शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

नागरिकत्वाबाबत राज्यांना फारसे अधिकार नाहीत - शशी थरूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 04:31 IST

नागरिकत्व देण्यासंदर्भात राज्यांना फारसे अधिकार नाहीत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (सीएए) राज्ये संमत करत असलेले प्रस्ताव ही एक प्रकारची राजकीय प्रतिक्रिया आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे.

कोलकाता - नागरिकत्व देण्यासंदर्भात राज्यांना फारसे अधिकार नाहीत. नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात (सीएए) राज्ये संमत करत असलेले प्रस्ताव ही एक प्रकारची राजकीय प्रतिक्रिया आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी म्हटले आहे.त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर (एनपीआर), नॅशनल रजिस्टर आॅफ सिटिझन्स (एनआरसी) यांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागणार आहे. कारण त्यासाठी लागणारे पुरेसे मनुष्यबळ केंद्राकडे नाही.नागरिकत्व देण्याचे अधिकार फक्त केंद्राला आहेत. त्यामुळे त्यासंदर्भातील कायद्याची अंमलबजावणी करायची की नाही करायची याबद्दल राज्यांना अधिकार नाहीत. त्यामुळे या कायद्याविरोधात राज्ये विधानसभेत प्रस्ताव मंजूर करू शकतात. न्यायालयात जाण्याचाही पर्याय त्यांना उपलब्ध आहे. मात्र नागरिकत्व दुरुस्ती कायदा अमलात आणू नका असे सांगण्याचा राज्यांना अधिकारच नाही. मात्र एनपीआर, एनआरसीची अंमलबजावणी आम्ही करणार नाही असे राज्ये सांगू शकतात.नागरिकत्व दुरुस्ती कायदा रद्दबातल करा अशी मागणी केंद्राकडे करणारा ठराव केरळ विधानसभेचे देशात पहिल्यांदा संमत केला. त्यानंतर पंजाब विधानसभेनेही असाच ठराव केला. तसेच विधेयक मुख्यमंत्री ममता बॅनर्जी येत्या सोमवारी पश्चिम बंगालच्या विधानसभेत मांडण्याची शक्यता आहे. असेच प्रस्ताव काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगढमधील विधानसभेतही संमत केले जातील असे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले होते.|संसदेने संमत केलेल्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकाच्या अंमलबजावणीस राज्ये नकार देऊ शकत नाहीत असे वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या होत्या. हा कायदा घटनात्मदृष्ट्या अवैध असल्याची सारवासारव सिब्बल यांनी नंतर केली होती. (वृत्तसंस्था)असा होऊ शकतो कायदा रद्दबातलशशी थरूर यांनी सांगितले की, नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला अंतरिम स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. या प्रकरणी पाच न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी घेण्याचे न्यायालयाने ठरविले.हा कायदा घटनात्मकदृष्ट्या अवैध आहे असा निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिल्यास किंवा केंद्र सरकारने हा कायदा मागे घेतल्यासच तो रद्दबातल ठरू शकतो. 

टॅग्स :citizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयकShashi Tharoorशशी थरूरGovernmentसरकार