शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

चेंगराचेंगरीवरून बिहार-केंद्रात जुंपली

By admin | Updated: October 6, 2014 02:42 IST

दस-याला येथील गांधी मैदानावर झालेल्या चेंगराचेंगरीवरून बिहार आणि केंद्र सरकारदरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच बिहार सरकारने या घटनेस जबाबदार

पाटणा : दस-याला येथील गांधी मैदानावर झालेल्या चेंगराचेंगरीवरून बिहार आणि केंद्र सरकारदरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतानाच बिहार सरकारने या घटनेस जबाबदार असलेल्या लोकांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. या चेंगराचेंगरीत ३३ जण ठार आणि २९ जखमी झाले होते.बिहार सरकारने या घटनेची चौकशी करण्यासाठी एक समिती गठित केली आहे. गृहसचिव आमिर सुभानी आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे हे चौकशी समितीचे सदस्य आहेत. चेंगराचेंगरीसाठी जबाबदार असलेल्या कुणालाही सरकार सोडणार नाही, असे जलस्रोत मंत्री विजय चौधरी यांनी सांगितले. चौकशी समिती येत्या मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात स्वेच्छेने बयाण देण्यास तयार असलेल्या लोकांचे आणि घटनेच्या प्रत्यक्ष साक्षीदारांचे म्हणणे ऐकून घेईल. त्याशिवाय घटनेबाबतची अधिक माहिती देण्याचे आवाहन करणारी एक जाहिरातही स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्ध करण्यात येईल, असे चौधरी म्हणाले. दसरा उत्सवादरम्यान ही चेंगराचेंगरी झाली होती. त्यावेळी मैदानावर प्रकाश योजना अपुरी होती, याकडे लक्ष वेधले असता चौधरी म्हणाले, राज्य सरकारला त्याची माहिती आहे. परंतु चौकशी अहवाल मिळेपर्यंत वाट पाहावी लागेल.जखमी असलेल्या लोकांचे आणि घटनेच्या वेळी मैदानावर तैनात असलेले पोलीस अधिकारी व दंडाधिकाऱ्यांचेही बयाण नोंदविण्यात आल्याची माहिती पांडे यांनी दिली. चौकशी एक आठवड्यात पूर्ण होईल आणि त्यानंतर राज्य सरकारला अहवाल सादर केला जाईल, असे पांडे यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)