शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
4
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
5
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
6
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
7
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
8
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
9
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
10
"तसेही आज तेच करावे लागले ना?"; भाजपने उद्धव ठाकरेंना डिवचले, दसरा मेळाव्यावरून हल्ला
11
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल
12
धक्कादायक! मुंबईतील २६/११ मधील हल्ल्यात NSG कमांडोने शौर्य दाखवले; आता गांजा तस्करीच्या आरोपाखाली अटक
13
"रावण वाईट नव्हता, थोडा खोडकर...", अभिनेत्रीची वादग्रस्त पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
Tragedy in Bihar: हृदयद्रावक घटना! वंदे भारत एक्सप्रेसच्या धडकेत ४ ठार; २ जण गंभीर जखमी
15
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
16
टाटा मोटर्स वगळता विक्रीचा दबाव; जागतिक बाजारातील संमिश्र संकेतामुळे भारतीय बाजार रेड झोनमध्ये
17
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
18
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडेसाठी अभिषेक शर्मा-तिलक वर्माची टीम इंडियात एन्ट्री
19
"सुशांतबद्दल सांगायचं तर आम्ही ३ वर्ष...", अभिनेत्याच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच व्यक्त झाल्या सविता प्रभुणे
20
IT क्षेत्रासाठी मोठा धक्का! TCS मधून १२,००० जणांना काढणार, कर्मचाऱ्यांसमोर दोनच पर्याय

बोलाची कढी़

By admin | Updated: October 10, 2014 03:04 IST

पर्यायाने त्यांच्या कथित सर्वांगीण हातोटीचं नेमकं मूल्यमापन अशक्य. बरं त्यात सुलभता यावी म्हणून महाराष्ट्र राज्यही निर्णायक बहुमताने त्यांच्याच ताब्यात द्यावं

- राजेंद्र शिखरे

पाच बॅट्समन एक बॉलर

काँग्रेसला नामस्मरणविरहित चिंतनाची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ताविरहित वकूब परीक्षणाची गरज आहे. रामदास आठवलेगटादी रिपब्लिकन पक्षांना किमान एखाद्या हक्काच्या गल्लीशोधाची निकड आहे. राजू शेट्टी, जानकर, मेटे यांना आपल्या स्वत:बाहेर आपला पक्ष सोडा, आपण स्वत:च कुठवर आहोत, हे कळवून घेणं अपरिहार्य आहे. अपक्ष म्हणून ज्यांनी आपलं विक्रीमूल्य वधारतं ठेवण्यातच आजवर धन्यता मानली, त्यांना आता, आपला कुंकू लावता म्हणून किमान बिज-तिजवर तरी आपल्या गळाला लागतोय का, यासाठी उंबरेघास अपरिहार्य आहे. सहीसलामत केंद्रातल्या सत्तेत जाण्याबरोबरच मोदी नावाच्या या वेळच्या निवडणूक आकर्षणानं बाकी काही नाही तरी हा इतका राजकीय परिणाम निश्चित साधला आहे. आणखी एक. आपल्याशिवाय महाराष्ट्रात बाकी हिंदुत्ववादी पक्षांना थारा मिळणं ही केवळ अशक्य कोटीतली गोष्ट आहे, हा विद्यमान शिवसेनेचा अजेंडाही त्यांच्याकडून धाब्यावर बसवला गेला आहे. मनसेला अजून माणसाळण्याची तयारी निव्वळ दाखवण्यादाखलच नाही, तर त्यांनी माणसाळलं पाहिजे हेही त्यांनी लक्षात आणून दिलं आहे. मात्र दस्तुरखुद्द मोदींचा महाराष्ट्रातील भाजपा तरी फारच हवेत जातो आहे हीही बाब याच मोदी नावाच्या प्रलोभनाने मतदारांच्या ध्यानी आणून दिली आहे. अर्थात यातून महाराष्ट्राचं झालंच तर भलं होईल अन्यथा हे शिवराज्य कित्येक वर्षं मागं जाईल. सगळ्याच अर्थाने! मोदींनी चेंडू मतदारांहाती दिला आहे. ढोबळ सरासरीने एकाच वेळी खेळू पाहते पाच बॅट्समन विरु द्ध कोटी हातांचा एकच बॉलर. म्हटलं तर गेम चेंजर. म्हटलं तर गेम लूजर... दोघंही. मोदी आणि मतदार. क्रिटिकल पोझिशन. क्रिटिकल कंडिशन. दोघांचीही. मोदींची आणि मतदारांची. कारण प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत वय वाढवूनही मोदींचा कार्यकाळ शंभर वर्षांवर जात नाही. पर्यायाने त्यांच्या कथित सर्वांगीण हातोटीचं नेमकं मूल्यमापन अशक्य. बरं त्यात सुलभता यावी म्हणून महाराष्ट्र राज्यही निर्णायक बहुमताने त्यांच्याच ताब्यात द्यावं, मंडळी उतण्या-मातण्याची दाट भीती. सध्याच पी हळद आणि हो गोरी अशी अवस्था आहे. बरं बाळासाहेबांपश्चातच्या शिवसेनेची महाराष्ट्राला अजून गरज आहे. पण राजकीय विश्लेषकांच्या अभ्यासानुसार, सध्या ती निकडही फक्त निडर मराठी सैनिक म्हणून. ना राजा ना सेनापती म्हणून. इंजीन तर कुठं कुठं धावण्या, थांबण्याच्या सरावातच गोंधळतंय. पवार साहेब हुशार. अर्थातच मोठे पवार साहेब. त्यांनी हुशारीनं आपली राज्यसभा पटकावली. हो! पार्लमेंटमध्ये पास काढून जायला नको. प्रेक्षक गॅलरी टळली की आपसूक पीचफंड्यात राहता येतं. आणि त्यात पवारांच्या हातावरच्या घड्याळाची, न जाणो मोदींनाही गरज भासू शकते. युती तोडून भाजपाने आणि आघाडी टाळून शरद पवार यांनी, बघायला गेलं तर परस्परांना विश्वास आणि एकदुसऱ्यांना ठाम शाश्वती तर देऊ केली आहे; अशी अशाच उच्च विचारसरणीच्या मोठ्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज आणि उद्धव ठाकरे बंधूंनीही या संशयाची पुष्टी केली आहे. पुढं जाऊन मोदींच्या मंत्रिमंडळात पवारांना मंत्री म्हणून पाहायला लागलं तर आश्चर्य वाटू देऊ नका; असंही त्यांनी त्यांच्या मतदारांना आगाऊच सांगून ठेवलं आहे. आता सांगा. मतदार गोंधळेल नाहीतर काय होईल? मग भले तो कधीकाळी राजा शिवछत्रपतींचा, शाहू-फुले-आंबेडकर यांचा महाराष्ट्र होता म्हणून काय झालं? ...महात्मे बदले तशी परिस्थिती आणि परिस्थितीबरहुकूम गरजा आणि गरजेप्रमाणे जनता बदलती राहिली, तर तीही स्वाभाविक परिक्र माच! थोडक्यात, विद्यमान नेत्यांच्या नाठाळ बोलकढीला आताशा मतदार भीक घालेल असं संभवत नाही. नेमकं मतदान होणार आहे. हा अखंड महाराष्ट्र इथल्या जनतेचाच राहणार आहे.