शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर

By admin | Updated: August 4, 2016 05:43 IST

वाराणसीतील रोड शोदरम्यान प्रकृती बिघडल्यामुळे दिल्लीला परतलेल्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रकृती आता स्थिर

नवी दिल्ली : वाराणसीतील रोड शोदरम्यान प्रकृती बिघडल्यामुळे दिल्लीला परतलेल्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची प्रकृती आता स्थिर असून, त्यांना बुधवारी येथील सर गंगाराम रुग्णालयात हलविण्यात आले. प्रचंड ताप असल्यामुळे सोनिया यांना मंगळवारी रात्री उशिरा येथे लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अचानक प्रकृती बिघडल्यामुळे वाराणसी येथील रोड शो अर्धवट सोडून त्या चार्टर्ड विमानाने मध्यरात्री येथे परतल्या. त्यानंतर विमानतळाजवळ असलेल्या लष्करी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. गांधी यांनी यापूर्वी सर गंगाराम रुग्णालयात उपचार घेतले असल्यामुळे त्यांना तेथे हलविण्यात आले, असे सूत्रांनी सांगितले. तत्पूर्वी काँग्रेसच्या मीडिया सेलचे प्रमुख रणदीप सुरजेवाला यांनी सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असून, सुधारत असल्याचे सांगितले होते. वाराणसीतील लोकांना भेटण्यासाठी तसेच काशी विश्वनाथाचे दर्शन घेण्यासाठी परत येईन, असे सोनिया यांनी काल स्वत: म्हटले होते. देशवासीय आणि लाखो काँग्रेस कार्यकर्त्यांनी आपल्या प्रकृतीबाबत दाखविलेल्या काळजीने सोनिया गांधी भारावून गेल्या असून, त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत, असेही सुरजेवाला म्हणाले. रुग्णालयात राहुल आणि प्रियंका गांधी त्यांच्यासोबत होते. जावई रॉबर्ट वड्रा यांनीही त्यांची भेट घेतली. (लोकमत न्यूज नेटवर्क) >शरीरातील पाणी कमीकाँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या शरीरातील पाणी कमी झाले आहे. तथापि, त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे गंगाराम रुग्णालयाने बुधवारी सांगितले. रुग्णालयाचे प्रमुख डॉ. डी. एस. राणा यांनी सोनिया गांधी यांच्या प्रकृतीबाबत बुधवारी मेडिकल बुलेटीन जारी केले. या बुलेटीनमध्ये म्हटले आहे, की सोनिया यांच्या शरीरातील पाणी कमी झाले आहे. तथापि, त्यांची प्रकृती स्थिर असून, त्यांना विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे.