शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

दिल्लीकरांसाठी दिलासा देणारी बातमी! मध्यरात्रीनंतर यमुनेचे पाणी ओसरू लागणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 22:30 IST

दिल्लीतून वाहणाऱ्या पाण्याने 208.62 मीटरपेक्षा उंची गाठली होती. परंतू, सकाळपासून दिल्लीचे पाणी वाढले नाही.

गेल्या तीन दिवसांपासून दिल्ली पाण्याखाली आहे. यमुनेला पूर आल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. यामुळे पिण्याच्या पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा पाण्याखाली गेली असून दिल्लीला पाण्यात असतानाही २५ टक्के भागाला पिण्याच्या पाण्याशिवाय रहावे लागणार आहे. महत्वाचे म्हणजे दिल्लीत पाऊस एवढा न कोसळूनही पुराच्या पाण्यात रहावे लागत आहे. 

दिल्लीतून वाहणाऱ्या पाण्याने 208.62 मीटरपेक्षा उंची गाठली होती. परंतू, सकाळपासून दिल्लीचे पाणी वाढले नाही. हा स्तर बराच वेळ कायम राहिला होता. यामुळे दिल्लीतील पाणी आता ओसरू लागण्याचा अंदाज केंद्रीय जल आयोगाने लावला आहे. दिल्लीत यमुनेचा जलस्तर स्थिर झाला आहे. यामुळे आज रात्रीपासून पाणी ओसरण्यास सुरुवात होईल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे. 

संचालक शरद चंद्र यांनी सांगितले की, यमुनेच्या पाण्याची पातळी स्थिर झाली असून येत्या चार तासांत ती कमी होण्यास सुरुवात होईल. शुक्रवारी पहाटे 3 वाजेपर्यंत ते 208.45 मीटरपर्यंत खाली येणे अपेक्षित आहे. ते म्हणाले की, हरियाणातील हथिनीकुंड बॅरेजमधील पाण्याचा प्रवाह दुपारी 4 वाजता 80,000 क्युसेकवर घसरला आहे. 

आताच हाती आलेल्या अपडेटनुसार दिल्लीत यमुना नदीच्या पाण्याची पातळी कमी झाली आहे. रात्री 10 वाजता पाणी 208.63 मीटरवर पोहोचले आहे. दिल्लीत गेल्या २४ तासांत यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत कोणतीही वाढ झालेली नाही. सायंकाळी 6 वाजता 208.66 मीटर एवढी पाणीपातळी नोंदवली गेली, तीच रात्री 8 वाजता कायम राहिली. दिल्लीकरांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे. रात्रीनंतर पाण्याची पातळी 15 ते 25 सेंटीमीटरने कमी होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :floodपूरdelhiदिल्ली