शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

‘जिथे श्वास घेणे कठीण तिथे पराक्रम गाजवताय’; लेहमध्ये त्रिशूळ युद्ध संग्रहालयाचे भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2023 06:59 IST

संग्रहालयाच्या उपक्रमाशी महाराष्ट्र जोडला गेला हे आमचे भाग्य आहे.

मुंबई : त्रिशूळ हे शौर्याचे प्रतीक आहे. जेथे श्वास घेणे कठीण आहे, अशा ठिकाणी तुम्ही पराक्रम गाजवताय. आम्ही तुमच्या शौर्याला सलाम करतो, अशा शब्दांत भारतीय लष्कराच्या त्रिशूळ डिव्हिजनच्या शौर्याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गौरवोद्गार काढले. लेहमधील कारू येथे त्रिशूळ युद्ध संग्रहालयाच्या कामाचे भूमिपूजन रविवारी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. सुमारे ३ कोटी खर्च करून हे संग्रहालय उभारण्यात येत असून, यासाठीचा निधी महाराष्ट्र सरकारने दिला आहे. 

संग्रहालयाच्या उपक्रमाशी महाराष्ट्र जोडला गेला हे आमचे भाग्य आहे. या संग्रहालयासाठी निधी लागला तर तो दिला जाईल, असे आश्वासन फडणवीस यांनी भूमिपूजनावेळी दिले. यावेळी त्यांनी तेथे उपस्थित मुंबईवरील २६/११ हल्ल्यावेळी एनएसजी तुकडीचे नेतृत्व करणारे कर्नल सुनील शेओरान यांचीही भेट घेतली. कर्नल शेओरान यांचा उल्लेख बुलेट कॅचर असा केला. या संग्रहालयामुळे सीमावर्ती भागात पर्यटनाला सुद्धा मोठी चालना मिळेल व महाराष्ट्रातील पर्यटक येतील, तेव्हा त्यांना अभिमान वाटेल, असेही फडणवीस म्हणाले. राज्य सरकारने हा निधी दिल्याबद्दल लेफ्ट. जनरल रशीम बाली, मेजर जनरल पी.के. मिश्रा यांनी यावेळी महाराष्ट्र सरकारचे आभार मानले. 

संकल्पना महाराष्ट्रातील महिलांचीसुमारे वर्षभरापूर्वी त्रिशूळ युद्ध संग्रहालयाची संकल्पना उदयास आली होती. महाराष्ट्रातील ॲड. मीनल भोसले आणि सारिका मल्होत्रा या दोन महिलांनी या भागात भेट दिली, तेव्हा या संकल्पनेचा उदय झाला. संग्रहालय त्रिशुळाच्या आकाराप्रमाणे असणार आहे. यात तीन प्रदर्शन कक्ष असतील. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस