शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

मोदींच्या दीप प्रज्वलनाला दक्षिणेत सर्वात कमी प्रतिसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2020 05:04 IST

पूर्व आणि ईशान्येतील राज्यांचा सर्वाधिक प्रतिसाद

संदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना संकटाच्या मुकाबल्यासाठी लोकांमध्ये भावनीक बळ निर्माण व्हावे या उद्देशाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दीप प्रज्वलनाच्या आवाहनाचे जेवढे कौतुक झाल तेवढी टीकाही झाली. मात्र, या आवाहनाला जनतेने भरभरून प्रतिसाद दिल्याचे रविवारी स्पष्ट झाले. विशेष बाब म्हणजे कोरोनाचा प्रादुर्भाव सर्वात कमी असलेल्या ईशान्य आणि पुर्वेतील राज्यातून सर्वाधिक प्रतिसाद मिळाल आहे. तर, सर्वात कमी प्रतिसाद दक्षिणेच्या राज्यांतील जनतेने दिल्याची महिती हाती आली आहे.केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या पावर सिस्टीम आॅपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने (पीओएसओसीओ) रविवारी देशभरात झालेल्या या मोहिमेची सविस्तर तांत्रिक अहवाल तयार केला आहे. त्यात दिलेल्या आकडेवारीची मांडणी केल्यानंतर हा निष्कर्ष हाती आला आहे. देशात वीज पुरवठा हा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि इशान्य असा पाच विभागांनुसार केला जातो. अहवालातील आकडेवारीनुसार रविवारी रात्री ९ ते ९.१० या काळात दक्षिणेतील राज्यांतली विजेची मागणी १७ टक्क्यांनी कमी झाली होती. ईशान्येत हे प्रमाण ४० टक्के तर पुर्वेतील राज्यांमध्ये ३५ टक्के होते. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तरेत २६ टक्के तर पश्चिमेतील राज्यांमध्ये विजेची मागणी २४ टक्क्यांनी कमी झाली होती.रविवारी रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी देशातील विजेची मागणी १ लाख १६ हजार ८८७ मेगावॅट होती. लोकांनी दिवे बंद करायला सुरूवात केल्यानंतर ती मागणी ८५ हजार ७९९ मेगावॅटपर्यंत कमी झाली होती. ही घट ३१ हजार ८९ मेगावॅटची होती.पीओएसओसीकडून इव्हेंट असा उल्लेखदेशात कोरोना प्रादुर्भाव वाढत असताना पंतप्रधानांची इव्हेंट करण्याची हौस भागत नाही अशी टीका विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. विशेष म्हणजे पीओएसओसीकडून प्रसिध्द केलेल्या अहवालातही या आवाहनाचा उल्लेख इव्हेंट असा करण्यात आला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या