शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

गुन्हे शाखेसाठी अतिरिक्त आयुक्त मिळेना ठाण्यातील स्थिती : सहा महिन्यांपासून खुर्ची रिकामी

By admin | Updated: February 14, 2015 23:50 IST

पंकज रोडेकर

पंकज रोडेकर
ठाणे : शहर पोलीस दलातील अति महत्त्वाचे समजले जाणारे गुन्हे अन्वेषण विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्तपद मागील सहा महिन्यांपासून रिक्त आहे. त्यातच नागरिकीकरण झपाट्याने वाढत असल्याने गुन्हेगारीतही वाढ होत असून गुन्हे शाखेच्या एका युनिटच्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह तीन पोलिसांना लाच घेताना अटक झाल्याने गुन्हे शाखेवर नागरिकांनी विश्वास का ठेवावा, असा प्रश्न ठाणेकरांना पडू लागला आहे.
२०१४ च्या लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या वेळी तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांची बदली झाली. त्या जागी डॉ. रवींद्र सिंघल हे अतिरिक्त आयुक्त म्हणून ठाण्यात आले. मात्र, ४ महिन्यांनंतर आलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात त्यांची मध्य रेल्वेच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाली. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. सध्या प्रशासन विभागाचे अतिरिक्त आयुक्त शिवाजी बोडखे यांच्याकडे त्यांचा अतिरिक्त पदभार देण्यात आला. राज्यात युतीचे सरकार येऊन १०० दिवसांपेक्षा जास्त काळ झाल्यानंतरही ठाण्यासारख्या आयुक्तालयाला अतिरिक्त पोलीस आयुक्त मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
शहरात सोनसाखळी चोरी आणि छेडछाडीचेही प्रकार वाढल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. तत्कालीन अधिकारी भारंबे यांनी सोनसाखळी चोरट्यांवर वचक बसविण्यासाठी मोक्कांतर्गत कारवाईकेली होती. त्यानंतर, आलेल्या डॉ. सिंघल यांनी सोनसाखळीच्या घटनांचा अभ्यास करून पोलिसांनी थेट नागरिकांनी संवाद साधून कशी खबरदारी घ्यावी, तसेच या घटना रोखण्यासाठी पथनाट्याद्वारे ठाणेकरांमध्ये जगजागृती केली. तसेच फेसबुक या सोशल मीडियाची मदत घेतली होती. मात्र, ते गेल्यानंतर हे बंद झाले. याचदरम्यान, गुन्हे शाखेच्या युनिट ५ च्या वरिष्ठ अधिकार्‍यांसह तीन पोलीस शिपायांना हजारो रुपयांची लाच घेताना पकडले आहे. या रिक्त पदाबाबतचा प्रस्ताव ठाणे पोलिसांनी गृहविभागाकडे पाठविला असल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकार्‍याने दिली. (प्रतिनिधी)
....................
प्रथमच पद रिक्त
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात २०१० साली अतिरिक्त पोलीस आयुक्त हे पद निर्माण झाले. तेव्हापासून २०१४ पर्यंत हे पद कधीच रिक्त नव्हते. अशोक धिवरे हे पहिले अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून ठाण्याला लाभले. त्यानंतर, एस.ए. कक्कड, एस.ए. पाण्डेय, प्रशांत बुरडे, धनंजय कमलाकर, मिलिंद भारंबे आणि डॉ. रवींद्र सिंघल यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अतिरिक्त आयुक्तपदाची धुरा सांभाळली. प्रत्येकाने आपल्या कालावधीत वेगवेगळ्या उपाययोजना राबवून गुन्हेगारीला आळा घालण्याचा प्रयत्न केला.