शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

ही वेळ न्यायसंस्थेच्या पाठीशी उभे राहण्याची - अरुण जेटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 05:20 IST

सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने आरोप केल्यानंतर जेटली यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

नवी दिल्ली : ही वेळ न्यायसंस्थेच्या पाठीशी उभे राहण्याची आहे. सरन्यायाधीशांविरुद्ध खोटारडेपणा पसरवून जे कोणी न्यायसंस्था अस्थिर करून पाहत आहेत, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असे मत वित्तमंत्री अरुण जेटली यांनी ब्लॉगमध्ये व्यक्त केले आहे.सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयाच्या एका माजी महिला कर्मचाऱ्याने आरोप केल्यानंतर जेटली यांनी यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.ही वेळ न्यायसंस्थेच्या पाठीशी उभे राहण्याची आहे. वैयक्तिक सभ्यपणा, मूल्य, नैतिकता आणि प्रामाणिकपणासंदर्भात भारताचे विद्यमान सरन्यायाधीश यांच्या बाबतीत नितांत आदर आहे. त्यांच्या न्यायिक दृष्टिकोनाबाबत असहमती व्यक्त केली जाते; तेव्हा त्यांच्या नैतिकतेबाबत कधीही प्रश्न उपस्थित करण्यात आला नाही. एका असंतुष्ट व्यक्तीच्या आरोपाचे समर्थन करणे सरन्यायाधीशांची संस्था अस्थिर करण्याच्या प्रक्रियेस मदत करण्यासारखे आहे. न्यायसंस्थेला नष्ट करण्यासाठी खोटारडेपणाची बाजू घेणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली गेली नाही, तर ही प्रवृत्ती वाढत जाईल.संस्था विस्कळीत करण्याचा अयशस्वी खटाटोप करू पाहणाºया चार डिजिटल मीडिया संस्था सरन्यायाधीशांच्या अशी प्रश्नावली पाठवितात तेव्हा प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असते. गेल्या काही वर्षांपासून संस्था विस्कळीत करणाºया संस्थांना मोठ्या प्रमाणावर पाठबळ मिळत असल्याबद्दल जेटली यांनी खेद व्यक्त केला. संस्था विस्कळीत करणाºया अशा संस्थांना कोणतेही धरबंध नसतो. यापैकी अनेक डाव्या किंवा अतिडाव्या विचारसरणीचे प्रतिनिधित्व करतात. त्यांना कोणतेही लोकप्रिय समर्थन नसते, असे असताना मीडिया आणि शैक्षणिक संस्थात अशांचा मोठा भरणा आहे. मुख्य प्रवाहातील मीडियातून बाहेर गेलेल्यांनी डिजिटल आणि सोशल मीडियाचा आधार घेतला आहे, असे जेटली यांनी या ब्लॉगमध्ये म्हटले.

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयRanjan Gogoiरंजन गोगोईArun Jaitleyअरूण जेटली