शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
2
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
3
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
4
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
5
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
6
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
7
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
8
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
9
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
10
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
11
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
12
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
13
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
14
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
15
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
16
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
17
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
18
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
19
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
20
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर सोहळा, शंकराचार्यांच्या भूमिकेवर श्री श्री रविशंकर यांनी घेतला आक्षेप; म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2024 15:28 IST

Shri Shri Ravi Shankar Reaction On Ayodhya Ram Mandir: राम मंदिराचे काम अपूर्ण असल्याने प्राणप्रतिष्ठा करणे योग्य नाही, अशी भूमिका घेत शंकराचार्यांनी या सोहळ्याला जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

Shri Shri Ravi Shankar Reaction On Ayodhya Ram Mandir:राम मंदिर रामलला प्राणप्रतिष्ठा सोहळा अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या सोहळ्यापूर्वी प्राथमिक धार्मिक विधी, अनुष्ठान, पूजा-पाठ यांना सुरुवात झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गज, मान्यवर या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मात्र, देशातील चारही पीठांच्या शंकराचार्यांनी राम मंदिर सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे म्हटले आहे. शंकराचार्यांनी घेतलेल्या भूमिकेबाबत अध्यात्मिक गुरू श्री श्री रविशंकर यांनी प्रतिक्रिया देताना आक्षेप घेतला आहे.

सनातन धर्मानुसार मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतरच तिथे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायला हवी. हा सोहळा सनातन धर्माच्या नियमांचे उल्लंघन करत आहे. त्यामुळे २२ जानेवारी रोजी होणाऱ्या कार्यक्रमाला चार शंकराचार्यांपैकी कोणीही उपस्थित राहणार नाहीत. आमच्या मनात कुणाच्याहीप्रति द्वेष नाही. परंतु, हिंदू धर्माचे नियम पाळणे आणि इतरांना तसे सुचवणे ही शंकराचार्यांची जबाबदारी आहे. अपूर्ण मंदिराचे उद्घाटन करून तिथे देवाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करणे हे चुकीचे आहे. आम्ही धर्मशास्त्राविरोधात जाऊ शकत नाही, असे अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटले आहे. यावर श्री श्री रविशंकर यांनी भाष्य केले. 

नेमके काय म्हणालेत श्री श्री रविशंकर?

तुम्ही तिरुवन्नामलाई मंदिराचे उदाहरण घ्या. हे मंदिर जेव्हा बांधले तेव्हा खूप लहान होते. नंतर तिथे मोठे मंदिर उभारण्यात आले. मदुराईमधील मंदिरदेखील असेच एक उदाहरण आहे. आपल्या देशात अशी अनेक मंदिरे आहेत जी सुरुवातीला खूप लहान होती. परंतु, नंतर तिथे मोठी मंदिरे बांधण्यात आली किंवा त्यांचा जिर्णोद्धार केला गेला. एवढेच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध असलेले तिरुपती बालाजी मंदिर हेही सुरुवातीला खूप लहान होते. नंतरच्या काळात काही राजांनी तिथे मोठे मंदिर उभारले. प्राणप्रतिष्ठेनंतरही मंदिरे बांधण्याची तरतूद असते, असे श्री श्री रविशंकर यांनी म्हटले आहे.

दरम्यान, खरेतर आपल्याकडे राम मंदिराचे बांधकाम पूर्ण करून त्यानंतर तिथे प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी पुरेसा वेळ आहे. परंतु, आपण खूप घाई करत आहोत. परंतु, आम्ही स्वस्थ बसू शकत नाही. आम्ही या कार्यक्रमाला जाणार नसल्याने कदाचित या कार्यक्रमाचे आयोजनकर्ते आम्हाला मोदीविरोधी म्हणतील. मात्र आम्ही मोदीविरोधी नाही. परंतु, आम्ही आमच्या धर्मशास्त्राच्या विरोधात जाऊ शकत नाही, असे ज्योतिषपीठाच्या शंकराचार्यांनी म्हटले आहे. तर, सर्व काही धर्मग्रंथांतील पद्धतीप्रमाणे झाले पाहिजे. धर्मग्रंथांनुसार प्राणप्रतिष्ठा आणि भक्ती झाली नाही, तर सर्वत्र गोंधळ माजतो, असे स्वामी निश्चलानंद सरस्वती यांनी म्हटले होते. 

 

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्या