शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय
5
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
6
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
7
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
8
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
9
भारताच्या 'या' राज्यात राहतात सर्वाधिक नेपाळी लोक, सरकारी सोयीसुविधांचाही घेतात लाभ!
10
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
11
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
12
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
13
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
14
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
15
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
16
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
17
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
18
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
19
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!

जलसिंचनावर सीएसआर निधी खर्च करा - शेखावत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 02:50 IST

कंपन्यांना आवाहन; राष्ट्रीय जल अभियानात महाराष्ट्र देशात दुसरा

नवी दिल्ली: सर्वाधिक पाणी वापरणाऱ्या खासगी कंपन्या सीएसआर निधीतील रक्कम जलसिंचन, जलसंवर्धनासाठी वापरत नाहीत, अशी खंत केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय जल अभियानाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. महाराष्ट्राच्या जलसंपदा विभागास मिळालेला दुसºया क्रमांकाचा पुरस्कार प्रधान सचिव आय. एस. चहल यांनी स्वीकारला.पिण्यासाठी, कृषीसाठी व त्याखालोखाल उद्योगधंद्यांसाठी लागणाºया पाण्याची गरज भागवण्यास आतापासून उपाय योजावे लागतील, अन्यथा भविष्यात संकट उभे राहिल, असा इशारा देत शेखावत म्हणाले की, खासगी कंपन्या सीएसआर निधीतील ४ टक्के रक्कमच पाणी व्यवस्थापन, जल संवर्धन, सिंचन यांवर खर्च करतात. सर्वाधिक पाणी वापरणाºया कंपन्या अवघा ११ टक्के खर्च पाणी प्रश्न सोडवण्यासाठी करतात. हे प्रमाण वाढायला हवे. याप्रसंगी चहल म्हणाले की, गोदावरी खोºयातील पाणी व्यवस्थापनासाठी महाराष्ट्राला सन्मानित करण्यात आले. ई सोर्स मॉडेलिंगचा प्रभावी वापर त्यासाठी महाराष्ट्राने केला होता. राज्याला मिळालेला सन्मान मोठाच आहे. अभियानाचे पुरस्कार राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात व मध्य प्रदेशलादेखील मिळाले.बापू साळुंखे यांचाही सन्मानस्वत:च्या शेतात प्रयोग करुन जलपातळी वाढवणारे शेतकरी बापू भाऊसाहेब साळुंखे यांना व्यक्तिगत श्रेणीत प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शेतजमिनीतील पाणीपातळी त्यांनी २० टक्क्यांनी वाढवली. चंदगडसारख्या दुष्काळग्रस्त तालुक्यातील वडनेरभैरव गावातील साळुंखे यांचे उत्पन्न प्रचंड वाढले. त्यांनी २००४ पासून प्रयोग सुरू केला. ‘वाल्मी’त प्रशिक्षण घेतले. शेताजवळ डोंगरातील पाणी अडवले. शेततळी बांधली. नावीन्यपूर्ण प्रयोगांआधी त्यांना फक्त २ एकरास पाणी वापरता येई. आता २२ एकरांना हे पाणी पुरते.