शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
2
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
3
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
4
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
5
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
6
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
7
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
8
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
9
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
10
"त्या आरोपीला चार तासांत शोधा, अन्यथा…’’ कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणीवरून मनसे आक्रमक 
11
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
12
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
13
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
14
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
15
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
16
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
17
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
18
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
19
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!
20
अहिल्यानगर: कधी कुऱ्हाड, कधी कोयता... कधी लाथाबुक्क्या; पत्नीने शेतात जाऊने साडीनेच संपवले आयुष्य

गोमांस व गोहत्येवरून अनेक भागांत तणाव

By admin | Updated: October 11, 2015 02:58 IST

उत्तर प्रदेशातील दादरीत गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून एका मुस्लिम व्यक्तीच्या हत्याकांडानंतर देशात ठिकठिकाणी पसरलेला असंतोष अद्याप शमलेला नाही,

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील दादरीत गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून एका मुस्लिम व्यक्तीच्या हत्याकांडानंतर देशात ठिकठिकाणी पसरलेला असंतोष अद्याप शमलेला नाही, तर दुसरीकडे राजकीय पक्षांच्या नेत्यांकडूनही या मुद्यावर प्रक्षोभक वक्तव्ये सुरूच आहेत.उत्तर प्रदेशच्या मैनपुरीमध्ये गोहत्येच्या अफवेनंतर प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने पोलिसांची वाहने आणि दुकाने जाळली. हिंसाचारात सात पोलीस जखमी झाले. याप्रकरणी शनिवारी एका पोलीस अधिकाऱ्यास निलंबित करण्यात आले असून २१ जणांना अटक झाली आहे.एका अपक्ष आमदाराद्वारे गोमांस पार्टीचे आयोजन आणि उधमपूर जिल्ह्यात कथित गोहत्येच्या विरोधात जम्मूत कडकडीत बंद पाळण्यात आला.दरम्यान, दादरीतील तणाव कमी करण्याच्या उद्देशाने सद्भावना उपवासासाठी बिसहडा गावात जात असलेल्या उत्तर प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांना पोलिसांनी दिल्ली-नोएडा सीमेवरच रोखले. त्यामुळे अनेक तास झालेल्या ट्राफिक जाममुळे लोकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागला. लखनौच्या मैनपुरी येथून प्राप्त वृत्तानुसार करहल पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या नगरिया गावात शुक्रवारी गोहत्येची अफवा पसरल्यानंतर हिंसाचार माजला. काही समाजकंटकांनी जातीय वैमनस्य निर्माण करण्यासाठी ही अफवा पसरविली होती. शवविच्छेदनात गायीचा मृत्यू आजारपणामुळे झाल्याचे स्पष्ट झाले. याप्रकरणी बेपर्वाई दाखविल्याबद्दल पोलीस अधिकारी सुनीलकुमार यांना तातडीने निलंबित करण्यात आले असल्याचे गृह विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. जम्मूत अपक्ष आमदार इंजिनिअर राशीद यांच्याद्वारे गोमांस पार्टीचे आयोजन आणि उधमपुरातील गोहत्येचा निषेध नोंदविण्याकरिता जम्मू-काश्मीर नॅशनल पँथर्स पार्टीने (जेकेएनपीपी) बंदचे आवाहन केले होते. बार असोसिएशन जम्मूसह विविध धार्मिक आणि सामाजिक संघटनांनी या बंदला पाठिंबा दिला होता. बंद काळात वाहतूक जवळपास ठप्प राहिली. जेकेएनपीपी कार्यकर्त्यांनी शहरातील विविध भागात निदर्शने दिली. आमदार राशीद यांच्या अटकेची मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनकर्त्यांनी राशीद आणि राज्य सरकारचे पुतळेही जाळले. जम्मू क्षेत्रातील उधमपूर, कठुआ आणि रियासी या तीन जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी गोहत्येच्या विरोधात बंद पुकारण्यात आला होता. काँग्रेस नेत्यांना रोखलेकाँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी शनिवारी दादरी तहसिलीत जाऊन सद्भावना उपवास करण्याची घोषणा केली होती; परंतु प्रशासनाने परवानगी नाकारल्यावर शांती मार्चचा निर्णय झाला होता. त्यानुसार पक्षाचे नेते मोठ्या संख्येत सेक्टर-१४ए मधील नोएडाच्या प्रवेशद्वारावर गोळा झाले. या नेत्यांमध्ये उत्तर प्रदेशचे प्रभारी मधुसूदन मिस्त्री, माजी प्रदेश अध्यक्ष रिता बहुगुणा, आर.पी.एन. सिंग,जतीनप्रसाद, निर्मल खत्री, नसीबसिंग आदींचा समावेश होता. मात्र प्रशासनाने काँग्रेसला शांती मार्चही काढू दिला नाही, असे पक्षाचे प्रवक्ते पवन शर्मा यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)