शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

वर्षानुवर्षे निवेदने झाली मात्र खंडपीठ जनतेच्या हाती

By admin | Updated: July 2, 2015 23:47 IST

पुणे : गेल्या कित्येक वर्षापासून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्याला मिळावे यासाठी यापूर्वीच्या पुणे बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षांनाही निवेदने, पत्रव्यवहार, लाक्षणिक उपोषण धरणे आंदोलने झाली. हे सर्व सनदशीर मार्गाने घडत आले तरी त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. त्याचाच परिपाक म्हणून कदाचित यंदा आंदोलनाची भूमिका जनतेलाही पटली आणि सर्वसामान्य जनतेचाही पाठिंबा ही मिळत आहे हे आंदोलन आता केवळ वकिलांपुरते मर्यादित राहिले नसून जनतेच्याच हातात गेले आहे त्यामुळे आता माघार नाहीच असे पुणे बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षांनी मत व्यक्त केले आहे.

पुणे : गेल्या कित्येक वर्षापासून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्याला मिळावे यासाठी यापूर्वीच्या पुणे बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षांनाही निवेदने, पत्रव्यवहार, लाक्षणिक उपोषण धरणे आंदोलने झाली. हे सर्व सनदशीर मार्गाने घडत आले तरी त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. त्याचाच परिपाक म्हणून कदाचित यंदा आंदोलनाची भूमिका जनतेलाही पटली आणि सर्वसामान्य जनतेचाही पाठिंबा ही मिळत आहे हे आंदोलन आता केवळ वकिलांपुरते मर्यादित राहिले नसून जनतेच्याच हातात गेले आहे त्यामुळे आता माघार नाहीच असे पुणे बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षांनी मत व्यक्त केले आहे.
ॲड म. वि. अकोलकर (माजी अध्यक्ष-१९७८-७९ ) : विधीमंडळात १९७८ मध्ये पुणे व औरंगाबादला खंडपीठ मिळावे असा ठराव झाला त्याच वर्षी पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षस्थानी होतो. त्यामुळे आमचा उत्साह वाढला होता. मात्र कालांतराने हा निर्णय केवळ कागदावरच उरला. त्यामुळे सध्याचे सुरू असलेल्या आंदोलनाला वेगळीच धार मिळाली आहे. सातत्याने मागणी करूनही जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे, अटींच्या शर्ती करून शासन किंवा उच्च न्यायालयाने भेटी नाकारणे हे चूकीचेच आहे.
ॲड औदुंबर खूने-पाटील (माजी अध्यक्ष -२००५-०६) : अध्यक्ष असताना, शासनाकडे लेखी निवेदने दिली होती. आंदोलन केले होते. गोडाऊनच्या जागेसाठीचा ठराव केला होता. इतक्या वर्षानंतरही खंडपीठ न देणे ही बाबच खटकणारी आहे. उच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांपैकी ४० टक्के खटले हे एकट्या पुणे व जिल्‘ातील आहेत. त्यामुळे खटल्यांचा/याचिकांचा निपटारा जलदगतीने होण्यासाठी व तातडीने न्याय मिळण्यासाठी पुण्यात खंडपीठाची गरज आहे. मुळात सध्याचे आंदोलन हे केवळ वकिलांचे उरलेले नाही तर आता ते जनतेचे झाले असून जनतेच्याच कोर्टात गेले आहे.
ॲड घाडगेपाटील (माजीअध्यक्ष २००३-०४) : त्या वर्षी आम्ही धरणे आंदोलन केले. लेखी पत्रव्यवहार केला होता. २०१३ मध्ये तर उच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती नेमली मात्र अद्याप त्याचा निकाल गुलदस्त्यात आहे. हा निकाल देण्यासही इतका का उशीर होतोय हे ही स्पष्ट सांगायला हवे. न्यायाचे विकेंद्रीकरण व्हायला हवे. यासाठी प्रत्येक जिल्‘ात खंडपीठ दिले तरी हरकतच नसावी.