शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिले विमान झेपावणार! पहिल्या दिवशी किती फ्लाईट्स उडणार?
3
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
4
धुळे महापालिका निवडणुकीत महायुती अन् मविआत जागावाटपाचा तिढा; 'स्वबळा'ची तयारी जोरात
5
महापालिका निवडणूक २०२६ : 'एमआयएम'ची वाढती ताकद काँग्रेससाठी डोकेदुखी, संख्याबळासह मतांच्या टक्केवारीतही वाढ
6
क्रॉस व्होटिंग नको, 'एक पॅनल, एकच चिन्ह'; महायुतीची नवी रणनीती, दगाफटका टाळण्यासाठी खबरदारी
7
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
8
अमेरिकेत ३० भारतीयांना अटक, शिक्षाही होणार! पण नेमका गुन्हा तरी काय केला?
9
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
10
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
11
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
12
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
13
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
14
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
15
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
16
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
17
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
18
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
19
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
20
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बळजबरी खेदजनक!

By admin | Updated: July 26, 2014 02:50 IST

एका कर्मचा:याच्या तोंडात बळजबरीने चपाती कोंबण्याची घटना ‘खेदजनक’ आणि ‘दुर्दैवी’ असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले

नवी दिल्ली : येथील महाराष्ट्र सदनातील निकृष्ट प्रतीच्या जेवणाबद्दल तक्रार करण्याच्या ओघात शिवसेनेच्या खासदारांनी रमजाननिमित्त रोजा ठेवलेल्या तेथील एका कर्मचा:याच्या तोंडात बळजबरीने चपाती कोंबण्याची घटना ‘खेदजनक’ आणि ‘दुर्दैवी’ असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले असून, भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकास दिलेले धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राखण्यास सरकार वचनबद्ध असल्याची त्यांनी ग्वाही दिली़
या घटनेचे बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तीव्र पडसाद उमटले होते व यावर सरकारने निवेदन करावे, असा आग्रह विरोधी पक्षांनी धरला होता. देशभरात संताप पसरविणारी ही घटना सत्ताधारी आघाडीतील शिवसेना या सर्वात मोठय़ा सहयोगी पक्षाच्या खासदारांशीच संबंधित असल्याने सरकार त्यावर काय भूमिका घेते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते. 
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत बव्हंशी वस्तुस्थिती निदर्शक असे निवेदन करून सरकारची सावध भूमिका मांडली. देशातील धार्मिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वानीच सतत प्रयत्न करायला हवेत, असेही त्यांनी सदस्यांना आवाहन केले.
ही घटना कशी व कशामुळे घडली याचा वस्तुनिष्ठ तपशील देऊन त्यांनी याप्रकरणी कोणीही पोलिसांत फिर्याद नोंदविलेली नसल्याने पुढे काहीच केले जाऊ शकत नाही, असेही त्यांनी अप्रत्यक्षपणो सूचित केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
मुस्लीम युवकाच्या तोंडात चपाती कोंबून त्याचा रोजा मोडण्याचा प्रयत्न करणारे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्याविरुद्ध अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. रमजान महिन्यात जातीय तेढ निर्माण करणा:या विचारे यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात अनेक मुस्लीम बांधव धडकले होते.
 
राहुल यांचे टीकास्त्र
दादागिरीचे राजकारण करणा:या या पक्षांची विचारसरणीही अशीच आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शिवसेना खासदारांनी केलेल्या कृतीवर टीकास्त्र सोडले. अमेठीत पत्रकारांनी महाराष्ट्र सदनातील घटनेचा विषय छेडला तेव्हा राहुल म्हणाले, की ही विचारसरणी देशासाठी हानिकारक आहे.
 
च्महाराष्ट्र सदनात 23 जुलैला हा प्रकार घडल्यानंतर दुस:या दिवसापासून ‘आयआरसीटीसी’ने हे कंत्रट रद्द केले आहे व हा निर्णय अंतिम असल्याचे त्यांनी कळविले आहे.
च्बळजबरीने चपाती कोंबल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. शिवसेनेच्या 11 खासदारांना अपात्र करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यात केली आहे. 
च्महाराष्ट्र सदनातल्या अनागोंदीविरु द्ध शिवसेनेने शुक्र वारी निवासी आयुक्त बिपिन मलिक यांच्याविरु द्ध हक्कभंगाचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांकडे दिला.