शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेचं नुकसान, तोडफोड करणाऱ्यांची आता खैर नाही; सरकारकडून कडक शिक्षेची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 18:17 IST

पश्चिम बंगालमध्ये 'वंदे भारत'वर दगडफेकीच्या घटना काही थांबत नाहीत. त्यामुळे रेल्वेच्या मालमत्तेचं मोठं नुकसान होत आहे.

नवी दिल्ली-

पश्चिम बंगालमध्ये 'वंदे भारत'वर दगडफेकीच्या घटना काही थांबत नाहीत. त्यामुळे रेल्वेच्या मालमत्तेचं मोठं नुकसान होत आहे. सोबतच प्रवाशांच्या जीवाचा धोकाही वाढत आहे. याआधीही रेल्वे गाड्यांवर दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या असून त्यात प्रवासी जखमी झाले आहेत. मोर्चा किंवा निदर्शनांमध्ये रेल्वेची मालमत्ता नेहमीच जमावाच्या निशाण्यावर असते. गेल्या वर्षी 'अग्निवीर' योजनेच्या निषेधार्थ रेल्वेचे अनेक डबे जाळण्यात आले होते. या सर्व घटना पाहता रेल्वे मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांसाठी सरकारने नियम अतिशय कडक केले आहेत. 

महत्वाची बाब म्हणजे बर्‍याचदा लोकांना या नियमांची माहित नसते, म्हणून रागाच्या भरात आपण कोणती पावलं उचलतोय आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात. आपलं भविष्य उद्ध्वस्त होऊ शकतं हेही जाणून घेणं गरजेचं आहे. अशा घटनांमध्ये तुमचे नाव आल्यास तुमचे किती नुकसान होऊ शकते हेच आपण जाणून घेणार आहोत.

भारतीय रेल्वेच्या नियमानुसार रेल्वेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते किंवा मोठा दंड ठोठावला जाऊ शकतो. गुन्हा गंभीर असल्यास शिक्षा आणि दंड दोन्ही ठोठावले जाऊ शकतात. नियमात स्पष्ट करण्यात आले आहे की, जर एखाद्या आरोपीने रेल्वे मालमत्तेला आग लावली किंवा स्फोट करून त्याची नासधूस केली तर त्याला १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. सोबत मोठा दंडही होऊ शकतो. 

नुकसान करणाऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी लागेल. आरोपीवरील मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप सिद्ध झाल्यास नुकसान भरपाईसाठी तोच जबाबदार असेल. म्हणजे रेल्वेचा झालेला तोटा त्याला स्वतःच्या खिशातून भरावा लागेल. यासोबतच, जर एखाद्या व्यक्तीने कोणतेही आंदोलन किंवा आंदोलन पुकारले आणि त्या आंदोलनाला हिंसक वळण लागले, तर ज्याने आंदोलन किंवा निषेध पुकारला आहे तोच नुकसान भरून काढेल.

भविष्यावर परिणाम होईलरेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना भविष्यात रेल्वेत काम करता येणार नसल्याचे रेल्वेने गेल्या वर्षी स्पष्ट केले होते. नियमांनुसार मालमत्तेचे नुकसान करणे, ट्रॅक हटवणे, वाहतुकीवर परिणाम करणे आणि प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणारे असे कोणतेही काम करणाऱ्या व्यक्तींना आयुष्यभरासाठी रेल्वेत नोकरीसाठी अयोग्य मानले जाईल. गेल्या वर्षी अग्निवीरविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये रेल्वेला २५९ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस