शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

इयर एंडींगला कर्नाळा अभयारण्यात नो एंट्री थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर विश्रामगृह बंद : प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना

By admin | Updated: December 20, 2014 22:27 IST

पनवेल : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर कर्नाळा अभयारण्यातील शांतता भंग होऊ नये याकरिता या ठिकाणच्या विश्रामगृहात पर्यटकांना मुक्कामासाठी तीन दिवस मनाई करण्यात आली आहे. परिसरात कोणत्याही स्वरुपाचा गडबड गोंधळ होणार नाही याकरिता परिक्षेत्र वन कार्यालयाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे सु˜ीच्या दिवशी पर्यटकांची लगबग आणि गोंधळापासून अभयारण्यात दोन तीन दिवस निरामय शांतता ठेवण्यात येणार असून पशुपक्ष्यांची प्रदूषणापासून सुटका होणार आहे.

पनवेल : थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर कर्नाळा अभयारण्यातील शांतता भंग होऊ नये याकरिता या ठिकाणच्या विश्रामगृहात पर्यटकांना मुक्कामासाठी तीन दिवस मनाई करण्यात आली आहे. परिसरात कोणत्याही स्वरुपाचा गडबड गोंधळ होणार नाही याकरिता परिक्षेत्र वन कार्यालयाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. त्यामुळे सु˜ीच्या दिवशी पर्यटकांची लगबग आणि गोंधळापासून अभयारण्यात दोन तीन दिवस निरामय शांतता ठेवण्यात येणार असून पशुपक्ष्यांची प्रदूषणापासून सुटका होणार आहे.
पनवेल शहरापासून १२ किमी. अंतरावर विविध प्रकारच्या वृक्षवेलींनी व पक्षांनी समृद्ध असे कर्नाळा अभयारण्य असून वर्षभर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. लोणावळ्याप्रमाणे कर्नाळा समुद्रसपाटीपासून उंचीवर असल्याने येथील हवामानही नेहमी थंड असते. निसर्ग, हवेतील गारवा आणि शांतता यांचा संगम असलेल्या या अभयारण्यात दोन प्रकारची वने आहेत. याशिवाय रानखाटीक, ठिपकेवाला सातभाई, कस्तुर, शिंपी, गिधाड, मुनिया, नाचन, सुगरण, बया, सुरेल, खाचू कवटा, राखी धोबी, भारतद्वाज, शामा, मोर, फुलटोचा, पावशा, बहिरा, कापशी घार, नीळकंठ पोपट, सुर्यपक्षी, हरियल यांसारखे सुमारे १३४ प्रजातीचे स्थानिक तर ३८ प्रजातीचे स्थलांतरीय पक्षी आहेत.
गोवा आणि कोकणात जाणारे येणारे प्रवासीही येथे थांबतात. अतिशय निरामय शांतता असलेल्या या अभयारण्याच्या शांततेला दिवसेंदिवस तडा चालला आहे. मात्र ध्वनीप्रदुषणाचा पक्षांवर विपरीत परिणाम होत चालला असून सु˜ीच्या दिवसांत त्या ठिकाणी रेडिओ, टेपरेकॉर्डर, गाड्यांचे हॉर्न आदींचा आवाज येतो. अपुर्‍या कर्मचारी वर्गामुळे उपद्रवी लोकांवर लक्ष ठेवणे अतिशय कठीण जाते. कर्नाळा अभयारण्यात दोन विश्रामगृह असून ते पर्यटकांना राहण्यासाठी दिले जातात. याकरिता ठाणे कार्यालयातून आगावू बुकींग केली जाते. अनेक पर्यटक या ठिकाणी राहून सकाळी पक्षांच्या चिवचिवाटांचा आनंद घेतात. त्याबरोबरच निसर्गाच्या सानिध्यात रात्र घालवून एक वेगळी अनुभूती घेतात. मात्र थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर हे दोनही विश्रामगृह बंद ठेवण्यात येतात. १९ ते ३१ डिसेंबर या दरम्यान कोणालाही प्रवेश देण्यात येणार नाही. याचे कारण म्हणजे या कालावधीत पर्यटनासाठी नाही तर थर्टी फर्स्टनिमित्त पार्टी करण्याच्या उद्देशाने काही मंडळी अभयारण्यात येतात. या परिसरात मद्यप्राशन केले जाते. तसेच मोठमोठ्याने आवाज केला जातो. कधीकधी टेपरेकॉर्डर लावून हे झिंगलेले ही मंडळी संपूर्ण परिसर दणाणून सोडतात. याचा येथील पक्षी आणि प्राण्यांवर विपरीत परिणाम होतो. विविध जातींच्या पक्षांचे प्रिय माहेरघर असलेल्या या अभयारण्यात खर्‍या अर्थाने पोषक वातावरण निर्माण करुन देण्यात आले आहे. असे असले तरी वर्षअखेर सेलिब्रेशनच्या निमित्ताने या ठिकाणची शांतता भंग होऊ नये याकरिता उपाययोजना म्हणून तीन दिवस अभयारण्यात प्रवेश बंद ठेवण्यात आला असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी संपत पवार यांनी सांगितले. यापूर्वी धुलिवंदनाकरिता चार दिवस विश्रामगृह बंद ठेवण्यात आले होते.

रिसॉर्ट आणि फार्महाऊसना नोटीसा
कर्नाळा अभयारण्य परिसरातील रिसॉर्ट, उपहारगृह त्याचबरोबर फार्महाऊसेसना वनपरिक्षे कार्यालयाकडून नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. साईकृपा, पॅनॉरोमिक, के.स्टार, क्षणभर विश्रांती या मोठ्या हॉटेलचा यामध्ये समावेश आहे. थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर पर्यावरणाचा समतोल राखण्याची सूचना देण्यात आली आहे. थर्टी फर्स्टच्या काळात शांतता राखण्याची तंबी संबंधितांना देण्यात आली आहे.
------
फोटो १९ कर्नाळा