शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर सोहळा, शंकराचार्यांच्या भूमिकेवर श्री श्री रविशंकर यांनी घेतला आक्षेप; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 15:28 IST

Shri Shri Ravi Shankar Reaction On Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचे काम अपूर्ण असल्याने प्राणप्रतिष्ठा करणे योग्य नाही, अशी भूमिका घेत शंकराचार्यांनी या सोहळ्याला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Shri Shri Ravi Shankar Reaction On Ayodhya Ram Mandir:राम मंदिर रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सोहळ्यापूर्वी प्राथमिक धार्मिक विधी, अनुष्ठान, पूजा-पाठ यांना सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज, मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मात्र, देशातील चारही पीठांच्या शंकराचार्यांनी राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे म्हटले आहे. शंकराचार्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी प्रतिक्रिया देताना आक्षेप घेतला आहे.

सनातन धर्मानुसार मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच तिथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायला हवी. हा सोहळा सनातन धर्माच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. त्यामुळे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला चार शंकराचार्यांपैकी कोणीही उपस्थित राहणार नाहीत. आमच्या मनात कुणाच्याहीप्रति द्वेष नाही. परंतु, हिंदू धर्माचे नियम पाळणे आणि इतरांना तसे सुचवणे ही शंकराचार्यांची जबाबदारी आहे. अपूर्ण मंदिराचे उद्घाटन करून तिथे देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे हे चुकीचे आहे. आम्ही धर्मशास्त्राविरोधात जाऊ शकत नाही, असे अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे. यावर श्री श्री रविशंकर यांनी भाष्य केले. 

नेमके काय म्हणालेत श्री श्री रविशंकर?

तुम्ही तिरुवन्नामलाई मंदिराचे उदाहरण घ्या. हे मंदिर जेव्हा बांधले तेव्हा खूप लहान होते. नंतर तिथे मोठे मंदिर उभारण्यात आले. मदुराईमधील मंदिरदेखील असेच एक उदाहरण आहे. आपल्या देशात अशी अनेक मंदिरे आहेत जी सुरुवातीला खूप लहान होती. परंतु, नंतर तिथे मोठी मंदिरे बांधण्यात आली किंवा त्यांचा जिर्णोद्धार केला गेला. एवढेच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेले तिरुपती बालाजी मंदिर हेही सुरुवातीला खूप लहान होते. नंतरच्या काळात काही राजांनी तिथे मोठे मंदिर उभारले. प्राणप्रतिष्ठेनंतरही मंदिरे बांधण्याची तरतूद असते, असे श्री श्री रविशंकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, खरेतर आपल्याकडे राम मंदिराचे बांधकाम पूर्ण करून त्यानंतर तिथे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. परंतु, आपण खूप घाई करत आहोत. परंतु, आम्ही स्वस्थ बसू शकत नाही. आम्ही या कार्यक्रमाला जाणार नसल्याने कदाचित या कार्यक्रमाचे आयोजनकर्ते आम्हाला मोदीविरोधी म्हणतील. मात्र आम्ही मोदीविरोधी नाही. परंतु, आम्ही आमच्या धर्मशास्त्राच्या विरोधात जाऊ शकत नाही, असे ज्योतिषपीठाच्या शंकराचार्यांनी म्हटले आहे. तर, सर्व काही धर्मग्रंथांतील पद्धतीप्रमाणे झाले पाहिजे. धर्मग्रंथांनुसार प्राणप्रतिष्ठा आणि भक्ती झाली नाही, तर सर्वत्र गोंधळ माजतो, असे स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी म्हटले होते. 

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या