शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
5
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
6
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
7
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
8
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
9
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
10
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
11
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
12
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
13
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
14
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
15
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
16
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
17
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
18
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
19
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
20
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी

बोलाची कढी़

By admin | Updated: October 10, 2014 03:04 IST

पर्यायाने त्यांच्या कथित सर्वांगीण हातोटीचं नेमकं मूल्यमापन अशक्य. बरं त्यात सुलभता यावी म्हणून महाराष्ट्र राज्यही निर्णायक बहुमताने त्यांच्याच ताब्यात द्यावं

- राजेंद्र शिखरे

पाच बॅट्समन एक बॉलर

काँग्रेसला नामस्मरणविरहित चिंतनाची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ताविरहित वकूब परीक्षणाची गरज आहे. रामदास आठवलेगटादी रिपब्लिकन पक्षांना किमान एखाद्या हक्काच्या गल्लीशोधाची निकड आहे. राजू शेट्टी, जानकर, मेटे यांना आपल्या स्वत:बाहेर आपला पक्ष सोडा, आपण स्वत:च कुठवर आहोत, हे कळवून घेणं अपरिहार्य आहे. अपक्ष म्हणून ज्यांनी आपलं विक्रीमूल्य वधारतं ठेवण्यातच आजवर धन्यता मानली, त्यांना आता, आपला कुंकू लावता म्हणून किमान बिज-तिजवर तरी आपल्या गळाला लागतोय का, यासाठी उंबरेघास अपरिहार्य आहे. सहीसलामत केंद्रातल्या सत्तेत जाण्याबरोबरच मोदी नावाच्या या वेळच्या निवडणूक आकर्षणानं बाकी काही नाही तरी हा इतका राजकीय परिणाम निश्चित साधला आहे. आणखी एक. आपल्याशिवाय महाराष्ट्रात बाकी हिंदुत्ववादी पक्षांना थारा मिळणं ही केवळ अशक्य कोटीतली गोष्ट आहे, हा विद्यमान शिवसेनेचा अजेंडाही त्यांच्याकडून धाब्यावर बसवला गेला आहे. मनसेला अजून माणसाळण्याची तयारी निव्वळ दाखवण्यादाखलच नाही, तर त्यांनी माणसाळलं पाहिजे हेही त्यांनी लक्षात आणून दिलं आहे. मात्र दस्तुरखुद्द मोदींचा महाराष्ट्रातील भाजपा तरी फारच हवेत जातो आहे हीही बाब याच मोदी नावाच्या प्रलोभनाने मतदारांच्या ध्यानी आणून दिली आहे. अर्थात यातून महाराष्ट्राचं झालंच तर भलं होईल अन्यथा हे शिवराज्य कित्येक वर्षं मागं जाईल. सगळ्याच अर्थाने! मोदींनी चेंडू मतदारांहाती दिला आहे. ढोबळ सरासरीने एकाच वेळी खेळू पाहते पाच बॅट्समन विरु द्ध कोटी हातांचा एकच बॉलर. म्हटलं तर गेम चेंजर. म्हटलं तर गेम लूजर... दोघंही. मोदी आणि मतदार. क्रिटिकल पोझिशन. क्रिटिकल कंडिशन. दोघांचीही. मोदींची आणि मतदारांची. कारण प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत वय वाढवूनही मोदींचा कार्यकाळ शंभर वर्षांवर जात नाही. पर्यायाने त्यांच्या कथित सर्वांगीण हातोटीचं नेमकं मूल्यमापन अशक्य. बरं त्यात सुलभता यावी म्हणून महाराष्ट्र राज्यही निर्णायक बहुमताने त्यांच्याच ताब्यात द्यावं, मंडळी उतण्या-मातण्याची दाट भीती. सध्याच पी हळद आणि हो गोरी अशी अवस्था आहे. बरं बाळासाहेबांपश्चातच्या शिवसेनेची महाराष्ट्राला अजून गरज आहे. पण राजकीय विश्लेषकांच्या अभ्यासानुसार, सध्या ती निकडही फक्त निडर मराठी सैनिक म्हणून. ना राजा ना सेनापती म्हणून. इंजीन तर कुठं कुठं धावण्या, थांबण्याच्या सरावातच गोंधळतंय. पवार साहेब हुशार. अर्थातच मोठे पवार साहेब. त्यांनी हुशारीनं आपली राज्यसभा पटकावली. हो! पार्लमेंटमध्ये पास काढून जायला नको. प्रेक्षक गॅलरी टळली की आपसूक पीचफंड्यात राहता येतं. आणि त्यात पवारांच्या हातावरच्या घड्याळाची, न जाणो मोदींनाही गरज भासू शकते. युती तोडून भाजपाने आणि आघाडी टाळून शरद पवार यांनी, बघायला गेलं तर परस्परांना विश्वास आणि एकदुसऱ्यांना ठाम शाश्वती तर देऊ केली आहे; अशी अशाच उच्च विचारसरणीच्या मोठ्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज आणि उद्धव ठाकरे बंधूंनीही या संशयाची पुष्टी केली आहे. पुढं जाऊन मोदींच्या मंत्रिमंडळात पवारांना मंत्री म्हणून पाहायला लागलं तर आश्चर्य वाटू देऊ नका; असंही त्यांनी त्यांच्या मतदारांना आगाऊच सांगून ठेवलं आहे. आता सांगा. मतदार गोंधळेल नाहीतर काय होईल? मग भले तो कधीकाळी राजा शिवछत्रपतींचा, शाहू-फुले-आंबेडकर यांचा महाराष्ट्र होता म्हणून काय झालं? ...महात्मे बदले तशी परिस्थिती आणि परिस्थितीबरहुकूम गरजा आणि गरजेप्रमाणे जनता बदलती राहिली, तर तीही स्वाभाविक परिक्र माच! थोडक्यात, विद्यमान नेत्यांच्या नाठाळ बोलकढीला आताशा मतदार भीक घालेल असं संभवत नाही. नेमकं मतदान होणार आहे. हा अखंड महाराष्ट्र इथल्या जनतेचाच राहणार आहे.