शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
16
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
17
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
18
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
19
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
20
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय

टॅँकरच्या पाणी चोरीवर विशेष लक्ष दुष्काळाच्या झळा : ठेकेदाराच्या तीन निविदा प्राप्त

By admin | Updated: March 12, 2016 00:13 IST

नाशिक : मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढीस लागून यंदा गेल्या वर्षापेक्षा पाणी टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण होणार असल्याने टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागविलेल्या निविदांना तीन खासगी टॅँकरचालकांनी प्रतिसाद दिला असला तरी, तिघांनी पाणी वाहतुकीचे समान दर भरल्याने त्यांच्याशी वाटाघाटी करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. मात्र टॅँकर चालकांकडून होणारी पाणी चोरी रोखण्यासाठी यंदा विविध उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले आहे.

नाशिक : मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात उन्हाळ्याची तीव्रता वाढीस लागून यंदा गेल्या वर्षापेक्षा पाणी टंचाईची भीषण परिस्थिती निर्माण होणार असल्याने टंचाईग्रस्त गावांना टॅँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागविलेल्या निविदांना तीन खासगी टॅँकरचालकांनी प्रतिसाद दिला असला तरी, तिघांनी पाणी वाहतुकीचे समान दर भरल्याने त्यांच्याशी वाटाघाटी करण्याची तयारी प्रशासनाने सुरू केली आहे. मात्र टॅँकर चालकांकडून होणारी पाणी चोरी रोखण्यासाठी यंदा विविध उपाययोजना करण्याचे ठरविण्यात आले आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा करणार्‍या टॅँकर चालकांकडून फेर्‍या अधिक दाखविणे, पाणी भरण्याचे ठिकाण ते पाणी पोहोचविण्याच्या ठिकाणाचे अंतर वाढून दाखविणे, टॅँकर न पोहोचविताच, प्रत्यक्षात देयक सादर करणे, मोठ्या टॅँकरऐवजी छोटे पाठवून पाणी चोरी करणे अशा अनेक कारणांने टॅँकर घोटाळा दरवर्षी गाजतो. प्रशासनाकडून पाणीपुरवठ्यात पारदर्शीपणा येण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जातात, परंतु त्यातूनही पळवाटा शोधण्यात येतात. यंदा धरणांमध्ये जेमतेम साठा, तर नद्या कोरड्याठाक पडून विहिरींनी तळ गाठला आहेत, अशा परिस्थितीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ग्रामीण व प्रसंगी शहरीभागात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार असून, प्रशासनाच्या मते मेअखेरपर्यंत पाणीपुरवठा करणार्‍या टॅँकरची संख्या अडीचशेच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. त्यासाठी खासगी टॅँकरचालकांकडून निविदा मागविण्यात आल्या असता, सध्या पाणीपुरवठा करणार्‍या टॅँकरचालकांनीच त्यात सहभाग घेतला, परंतु तीनही निविदाधारकांनी समान दर भरल्यामुळे नेमकी कोणती निविदा ग्रा‘ धरायची याबाबत प्रशासन विचार करीत आहे. टॅँकरच्या पाणी चोरी रोखण्यासाठी प्रशासनाने ज्या काही उपाययोजना केल्या आहेत, त्यात प्रामुख्याने ५० लाख रुपयांची अनामत निविदाधारकांकडून जमा केली जाणार असून, जेणे करून भविष्यात निविदेतील अटी-शर्तींचा भंग झाल्यास अनामतीच्या रक्कमेतून त्याची भरपाई करणे सोपे होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक टॅँकरला जीपीएस सिस्टीम सक्तीची करण्यात आली असून, ज्या ठिकाणाहून टॅँकर पाणी भरेल त्या ठिकाणी तशी नोंद घेण्याबरोबरच पाणी पोहोचविल्या जाणार्‍या गावातील एका महिलेची टॅँकरच्या फेरीवर स्वाक्षरी घेण्याची मुख्य अट टाकण्यात आली आहे. या शिवाय ज्या गावांना टॅँकर मंजूर केले, त्या गावात नियमित टॅँकर पोहोचते की नाही यासाठी अचानक भेटी देऊन तपासणी करण्याचेही ठरविण्यात आले आहे.