शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

चेंगराचेंगरीवरून बिहार-केंद्रात जुंपली

By admin | Updated: October 6, 2014 02:42 IST

दस-याला येथील गांधी मैदानावर झालेल्या चेंगराचेंगरीवरून बिहार आणि केंद्र सरकारदरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच बिहार सरकारने या घटनेस जबाबदार

पाटणा : दस-याला येथील गांधी मैदानावर झालेल्या चेंगराचेंगरीवरून बिहार आणि केंद्र सरकारदरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच बिहार सरकारने या घटनेस जबाबदार असलेल्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या चेंगराचेंगरीत ३३ जण ठार आणि २९ जखमी झाले होते.बिहार सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती गठित केली आहे. गृहसचिव आमिर सुभानी आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे हे चौकशी समितीचे सदस्य आहेत. चेंगराचेंगरीसाठी जबाबदार असलेल्या कुणालाही सरकार सोडणार नाही, असे जलस्रोत मंत्री विजय चौधरी यांनी सांगितले. चौकशी समिती येत्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वेच्छेने बयाण देण्यास तयार असलेल्या लोकांचे आणि घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदारांचे म्हणणे ऐकून घेईल. त्याशिवाय घटनेबाबतची अधिक माहिती देण्याचे आवाहन करणारी एक जाहिरातही स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल, असे चौधरी म्हणाले. दसरा उत्सवादरम्यान ही चेंगराचेंगरी झाली होती. त्यावेळी मैदानावर प्रकाश योजना अपुरी होती, याकडे लक्ष वेधले असता चौधरी म्हणाले, राज्य सरकारला त्याची माहिती आहे. परंतु चौकशी अहवाल मिळेपर्यंत वाट पाहावी लागेल.जखमी असलेल्या लोकांचे आणि घटनेच्या वेळी मैदानावर तैनात असलेले पोलीस अधिकारी व दंडाधिकाऱ्यांचेही बयाण नोंदविण्यात आल्याची माहिती पांडे यांनी दिली. चौकशी एक आठवड्यात पूर्ण होईल आणि त्यानंतर राज्य सरकारला अहवाल सादर केला जाईल, असे पांडे यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)