शहरं
Join us  
Trending Stories
1
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
2
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
3
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
4
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
5
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
6
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
7
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
8
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
9
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
10
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
11
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
12
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
13
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
15
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
16
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
17
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
18
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
19
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
20
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार

रेल्वेचं नुकसान, तोडफोड करणाऱ्यांची आता खैर नाही; सरकारकडून कडक शिक्षेची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 18:17 IST

पश्चिम बंगालमध्ये 'वंदे भारत'वर दगडफेकीच्या घटना काही थांबत नाहीत. त्यामुळे रेल्वेच्या मालमत्तेचं मोठं नुकसान होत आहे.

नवी दिल्ली-

पश्चिम बंगालमध्ये 'वंदे भारत'वर दगडफेकीच्या घटना काही थांबत नाहीत. त्यामुळे रेल्वेच्या मालमत्तेचं मोठं नुकसान होत आहे. सोबतच प्रवाशांच्या जीवाचा धोकाही वाढत आहे. याआधीही रेल्वे गाड्यांवर दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या असून त्यात प्रवासी जखमी झाले आहेत. मोर्चा किंवा निदर्शनांमध्ये रेल्वेची मालमत्ता नेहमीच जमावाच्या निशाण्यावर असते. गेल्या वर्षी 'अग्निवीर' योजनेच्या निषेधार्थ रेल्वेचे अनेक डबे जाळण्यात आले होते. या सर्व घटना पाहता रेल्वे मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांसाठी सरकारने नियम अतिशय कडक केले आहेत. 

महत्वाची बाब म्हणजे बर्‍याचदा लोकांना या नियमांची माहित नसते, म्हणून रागाच्या भरात आपण कोणती पावलं उचलतोय आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात. आपलं भविष्य उद्ध्वस्त होऊ शकतं हेही जाणून घेणं गरजेचं आहे. अशा घटनांमध्ये तुमचे नाव आल्यास तुमचे किती नुकसान होऊ शकते हेच आपण जाणून घेणार आहोत.

भारतीय रेल्वेच्या नियमानुसार रेल्वेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते किंवा मोठा दंड ठोठावला जाऊ शकतो. गुन्हा गंभीर असल्यास शिक्षा आणि दंड दोन्ही ठोठावले जाऊ शकतात. नियमात स्पष्ट करण्यात आले आहे की, जर एखाद्या आरोपीने रेल्वे मालमत्तेला आग लावली किंवा स्फोट करून त्याची नासधूस केली तर त्याला १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. सोबत मोठा दंडही होऊ शकतो. 

नुकसान करणाऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी लागेल. आरोपीवरील मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप सिद्ध झाल्यास नुकसान भरपाईसाठी तोच जबाबदार असेल. म्हणजे रेल्वेचा झालेला तोटा त्याला स्वतःच्या खिशातून भरावा लागेल. यासोबतच, जर एखाद्या व्यक्तीने कोणतेही आंदोलन किंवा आंदोलन पुकारले आणि त्या आंदोलनाला हिंसक वळण लागले, तर ज्याने आंदोलन किंवा निषेध पुकारला आहे तोच नुकसान भरून काढेल.

भविष्यावर परिणाम होईलरेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना भविष्यात रेल्वेत काम करता येणार नसल्याचे रेल्वेने गेल्या वर्षी स्पष्ट केले होते. नियमांनुसार मालमत्तेचे नुकसान करणे, ट्रॅक हटवणे, वाहतुकीवर परिणाम करणे आणि प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणारे असे कोणतेही काम करणाऱ्या व्यक्तींना आयुष्यभरासाठी रेल्वेत नोकरीसाठी अयोग्य मानले जाईल. गेल्या वर्षी अग्निवीरविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये रेल्वेला २५९ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस