात. नियमात स्पष्ट करण्यात आले आहे की, जर एखाद्या आरोपीने रेल्वे मालमत्तेला आग लावली किंवा स्फोट करून त्याची नासधूस केली तर त्याला १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. सोबत मोठा दंडही होऊ शकतो. 

नुकसान करणाऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी लागेल. आरोपीवरील मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप सिद्ध झाल्यास नुकसान भरपाईसाठी तोच जबाबदार असेल. म्हणजे रेल्वेचा झालेला तोटा त्याला स्वतःच्या खिशातून भरावा लागेल. यासोबतच, जर एखाद्या व्यक्तीने कोणतेही आंदोलन किंवा आंदोलन पुकारले आणि त्या आंदोलनाला हिंसक वळण लागले, तर ज्याने आंदोलन किंवा निषेध पुकारला आहे तोच नुकसान भरून काढेल.

भविष्यावर परिणाम होईलरेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना भविष्यात रेल्वेत काम करता येणार नसल्याचे रेल्वेने गेल्या वर्षी स्पष्ट केले होते. नियमांनुसार मालमत्तेचे नुकसान करणे, ट्रॅक हटवणे, वाहतुकीवर परिणाम करणे आणि प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणारे असे कोणतेही काम करणाऱ्या व्यक्तींना आयुष्यभरासाठी रेल्वेत नोकरीसाठी अयोग्य मानले जाईल. गेल्या वर्षी अग्निवीरविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये रेल्वेला २५९ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस