शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

बोलाची कढी़

By admin | Updated: October 10, 2014 03:04 IST

पर्यायाने त्यांच्या कथित सर्वांगीण हातोटीचं नेमकं मूल्यमापन अशक्य. बरं त्यात सुलभता यावी म्हणून महाराष्ट्र राज्यही निर्णायक बहुमताने त्यांच्याच ताब्यात द्यावं

- राजेंद्र शिखरे

पाच बॅट्समन एक बॉलर

काँग्रेसला नामस्मरणविरहित चिंतनाची आवश्यकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ताविरहित वकूब परीक्षणाची गरज आहे. रामदास आठवलेगटादी रिपब्लिकन पक्षांना किमान एखाद्या हक्काच्या गल्लीशोधाची निकड आहे. राजू शेट्टी, जानकर, मेटे यांना आपल्या स्वत:बाहेर आपला पक्ष सोडा, आपण स्वत:च कुठवर आहोत, हे कळवून घेणं अपरिहार्य आहे. अपक्ष म्हणून ज्यांनी आपलं विक्रीमूल्य वधारतं ठेवण्यातच आजवर धन्यता मानली, त्यांना आता, आपला कुंकू लावता म्हणून किमान बिज-तिजवर तरी आपल्या गळाला लागतोय का, यासाठी उंबरेघास अपरिहार्य आहे. सहीसलामत केंद्रातल्या सत्तेत जाण्याबरोबरच मोदी नावाच्या या वेळच्या निवडणूक आकर्षणानं बाकी काही नाही तरी हा इतका राजकीय परिणाम निश्चित साधला आहे. आणखी एक. आपल्याशिवाय महाराष्ट्रात बाकी हिंदुत्ववादी पक्षांना थारा मिळणं ही केवळ अशक्य कोटीतली गोष्ट आहे, हा विद्यमान शिवसेनेचा अजेंडाही त्यांच्याकडून धाब्यावर बसवला गेला आहे. मनसेला अजून माणसाळण्याची तयारी निव्वळ दाखवण्यादाखलच नाही, तर त्यांनी माणसाळलं पाहिजे हेही त्यांनी लक्षात आणून दिलं आहे. मात्र दस्तुरखुद्द मोदींचा महाराष्ट्रातील भाजपा तरी फारच हवेत जातो आहे हीही बाब याच मोदी नावाच्या प्रलोभनाने मतदारांच्या ध्यानी आणून दिली आहे. अर्थात यातून महाराष्ट्राचं झालंच तर भलं होईल अन्यथा हे शिवराज्य कित्येक वर्षं मागं जाईल. सगळ्याच अर्थाने! मोदींनी चेंडू मतदारांहाती दिला आहे. ढोबळ सरासरीने एकाच वेळी खेळू पाहते पाच बॅट्समन विरु द्ध कोटी हातांचा एकच बॉलर. म्हटलं तर गेम चेंजर. म्हटलं तर गेम लूजर... दोघंही. मोदी आणि मतदार. क्रिटिकल पोझिशन. क्रिटिकल कंडिशन. दोघांचीही. मोदींची आणि मतदारांची. कारण प्रत्यक्ष निवडणुकीपर्यंत वय वाढवूनही मोदींचा कार्यकाळ शंभर वर्षांवर जात नाही. पर्यायाने त्यांच्या कथित सर्वांगीण हातोटीचं नेमकं मूल्यमापन अशक्य. बरं त्यात सुलभता यावी म्हणून महाराष्ट्र राज्यही निर्णायक बहुमताने त्यांच्याच ताब्यात द्यावं, मंडळी उतण्या-मातण्याची दाट भीती. सध्याच पी हळद आणि हो गोरी अशी अवस्था आहे. बरं बाळासाहेबांपश्चातच्या शिवसेनेची महाराष्ट्राला अजून गरज आहे. पण राजकीय विश्लेषकांच्या अभ्यासानुसार, सध्या ती निकडही फक्त निडर मराठी सैनिक म्हणून. ना राजा ना सेनापती म्हणून. इंजीन तर कुठं कुठं धावण्या, थांबण्याच्या सरावातच गोंधळतंय. पवार साहेब हुशार. अर्थातच मोठे पवार साहेब. त्यांनी हुशारीनं आपली राज्यसभा पटकावली. हो! पार्लमेंटमध्ये पास काढून जायला नको. प्रेक्षक गॅलरी टळली की आपसूक पीचफंड्यात राहता येतं. आणि त्यात पवारांच्या हातावरच्या घड्याळाची, न जाणो मोदींनाही गरज भासू शकते. युती तोडून भाजपाने आणि आघाडी टाळून शरद पवार यांनी, बघायला गेलं तर परस्परांना विश्वास आणि एकदुसऱ्यांना ठाम शाश्वती तर देऊ केली आहे; अशी अशाच उच्च विचारसरणीच्या मोठ्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. राज आणि उद्धव ठाकरे बंधूंनीही या संशयाची पुष्टी केली आहे. पुढं जाऊन मोदींच्या मंत्रिमंडळात पवारांना मंत्री म्हणून पाहायला लागलं तर आश्चर्य वाटू देऊ नका; असंही त्यांनी त्यांच्या मतदारांना आगाऊच सांगून ठेवलं आहे. आता सांगा. मतदार गोंधळेल नाहीतर काय होईल? मग भले तो कधीकाळी राजा शिवछत्रपतींचा, शाहू-फुले-आंबेडकर यांचा महाराष्ट्र होता म्हणून काय झालं? ...महात्मे बदले तशी परिस्थिती आणि परिस्थितीबरहुकूम गरजा आणि गरजेप्रमाणे जनता बदलती राहिली, तर तीही स्वाभाविक परिक्र माच! थोडक्यात, विद्यमान नेत्यांच्या नाठाळ बोलकढीला आताशा मतदार भीक घालेल असं संभवत नाही. नेमकं मतदान होणार आहे. हा अखंड महाराष्ट्र इथल्या जनतेचाच राहणार आहे.