शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
2
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
3
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
4
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
5
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
6
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
7
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
8
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
9
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...
10
जॉन क्लार्क, मिशेल देवोरेट अन् जॉन मार्टिनिस  यंदाचे भौतिकशास्त्राचे नोबेल पुरस्कार विजेते
11
रत्ने व आभूषण धोरण मंजूर, एक लाख कोटींची गुंतवणूक; पाच लाख रोजगार निर्मितीचे लक्ष्य
12
कर्जमाफीचे आश्वासन सरकार पूर्ण करणारच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा व्यक्त केला निर्धार 
13
आरक्षण, नोकरीसाठी आत्महत्येची चिठ्ठी अंगलट; तीन विविध समाजांची प्रकरणे : तिघांवर गुन्हा
14
आका मंत्रिमंडळात आहे का? पाटोळेंच्या अटकेवरून मित्रपक्ष व विरोधकांकडून शिंदेसेना लक्ष्य
15
विषारी ‘कफ सिरप’मुळे मृत्यूचे थैमान; १६ तासांत ३ बालकांचा बळी; मृतांची संख्या १६ 
16
वर्धा-भुसावळ, गोंदिया-डोंगरगड रेल्वे मार्ग मंजूर; २४,६३४ कोटी खर्चाच्या चार प्रकल्पांना केंद्राची मंजुरी
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

बळजबरी खेदजनक!

By admin | Updated: July 26, 2014 02:50 IST

एका कर्मचा:याच्या तोंडात बळजबरीने चपाती कोंबण्याची घटना ‘खेदजनक’ आणि ‘दुर्दैवी’ असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले

नवी दिल्ली : येथील महाराष्ट्र सदनातील निकृष्ट प्रतीच्या जेवणाबद्दल तक्रार करण्याच्या ओघात शिवसेनेच्या खासदारांनी रमजाननिमित्त रोजा ठेवलेल्या तेथील एका कर्मचा:याच्या तोंडात बळजबरीने चपाती कोंबण्याची घटना ‘खेदजनक’ आणि ‘दुर्दैवी’ असल्याचे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले असून, भारतीय राज्यघटनेने प्रत्येक नागरिकास दिलेले धार्मिक स्वातंत्र्य अबाधित राखण्यास सरकार वचनबद्ध असल्याची त्यांनी ग्वाही दिली़
या घटनेचे बुधवारी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये तीव्र पडसाद उमटले होते व यावर सरकारने निवेदन करावे, असा आग्रह विरोधी पक्षांनी धरला होता. देशभरात संताप पसरविणारी ही घटना सत्ताधारी आघाडीतील शिवसेना या सर्वात मोठय़ा सहयोगी पक्षाच्या खासदारांशीच संबंधित असल्याने सरकार त्यावर काय भूमिका घेते, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते. 
गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी राज्यसभेत बव्हंशी वस्तुस्थिती निदर्शक असे निवेदन करून सरकारची सावध भूमिका मांडली. देशातील धार्मिक सलोखा अबाधित ठेवण्यासाठी आपण सर्वानीच सतत प्रयत्न करायला हवेत, असेही त्यांनी सदस्यांना आवाहन केले.
ही घटना कशी व कशामुळे घडली याचा वस्तुनिष्ठ तपशील देऊन त्यांनी याप्रकरणी कोणीही पोलिसांत फिर्याद नोंदविलेली नसल्याने पुढे काहीच केले जाऊ शकत नाही, असेही त्यांनी अप्रत्यक्षपणो सूचित केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
 
मुस्लीम युवकाच्या तोंडात चपाती कोंबून त्याचा रोजा मोडण्याचा प्रयत्न करणारे शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्याविरुद्ध अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. रमजान महिन्यात जातीय तेढ निर्माण करणा:या विचारे यांच्याविरुद्ध तक्रार देण्यासाठी चांदूर रेल्वे पोलीस ठाण्यात अनेक मुस्लीम बांधव धडकले होते.
 
राहुल यांचे टीकास्त्र
दादागिरीचे राजकारण करणा:या या पक्षांची विचारसरणीही अशीच आहे, अशा शब्दांत काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी शिवसेना खासदारांनी केलेल्या कृतीवर टीकास्त्र सोडले. अमेठीत पत्रकारांनी महाराष्ट्र सदनातील घटनेचा विषय छेडला तेव्हा राहुल म्हणाले, की ही विचारसरणी देशासाठी हानिकारक आहे.
 
च्महाराष्ट्र सदनात 23 जुलैला हा प्रकार घडल्यानंतर दुस:या दिवसापासून ‘आयआरसीटीसी’ने हे कंत्रट रद्द केले आहे व हा निर्णय अंतिम असल्याचे त्यांनी कळविले आहे.
च्बळजबरीने चपाती कोंबल्याप्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे. शिवसेनेच्या 11 खासदारांना अपात्र करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यात केली आहे. 
च्महाराष्ट्र सदनातल्या अनागोंदीविरु द्ध शिवसेनेने शुक्र वारी निवासी आयुक्त बिपिन मलिक यांच्याविरु द्ध हक्कभंगाचा प्रस्ताव लोकसभा अध्यक्षांकडे दिला.