शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

रेल्वेचं नुकसान, तोडफोड करणाऱ्यांची आता खैर नाही; सरकारकडून कडक शिक्षेची तरतूद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 18:17 IST

पश्चिम बंगालमध्ये 'वंदे भारत'वर दगडफेकीच्या घटना काही थांबत नाहीत. त्यामुळे रेल्वेच्या मालमत्तेचं मोठं नुकसान होत आहे.

नवी दिल्ली-

पश्चिम बंगालमध्ये 'वंदे भारत'वर दगडफेकीच्या घटना काही थांबत नाहीत. त्यामुळे रेल्वेच्या मालमत्तेचं मोठं नुकसान होत आहे. सोबतच प्रवाशांच्या जीवाचा धोकाही वाढत आहे. याआधीही रेल्वे गाड्यांवर दगडफेकीच्या अनेक घटना घडल्या असून त्यात प्रवासी जखमी झाले आहेत. मोर्चा किंवा निदर्शनांमध्ये रेल्वेची मालमत्ता नेहमीच जमावाच्या निशाण्यावर असते. गेल्या वर्षी 'अग्निवीर' योजनेच्या निषेधार्थ रेल्वेचे अनेक डबे जाळण्यात आले होते. या सर्व घटना पाहता रेल्वे मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांसाठी सरकारने नियम अतिशय कडक केले आहेत. 

महत्वाची बाब म्हणजे बर्‍याचदा लोकांना या नियमांची माहित नसते, म्हणून रागाच्या भरात आपण कोणती पावलं उचलतोय आणि त्याचे परिणाम काय होऊ शकतात. आपलं भविष्य उद्ध्वस्त होऊ शकतं हेही जाणून घेणं गरजेचं आहे. अशा घटनांमध्ये तुमचे नाव आल्यास तुमचे किती नुकसान होऊ शकते हेच आपण जाणून घेणार आहोत.

भारतीय रेल्वेच्या नियमानुसार रेल्वेच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्याला ५ वर्षांची शिक्षा होऊ शकते किंवा मोठा दंड ठोठावला जाऊ शकतो. गुन्हा गंभीर असल्यास शिक्षा आणि दंड दोन्ही ठोठावले जाऊ शकतात. नियमात स्पष्ट करण्यात आले आहे की, जर एखाद्या आरोपीने रेल्वे मालमत्तेला आग लावली किंवा स्फोट करून त्याची नासधूस केली तर त्याला १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. सोबत मोठा दंडही होऊ शकतो. 

नुकसान करणाऱ्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई द्यावी लागेल. आरोपीवरील मालमत्तेचे नुकसान झाल्याचा आरोप सिद्ध झाल्यास नुकसान भरपाईसाठी तोच जबाबदार असेल. म्हणजे रेल्वेचा झालेला तोटा त्याला स्वतःच्या खिशातून भरावा लागेल. यासोबतच, जर एखाद्या व्यक्तीने कोणतेही आंदोलन किंवा आंदोलन पुकारले आणि त्या आंदोलनाला हिंसक वळण लागले, तर ज्याने आंदोलन किंवा निषेध पुकारला आहे तोच नुकसान भरून काढेल.

भविष्यावर परिणाम होईलरेल्वेच्या मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांना भविष्यात रेल्वेत काम करता येणार नसल्याचे रेल्वेने गेल्या वर्षी स्पष्ट केले होते. नियमांनुसार मालमत्तेचे नुकसान करणे, ट्रॅक हटवणे, वाहतुकीवर परिणाम करणे आणि प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण करणारे असे कोणतेही काम करणाऱ्या व्यक्तींना आयुष्यभरासाठी रेल्वेत नोकरीसाठी अयोग्य मानले जाईल. गेल्या वर्षी अग्निवीरविरोधात झालेल्या हिंसक आंदोलनानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. यामध्ये रेल्वेला २५९ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागला.

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेVande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेस