शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांच्या गैरवर्तनाबद्दल सभापती नायडू कमालीचे नाराज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2020 06:07 IST

गदारोळ करणारांवर कारवाईचा विचार

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राज्यसभेत कृषी विधेयके रविवारी मांडली जात असताना निर्माण करण्यात आलेल्या गोंधळामुळे उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू हे कमालीचे नाराज असल्याचे समजते. गदारोळ करणारांवर कारवाई करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

याप्रकरणी नायडू यांनी त्यांच्या निवासस्थानी उपसभापती हरिवंश, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांच्यासह उच्च पातळीवरील बैठक घेतली. विरोधी पक्षांनी दोन (शेतकरी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य (प्रोत्साहन आणि सुलभीकरण) विधेयक, २०२० आणि शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) करार किंमत आश्वासन आणि कृषी सेवा विधेयक, २०२०) विधेयकांचा निषेध केला. ही विधेयके सभागृहात मांडण्यात आली.तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ’ ब्रिएन, काँग्रेसचे खासदार रिपूण बोरा, आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह आणि द्रमुकचे खासदार तिरुची सिवा हे उपसभापती हरिवंश यांचा माईक हिसकावून घेण्याचा प्रयत्न करताना दिसले. अनेक खासदारांनी हरिवंश यांच्याविरोधात घोषणाही दिल्या व कागद फाडले. या गोंधळात कामकाज दहा मिनिटांसाठी थांबले.

सभागृह सुरू झाले तेव्हा विधेयके प्रत्यक्षात संमतही झाली होती. सभागृहाच्या कामकाजात भाग घेतलेल्या भाजपच्या अनेक खासदारांनीही नाराजी व्यक्त केली. भाजपचे राज्यसभा सदस्य भुपेंदर यादव यांनी ‘लाजिरवाणे कृत्य’ असे म्हणून सभागृहातील गैरवर्तनाबद्दल त्या खासदारांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी केली.

१२ विरोधी पक्षांचा उपसभापतींवर अविश्वास प्रस्तावराज्यसभेत रविवारी झालेल्या कामकाजावर प्रचंड संतप्त झालेल्या १२ विरोधी पक्षांनी उपसभापती हरिवंश यांच्यावर अविश्वास प्रस्ताव दाखल केला. वरिष्ठ सभागृहात ज्या पद्धतीने रविवारी २ कृषी विधेयके मंजूर करण्यात आली, त्यावर विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला आहे.ज्या पक्षांंनी हा प्रस्ताव दाखल केला आहे, त्यात काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पार्टी, तेलंगणा राष्टÑ समिती, माकपा, भाकपा, राष्टÑवादी काँग्रेस, राष्टÑीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स, द्रमुक व आम आदमी पार्टी यांचा समावेश आहे.आजच्या प्रकाराने लोकशाहीचा खून झाला आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी दिली. उपसभापतींनी लोकसभेची सर्व मूल्ये पायदळी तुडवली आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.

संसदेवर कॉर्पोरेट लॉबीचा प्रभाव -राजीव सातवराज्यसभेत विरोधकांना बोलू दिले नाही. संसदीय परंपरेत असे कधीही झाले नाही. उपसभापतींची वर्तणूक अनपेक्षित होती. राज्यसभेच्या कामकाजावर कॉर्पोरेट लॉबीचा प्रभाव दिसल्याची गंभीर टीका काँग्रेस खासदार राजीव सातव यांनी शनिवारी ‘लोकमत’शी बोलताना केली.राज्यसभेत चर्चेचे नियम आहेत. ते डावलण्यात आले. विरोधी पक्षनेत्यांना बोलू दिले नाही. आम्ही मतविभाजन मागितले, तर तेही अमान्य केले, अशा शब्दांत सातव यांनी कृषी विधेयकांवरून सरकारला सुनावले.शेतकरीविरोधी विधेयक असेल, तर संपूर्ण देशात विशेषत: महाराष्ट्रातून शेतकरीविरोध का नाही, यावर सातव म्हणाले की, अद्याप लोकांना त्याची पूर्ण माहिती नाही. पंजाब-हरयाणातील शेतकऱ्यांना ते लक्षात आले म्हणून ते रस्त्यावर आले.भारतीय शेती कॉर्पोरेट घराणी, बाहेरील कंपन्यांच्या हाती जाऊ देऊ नका. कृषी क्रांतीचा दावा करणाºया विधेयकावर त्यासाठी स्वतंत्र अधिवेशन, दिवसभर चर्चा व्हायला हवी होती, अशी भूमिका खासदार व शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतली. या विधेयकानंतर शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, याची ग्वाही सरकार देणार का? असा खोचक प्रश्नही त्यांनी विचारला.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले, शेतकऱ्यांनी देशाच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिले. महाराष्ट्रात शेतकºयांनी पारंपरिक पीक सोडून नवे पीक घेतले. शरद पवार यांनी शेतकºयांना दिशा दिली. धोरण आखताना त्यांच्यासारख्या नेत्यांशी चर्चा व्हायला हवी होती. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाVenkaiah Naiduव्यंकय्या नायडू