शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
2
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
3
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
4
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
5
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
6
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
7
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
8
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
9
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
10
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
11
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
12
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
13
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
14
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
16
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
17
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
18
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
19
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
20
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?

चेंगराचेंगरीवरून बिहार-केंद्रात जुंपली

By admin | Updated: October 6, 2014 02:42 IST

दस-याला येथील गांधी मैदानावर झालेल्या चेंगराचेंगरीवरून बिहार आणि केंद्र सरकारदरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच बिहार सरकारने या घटनेस जबाबदार

पाटणा : दस-याला येथील गांधी मैदानावर झालेल्या चेंगराचेंगरीवरून बिहार आणि केंद्र सरकारदरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच बिहार सरकारने या घटनेस जबाबदार असलेल्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या चेंगराचेंगरीत ३३ जण ठार आणि २९ जखमी झाले होते.बिहार सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती गठित केली आहे. गृहसचिव आमिर सुभानी आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे हे चौकशी समितीचे सदस्य आहेत. चेंगराचेंगरीसाठी जबाबदार असलेल्या कुणालाही सरकार सोडणार नाही, असे जलस्रोत मंत्री विजय चौधरी यांनी सांगितले. चौकशी समिती येत्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वेच्छेने बयाण देण्यास तयार असलेल्या लोकांचे आणि घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदारांचे म्हणणे ऐकून घेईल. त्याशिवाय घटनेबाबतची अधिक माहिती देण्याचे आवाहन करणारी एक जाहिरातही स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल, असे चौधरी म्हणाले. दसरा उत्सवादरम्यान ही चेंगराचेंगरी झाली होती. त्यावेळी मैदानावर प्रकाश योजना अपुरी होती, याकडे लक्ष वेधले असता चौधरी म्हणाले, राज्य सरकारला त्याची माहिती आहे. परंतु चौकशी अहवाल मिळेपर्यंत वाट पाहावी लागेल.जखमी असलेल्या लोकांचे आणि घटनेच्या वेळी मैदानावर तैनात असलेले पोलीस अधिकारी व दंडाधिकाऱ्यांचेही बयाण नोंदविण्यात आल्याची माहिती पांडे यांनी दिली. चौकशी एक आठवड्यात पूर्ण होईल आणि त्यानंतर राज्य सरकारला अहवाल सादर केला जाईल, असे पांडे यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)